शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

खान्देशातील साहित्य परंपरेला खंड पडू देणार नाही कुमार साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन : बालसाहित्यिकांची ग्वाही

By admin | Updated: December 10, 2015 23:56 IST

जळगाव : खान्देश भूमिला कवयित्री बहिणाबाई चौधरी, बालकवी, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, कविवर्य ना.धो. महानोर यांची महान साहित्य परंपरा लाभलेली आहे. या परंपरेला खंड पडू देणार नाही, अशी ग्वाही बालसाहित्यिक तथा खान्देशस्तरीय कुमार साहित्य संमेलनाची अध्यक्षा कृष्णा वाघ हिने दिली.

जळगाव : खान्देश भूमिला कवयित्री बहिणाबाई चौधरी, बालकवी, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, कविवर्य ना.धो. महानोर यांची महान साहित्य परंपरा लाभलेली आहे. या परंपरेला खंड पडू देणार नाही, अशी ग्वाही बालसाहित्यिक तथा खान्देशस्तरीय कुमार साहित्य संमेलनाची अध्यक्षा कृष्णा वाघ हिने दिली.
विवेकानंद प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुयोग कॉलनीतील डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात खान्देशस्तरीय कुमार साहित्य संमेलन व कलामहोत्सवाला गुरुवारी, १० डिसेंबर रोजी सुरुवात झाली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ती बोलत होती.
संमेलनाचे उद्घाटन अंश पिल्ले या बालसाहित्यिकाच्या हस्ते सरस्वतीपूजन व दीपप्रज्ज्वलनाने झाले. या वेळी संमेलनाची अध्यक्षा कृष्णा वाघ, स्वागताध्यक्ष चिन्मय जगताप उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर केसीई सोसायटीचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी, कुतुहल फाउंडेश्नचे संचालक महेश गोरडे, परीक्षक डॉ. सुषमा खानापूरकर, आयुध निर्माणीचे निवृत्त कर्मचारी तथा साहित्य भूषण सन्मानित चंद्रकांत अंबाडे उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनपर भाषणात अंश पिल्ले याने उद्घाटन झाल्याचे घोषित करुन ही संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले.
जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा
स्वागताध्यक्ष चिन्मय जगताप याने आपल्या भाषणात सांगितले की, हे संमेलन म्हणजे जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे. विवेकानंद प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांपैकी हे संमेलन म्हणजे शिवधनुष्यच आहे. कुमार साहित्यिकांच्या सुप्त गुणांना वाव देणाच्या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन म्हणावे लागेल. शाळा जीवन विषयक गुरुकुल असून येथील वातावरण पाहून गावाकडे आल्याचा भास होत असल्याचेही त्याने सांगितले. आपली शाळा हीच यशाचे शिखर असते, या शाळेमुळेच मी या संमेलनाचा स्वागताध्यक्ष होऊ शकलो, असे प्रामाणिक मत चिन्मयने मांडले.
मराठी जपणे आद्य कर्तव्य
मराठी भाषेला मोठा इतिहास आहे, ती जपणे आपले आद्य कर्तव्य आहे. साहित्य संमेलन मराठीसाठी होतात, ही अभिमानाची बाब आहे, असे अध्यक्षा कृष्णा वाघ हिने सांगितले. तसेच ध्येय प्राप्त होण्यासाठी आत्मविश्वास असावा आणि त्याला प्रयत्नाचीही जोड असावी लागते. म्हणून स्वप्नपूर्ती करण्यासाठी कसून प्रयत्न केले पाहिजे. अपयशाने खचू नका, आपल्यातील वेगळेपण ओळखा, आयुष्य नटविण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. दररोज एकतरी पान वाचा, त्यामुळे मन सुंदर विश्वात रमेल, असा सल्ला वाघ हिने दिला.