शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशातील साहित्य परंपरेला खंड पडू देणार नाही कुमार साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन : बालसाहित्यिकांची ग्वाही

By admin | Updated: December 10, 2015 23:56 IST

जळगाव : खान्देश भूमिला कवयित्री बहिणाबाई चौधरी, बालकवी, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, कविवर्य ना.धो. महानोर यांची महान साहित्य परंपरा लाभलेली आहे. या परंपरेला खंड पडू देणार नाही, अशी ग्वाही बालसाहित्यिक तथा खान्देशस्तरीय कुमार साहित्य संमेलनाची अध्यक्षा कृष्णा वाघ हिने दिली.

जळगाव : खान्देश भूमिला कवयित्री बहिणाबाई चौधरी, बालकवी, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, कविवर्य ना.धो. महानोर यांची महान साहित्य परंपरा लाभलेली आहे. या परंपरेला खंड पडू देणार नाही, अशी ग्वाही बालसाहित्यिक तथा खान्देशस्तरीय कुमार साहित्य संमेलनाची अध्यक्षा कृष्णा वाघ हिने दिली.
विवेकानंद प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुयोग कॉलनीतील डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात खान्देशस्तरीय कुमार साहित्य संमेलन व कलामहोत्सवाला गुरुवारी, १० डिसेंबर रोजी सुरुवात झाली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ती बोलत होती.
संमेलनाचे उद्घाटन अंश पिल्ले या बालसाहित्यिकाच्या हस्ते सरस्वतीपूजन व दीपप्रज्ज्वलनाने झाले. या वेळी संमेलनाची अध्यक्षा कृष्णा वाघ, स्वागताध्यक्ष चिन्मय जगताप उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर केसीई सोसायटीचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी, कुतुहल फाउंडेश्नचे संचालक महेश गोरडे, परीक्षक डॉ. सुषमा खानापूरकर, आयुध निर्माणीचे निवृत्त कर्मचारी तथा साहित्य भूषण सन्मानित चंद्रकांत अंबाडे उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनपर भाषणात अंश पिल्ले याने उद्घाटन झाल्याचे घोषित करुन ही संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले.
जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा
स्वागताध्यक्ष चिन्मय जगताप याने आपल्या भाषणात सांगितले की, हे संमेलन म्हणजे जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे. विवेकानंद प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांपैकी हे संमेलन म्हणजे शिवधनुष्यच आहे. कुमार साहित्यिकांच्या सुप्त गुणांना वाव देणाच्या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन म्हणावे लागेल. शाळा जीवन विषयक गुरुकुल असून येथील वातावरण पाहून गावाकडे आल्याचा भास होत असल्याचेही त्याने सांगितले. आपली शाळा हीच यशाचे शिखर असते, या शाळेमुळेच मी या संमेलनाचा स्वागताध्यक्ष होऊ शकलो, असे प्रामाणिक मत चिन्मयने मांडले.
मराठी जपणे आद्य कर्तव्य
मराठी भाषेला मोठा इतिहास आहे, ती जपणे आपले आद्य कर्तव्य आहे. साहित्य संमेलन मराठीसाठी होतात, ही अभिमानाची बाब आहे, असे अध्यक्षा कृष्णा वाघ हिने सांगितले. तसेच ध्येय प्राप्त होण्यासाठी आत्मविश्वास असावा आणि त्याला प्रयत्नाचीही जोड असावी लागते. म्हणून स्वप्नपूर्ती करण्यासाठी कसून प्रयत्न केले पाहिजे. अपयशाने खचू नका, आपल्यातील वेगळेपण ओळखा, आयुष्य नटविण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. दररोज एकतरी पान वाचा, त्यामुळे मन सुंदर विश्वात रमेल, असा सल्ला वाघ हिने दिला.