शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीच्या क्षेत्रात ११ हजार हेक्टरने वाढ अपेक्षित खरिपाचे नियोजन : कपाशी बियाण्याच्या २१ लाख ६८ हजार पाकिटांची मागणी

By admin | Updated: April 14, 2016 00:54 IST

जळगाव- यंदाच्या हंगामात धो धो पाऊस अनुभवायला मिळेल, असे संकेत हवामानशास्त्र विभाग व विविध खाजगी संस्थांनी दिल्याने शेतीशी संबंधित शासकीय यंत्रणांनी आगामी खरिपाचे नियोजन केले आहे. यंदा मागील हंगामाच्या तुलनेत कपाशीच्या क्षेत्रात सुमारे ११ हजार हेक्टरने वाढ होईल. सर्वाधिक चार लाख ३३ हजार ६६६ हेक्टरवर कपाशीची लागवड होईल, असा अंदाज असून त्या दृष्टीने हेक्टरी पाच कपाशीच्या बियाण्यांची गरज लक्षात घेता २१ लाख ६८ हजार ३३० कपाशी बियाण्याच्या पाकिटांची मागणी कृषि आयुक्तालयाकडे नोंदविली जाणार आहे.

जळगाव- यंदाच्या हंगामात धो धो पाऊस अनुभवायला मिळेल, असे संकेत हवामानशास्त्र विभाग व विविध खाजगी संस्थांनी दिल्याने शेतीशी संबंधित शासकीय यंत्रणांनी आगामी खरिपाचे नियोजन केले आहे. यंदा मागील हंगामाच्या तुलनेत कपाशीच्या क्षेत्रात सुमारे ११ हजार हेक्टरने वाढ होईल. सर्वाधिक चार लाख ३३ हजार ६६६ हेक्टरवर कपाशीची लागवड होईल, असा अंदाज असून त्या दृष्टीने हेक्टरी पाच कपाशीच्या बियाण्यांची गरज लक्षात घेता २१ लाख ६८ हजार ३३० कपाशी बियाण्याच्या पाकिटांची मागणी कृषि आयुक्तालयाकडे नोंदविली जाणार आहे.
खरीप २०१६-१७ संबंधीचे नियोजन राज्य शासन व जि.प.च्या कृषि विभागाने पूर्ण केले आहे. येत्या २३ रोजी दुपारी नियोजन भवनात खरीप आढावा बैठक कृषिमंत्री घेणार आहे. त्यातील सूचना लक्षात घेऊन आणखी नियोजनात बदल केला जाऊ शकतो.

सर्वाधिक कपाशी
जिल्‘ात खरिपाखाली सात लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र असते. कपाशीचे सरासरी क्षेत्र चार लाख ६५ हजार हेक्टर एवढे आहे. मागील हंगामात कपाशीची चार लाख २२ हजार ८६२ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा त्यात सुमारे १० हजार हेक्टरने वाढ होण्याची अपेक्षा असून, हे क्षेत्र चार लाख ३३ हजार ६६६ हेक्टर एवढे असेल, असा अंदाज आहे.

नॉन बीटीची फक्त एक लाखांवर पाकिटे
जिल्हाभरात बीटी कपाशीची सर्वाधिक लागवड होते. यामुळे नॉन बीटी म्हणजेच सुधारित संकरित कपाशीच्या बियाण्याची एक लाख ८ हजार १५ पाकिटांची मागणी केली जाणार आहे. तर सर्वाधिक २० लाख ६० हजार ७१२ बीटी कपाशीच्या बियाण्याच्या पाकिटांची मागणी केली आहे.

खरीप हंगाम आढावा घेणार
आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषि व महसूलमंत्री एकनाथराव खडसे हे २३ रोजी दुपारी नियोजन भवनात खरीप आढावा बैठक घेणार आहे. त्यात हंगामासाठी आवश्यक बियाणे, खते, सूचना यासंबंधी चर्चा होईल. त्यानुसार आणखी नियोजन केले जाईल.

प्रमुख कंपन्यांकडे मागणी
कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक असते. कापूस उत्पादकांना ऐनवेळी बियाण्यासंबंधी त्रास होऊ नये यासाठी बीटी कपाशी बियाणे निर्मात्या प्रमुख कंपन्यांकडे बियाण्याची जादा मागणी केली आहे. त्यांचा तुटवडा भासणार नाही यासाठी पत्रव्यवहार केल्याची माहिती कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी दिली.