शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

नोटबंदीचा निर्णय मागे घ्या - केजरीवालांचे मोदींना आवाहन

By admin | Updated: November 13, 2016 19:07 IST

लोकांना होत असलेल्या प्रचंड त्रासामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पंतप्रधानांनी नोटबंदीचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - नोटबंदीच्या निर्णयावरून आक्रमक झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर चौफेर टीकास्त्र सोडले आहे. लोकांना होत असलेल्या प्रचंड त्रासामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पंतप्रधानांनी हा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केली.
नोटबंदीवरून मोदीविरोधात आघाडी उघणाऱ्या केजरीवाल यांनी आज संध्याकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मोदींवर आरोपांचा भडीमार केला. केजरीवाल म्हणाले, "मोदी देशवासियांना 50 दिवस संयम बाळगण्याचे आवाहन करत आहेत. पण जनता आता 50 तासांचा संयम बाळगण्याच्याही मन;स्थितीत नाही. संपूर्ण देशात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे."
 सरकारने काळ्यापैशाविरोधात कारवाईचे नाटक केले असून, अशा नाटकांनी सर्वसामान्यांचे पोट भरू शकेल का, असा टोलाही केजरीवाल यांनी लगावला. "पंतप्रधान म्हणतात ही केवळ 50 दिवसांची समस्या आहे. पण या काळात सगळी व्यवस्था बिघडून जाईल. त्यामुळे मोदीजी तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवा आणि नोटबंदीचा निर्णय मागे घ्या."असे केजरीवाल म्हणाले.