शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

कपाशीच्या क्षेत्रात ११ हजार हेक्टरने वाढ अपेक्षित खरिपाचे नियोजन : कपाशी बियाण्याच्या २१ लाख ६८ हजार पाकिटांची मागणी

By admin | Updated: April 14, 2016 00:54 IST

जळगाव- यंदाच्या हंगामात धो धो पाऊस अनुभवायला मिळेल, असे संकेत हवामानशास्त्र विभाग व विविध खाजगी संस्थांनी दिल्याने शेतीशी संबंधित शासकीय यंत्रणांनी आगामी खरिपाचे नियोजन केले आहे. यंदा मागील हंगामाच्या तुलनेत कपाशीच्या क्षेत्रात सुमारे ११ हजार हेक्टरने वाढ होईल. सर्वाधिक चार लाख ३३ हजार ६६६ हेक्टरवर कपाशीची लागवड होईल, असा अंदाज असून त्या दृष्टीने हेक्टरी पाच कपाशीच्या बियाण्यांची गरज लक्षात घेता २१ लाख ६८ हजार ३३० कपाशी बियाण्याच्या पाकिटांची मागणी कृषि आयुक्तालयाकडे नोंदविली जाणार आहे.

जळगाव- यंदाच्या हंगामात धो धो पाऊस अनुभवायला मिळेल, असे संकेत हवामानशास्त्र विभाग व विविध खाजगी संस्थांनी दिल्याने शेतीशी संबंधित शासकीय यंत्रणांनी आगामी खरिपाचे नियोजन केले आहे. यंदा मागील हंगामाच्या तुलनेत कपाशीच्या क्षेत्रात सुमारे ११ हजार हेक्टरने वाढ होईल. सर्वाधिक चार लाख ३३ हजार ६६६ हेक्टरवर कपाशीची लागवड होईल, असा अंदाज असून त्या दृष्टीने हेक्टरी पाच कपाशीच्या बियाण्यांची गरज लक्षात घेता २१ लाख ६८ हजार ३३० कपाशी बियाण्याच्या पाकिटांची मागणी कृषि आयुक्तालयाकडे नोंदविली जाणार आहे.
खरीप २०१६-१७ संबंधीचे नियोजन राज्य शासन व जि.प.च्या कृषि विभागाने पूर्ण केले आहे. येत्या २३ रोजी दुपारी नियोजन भवनात खरीप आढावा बैठक कृषिमंत्री घेणार आहे. त्यातील सूचना लक्षात घेऊन आणखी नियोजनात बदल केला जाऊ शकतो.

सर्वाधिक कपाशी
जिल्‘ात खरिपाखाली सात लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र असते. कपाशीचे सरासरी क्षेत्र चार लाख ६५ हजार हेक्टर एवढे आहे. मागील हंगामात कपाशीची चार लाख २२ हजार ८६२ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा त्यात सुमारे १० हजार हेक्टरने वाढ होण्याची अपेक्षा असून, हे क्षेत्र चार लाख ३३ हजार ६६६ हेक्टर एवढे असेल, असा अंदाज आहे.

नॉन बीटीची फक्त एक लाखांवर पाकिटे
जिल्हाभरात बीटी कपाशीची सर्वाधिक लागवड होते. यामुळे नॉन बीटी म्हणजेच सुधारित संकरित कपाशीच्या बियाण्याची एक लाख ८ हजार १५ पाकिटांची मागणी केली जाणार आहे. तर सर्वाधिक २० लाख ६० हजार ७१२ बीटी कपाशीच्या बियाण्याच्या पाकिटांची मागणी केली आहे.

खरीप हंगाम आढावा घेणार
आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषि व महसूलमंत्री एकनाथराव खडसे हे २३ रोजी दुपारी नियोजन भवनात खरीप आढावा बैठक घेणार आहे. त्यात हंगामासाठी आवश्यक बियाणे, खते, सूचना यासंबंधी चर्चा होईल. त्यानुसार आणखी नियोजन केले जाईल.

प्रमुख कंपन्यांकडे मागणी
कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक असते. कापूस उत्पादकांना ऐनवेळी बियाण्यासंबंधी त्रास होऊ नये यासाठी बीटी कपाशी बियाणे निर्मात्या प्रमुख कंपन्यांकडे बियाण्याची जादा मागणी केली आहे. त्यांचा तुटवडा भासणार नाही यासाठी पत्रव्यवहार केल्याची माहिती कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी दिली.