शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाचलमध्ये खांडू नवे मुख्यमंत्री

By admin | Updated: July 17, 2016 07:01 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा पदावर आलेल्या नबाम तुकी यांनाच मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवले तर विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकणे शक्य नाही, याची खात्री पटल्यावर काँग्रेसने

इटानगर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा पदावर आलेल्या नबाम तुकी यांनाच मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवले तर विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकणे शक्य नाही, याची खात्री पटल्यावर काँग्रेसने शनिवारी नाट्यपूर्ण खेळी करत अरुणाचल प्रदेशात नेतृत्वबदल केला.राज्यपालांच्या निर्देशानुसार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याऐवजी नबाम तुकी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. नंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ३६ वर्षांचे पेमा खांडू यांची नेतेपदी निवड करण्यात आली. सहा महिन्यांपूवी खालिको पुल यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करून पक्ष सोडून गेलेले काँग्रेसचे सर्व ३० आमदार स्वगृही परतले व त्यांनी खांडू यांचे नेतृत्त्व मान्य केले. बैठकीनंतर खांडू राज्यपाल तथागत रॉय यांच्याकडे गेले आणि त्यांनी ४५ आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी खांडू यांना लगेच सरकार स्थापनेसाठी पाचारण केले नसले तरी उद्या रविवारी त्यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल, अशी अपेक्षा आहे. पेमा खांडू हे हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे चिरंजीव असून ते तुकी यांच्या मंत्रिमंडळात पर्यटनमंत्री होते.पुल हे बंडखोर आमदार व भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री बनले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे त्यांची गच्छंती होऊन झाली. राज्यपालांनी तुकी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी शनिवारपर्यंतची मुदत दिली. मात्र काँग्रेसने नेतृत्त्वबदल केल्याने शक्तिप्रदर्शन करण्याची वेळच आली नाही.काँग्रेसच्या बैठकीत तुकी यांनी खांडू यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला व उपस्थित सर्व ४४ आमदारांनी पाठिंबा दर्शविला. मात्र, पुल बंडखोर आमदारांसह आले. अरुणाचलच्या ६० सदस्यीय विधानसभेत आता आमदारांची संख्या ५८ असून काँग्रेसने दोन अपक्ष आमदारांसह ४७ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी तुकी यांनी राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा आपला मनोदय सांगून नवा नेता निवडण्याच्या पक्षाच्या निर्णयाचीही त्यांना कल्पना दिली. (वृत्तसंस्था) उशिरा सुचलेले शहाणपण- सहा महिन्यांपूर्वी नबाम तुकी यांच्या नेतृत्वाविरुद्ध बंड करून ३० आमदार काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यांना हाताशी धरून आणि राज्यपालांचा राजकीय डावपेचात वापर करून भाजपाने आधी राष्ट्रपती राजवट लागू केली व नंतर बंडखोर काँग्रेस नेते खालिको पुल यांचे सरकार स्थापन केले. - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने घड्याळाचे काटे उलटे फिरल्यावर काँग्रेसला शहाणपण सुचले व तुकी यांना दूर करून पक्षातून गेलेल्या सर्व आमदारांना परत आणण्यात काँग्रेसला यश आले. सहा महिन्यांपूर्वीच तुकी यांना दूर केले असते तर पुढचे सर्व रामायण टळले असते.आता कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या हस्तक्षेपाने पक्ष एकजूट आहे.-पेमा खांडू, नियोजित मुख्यमंत्री