शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

कपाशीच्या क्षेत्रात ११ हजार हेक्टरने वाढ अपेक्षित खरिपाचे नियोजन : कपाशी बियाण्याच्या २१ लाख ६८ हजार पाकिटांची मागणी

By admin | Updated: April 14, 2016 00:54 IST

जळगाव- यंदाच्या हंगामात धो धो पाऊस अनुभवायला मिळेल, असे संकेत हवामानशास्त्र विभाग व विविध खाजगी संस्थांनी दिल्याने शेतीशी संबंधित शासकीय यंत्रणांनी आगामी खरिपाचे नियोजन केले आहे. यंदा मागील हंगामाच्या तुलनेत कपाशीच्या क्षेत्रात सुमारे ११ हजार हेक्टरने वाढ होईल. सर्वाधिक चार लाख ३३ हजार ६६६ हेक्टरवर कपाशीची लागवड होईल, असा अंदाज असून त्या दृष्टीने हेक्टरी पाच कपाशीच्या बियाण्यांची गरज लक्षात घेता २१ लाख ६८ हजार ३३० कपाशी बियाण्याच्या पाकिटांची मागणी कृषि आयुक्तालयाकडे नोंदविली जाणार आहे.

जळगाव- यंदाच्या हंगामात धो धो पाऊस अनुभवायला मिळेल, असे संकेत हवामानशास्त्र विभाग व विविध खाजगी संस्थांनी दिल्याने शेतीशी संबंधित शासकीय यंत्रणांनी आगामी खरिपाचे नियोजन केले आहे. यंदा मागील हंगामाच्या तुलनेत कपाशीच्या क्षेत्रात सुमारे ११ हजार हेक्टरने वाढ होईल. सर्वाधिक चार लाख ३३ हजार ६६६ हेक्टरवर कपाशीची लागवड होईल, असा अंदाज असून त्या दृष्टीने हेक्टरी पाच कपाशीच्या बियाण्यांची गरज लक्षात घेता २१ लाख ६८ हजार ३३० कपाशी बियाण्याच्या पाकिटांची मागणी कृषि आयुक्तालयाकडे नोंदविली जाणार आहे.
खरीप २०१६-१७ संबंधीचे नियोजन राज्य शासन व जि.प.च्या कृषि विभागाने पूर्ण केले आहे. येत्या २३ रोजी दुपारी नियोजन भवनात खरीप आढावा बैठक कृषिमंत्री घेणार आहे. त्यातील सूचना लक्षात घेऊन आणखी नियोजनात बदल केला जाऊ शकतो.

सर्वाधिक कपाशी
जिल्‘ात खरिपाखाली सात लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र असते. कपाशीचे सरासरी क्षेत्र चार लाख ६५ हजार हेक्टर एवढे आहे. मागील हंगामात कपाशीची चार लाख २२ हजार ८६२ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा त्यात सुमारे १० हजार हेक्टरने वाढ होण्याची अपेक्षा असून, हे क्षेत्र चार लाख ३३ हजार ६६६ हेक्टर एवढे असेल, असा अंदाज आहे.

नॉन बीटीची फक्त एक लाखांवर पाकिटे
जिल्हाभरात बीटी कपाशीची सर्वाधिक लागवड होते. यामुळे नॉन बीटी म्हणजेच सुधारित संकरित कपाशीच्या बियाण्याची एक लाख ८ हजार १५ पाकिटांची मागणी केली जाणार आहे. तर सर्वाधिक २० लाख ६० हजार ७१२ बीटी कपाशीच्या बियाण्याच्या पाकिटांची मागणी केली आहे.

खरीप हंगाम आढावा घेणार
आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषि व महसूलमंत्री एकनाथराव खडसे हे २३ रोजी दुपारी नियोजन भवनात खरीप आढावा बैठक घेणार आहे. त्यात हंगामासाठी आवश्यक बियाणे, खते, सूचना यासंबंधी चर्चा होईल. त्यानुसार आणखी नियोजन केले जाईल.

प्रमुख कंपन्यांकडे मागणी
कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक असते. कापूस उत्पादकांना ऐनवेळी बियाण्यासंबंधी त्रास होऊ नये यासाठी बीटी कपाशी बियाणे निर्मात्या प्रमुख कंपन्यांकडे बियाण्याची जादा मागणी केली आहे. त्यांचा तुटवडा भासणार नाही यासाठी पत्रव्यवहार केल्याची माहिती कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी दिली.