शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
2
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
3
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
4
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
5
Operation Sindoor Live Updates: 'आता फक्त पीओके परत करण्यावरच चर्चा होणार'; भारताने प्रस्ताव फेटाळला
6
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
7
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
8
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
9
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
10
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
11
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
12
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
13
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
14
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
15
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
16
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
17
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
18
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
19
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
20
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले

अरुणाचलमध्ये खांडू नवे मुख्यमंत्री

By admin | Updated: July 17, 2016 07:01 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा पदावर आलेल्या नबाम तुकी यांनाच मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवले तर विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकणे शक्य नाही, याची खात्री पटल्यावर काँग्रेसने

इटानगर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा पदावर आलेल्या नबाम तुकी यांनाच मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवले तर विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकणे शक्य नाही, याची खात्री पटल्यावर काँग्रेसने शनिवारी नाट्यपूर्ण खेळी करत अरुणाचल प्रदेशात नेतृत्वबदल केला.राज्यपालांच्या निर्देशानुसार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याऐवजी नबाम तुकी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. नंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ३६ वर्षांचे पेमा खांडू यांची नेतेपदी निवड करण्यात आली. सहा महिन्यांपूवी खालिको पुल यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करून पक्ष सोडून गेलेले काँग्रेसचे सर्व ३० आमदार स्वगृही परतले व त्यांनी खांडू यांचे नेतृत्त्व मान्य केले. बैठकीनंतर खांडू राज्यपाल तथागत रॉय यांच्याकडे गेले आणि त्यांनी ४५ आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी खांडू यांना लगेच सरकार स्थापनेसाठी पाचारण केले नसले तरी उद्या रविवारी त्यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल, अशी अपेक्षा आहे. पेमा खांडू हे हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे चिरंजीव असून ते तुकी यांच्या मंत्रिमंडळात पर्यटनमंत्री होते.पुल हे बंडखोर आमदार व भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री बनले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे त्यांची गच्छंती होऊन झाली. राज्यपालांनी तुकी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी शनिवारपर्यंतची मुदत दिली. मात्र काँग्रेसने नेतृत्त्वबदल केल्याने शक्तिप्रदर्शन करण्याची वेळच आली नाही.काँग्रेसच्या बैठकीत तुकी यांनी खांडू यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला व उपस्थित सर्व ४४ आमदारांनी पाठिंबा दर्शविला. मात्र, पुल बंडखोर आमदारांसह आले. अरुणाचलच्या ६० सदस्यीय विधानसभेत आता आमदारांची संख्या ५८ असून काँग्रेसने दोन अपक्ष आमदारांसह ४७ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी तुकी यांनी राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा आपला मनोदय सांगून नवा नेता निवडण्याच्या पक्षाच्या निर्णयाचीही त्यांना कल्पना दिली. (वृत्तसंस्था) उशिरा सुचलेले शहाणपण- सहा महिन्यांपूर्वी नबाम तुकी यांच्या नेतृत्वाविरुद्ध बंड करून ३० आमदार काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यांना हाताशी धरून आणि राज्यपालांचा राजकीय डावपेचात वापर करून भाजपाने आधी राष्ट्रपती राजवट लागू केली व नंतर बंडखोर काँग्रेस नेते खालिको पुल यांचे सरकार स्थापन केले. - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने घड्याळाचे काटे उलटे फिरल्यावर काँग्रेसला शहाणपण सुचले व तुकी यांना दूर करून पक्षातून गेलेल्या सर्व आमदारांना परत आणण्यात काँग्रेसला यश आले. सहा महिन्यांपूर्वीच तुकी यांना दूर केले असते तर पुढचे सर्व रामायण टळले असते.आता कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या हस्तक्षेपाने पक्ष एकजूट आहे.-पेमा खांडू, नियोजित मुख्यमंत्री