शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

केजरीवालांच्या माफीने ‘आप’मध्ये फुटीची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 02:09 IST

आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अकाली दलाचे नेते पंजाबचे माजी मंत्री विक्रमसिंग मजिठिया यांच्यावर ते अमलीपदार्थांच्या तस्करीत गुंतले असल्याच्या केलेल्या आरोपांबद्दल माफी मागितल्यामुळे पक्षाचे संगरूरचे खासदार भगवंत मान यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा शुक्रवारी राजीनामा दिला आहे.

चंदीगढ : आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अकाली दलाचे नेते पंजाबचे माजी मंत्री विक्रमसिंग मजिठिया यांच्यावर ते अमलीपदार्थांच्या तस्करीत गुंतले असल्याच्या केलेल्या आरोपांबद्दल माफी मागितल्यामुळे पक्षाचे संगरूरचे खासदार भगवंत मान यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा शुक्रवारी राजीनामा दिला आहे.अरविंद केजरीवाल यांच्या माफीनाम्यामुळे आम आदमी पक्षात खळबळ माजली असून, पक्षाच्या अनेक नेत्यांना तो निर्णय आवडलेला नाही. बऱ्याच नेत्यांनी माफीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. पंजाब आपचे उपाध्यक्ष अमन अरोरा यांनीही राजीनामा दिला आहे, तर आपशी पंजाबात असलेली आघाडी तोडण्याचा निर्णय इन्साफ पार्टीने जाहीर केला आहे.केजरीवाल यांनी मागितलेल्या माफीमुळे पंजाबमधील आपच्या जवळपास सर्व नेत्यांनी आम्हाला धक्का बसला व आम्ही निराश झाल्याचे म्हटले आहे. मान यांनी टिष्ट्वटरवर जाहीर केलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, ‘आपच्या पंजाब शाखेच्या प्रमुखपदाचा मी राजीनामा देत आहे. परंतु, ड्रग माफिया आणि पंजाबमधील सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराविरोधातील माझा संघर्ष ‘आम आदमी’ या नात्याने सुरूच राहील. माफीनाम्यामुळे पंजाबमधील आपमध्ये फूट पडण्याची चिन्हे आहेत.मजिठिया हे अमलीपदार्थांच्या धंद्यात गुंतले असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. गुरुवारी त्यांनी या आरोपांबद्दल पत्राद्वारे माफी मागताना माझे आरोप हे निराधार होते. आता त्यावरून काही राजकारण व्हायला नको. तुमच्याबद्दल मी केलेली सगळी विधाने आणि आरोप या पत्राद्वारे मागे घेत आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.पंजाबमधील विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुखपाल सिंग खैरा म्हणाले की, केजरीवालांनी मागिलेल्या माफीने मी थक्कच झालो. केजरीवाल यांनी माफी मागायच्या आधी आमच्याशी सल्लामसलत केली नव्हती. पंजाबमधील तरुण पिढीला नष्ट करणाºया अमलीपदार्थांविरोधात आमचा संघर्ष सुरूच राहील.अमलीपदार्थाच्या विषयावर बिक्रम मजिठिया यांच्यावर खटला चालविण्यासाठी पुरेसा पुरावा असल्याचे स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) उच्च न्यायालयात गुरुवारी सांगितले असताना केजरीवाल यांनी माफीमागावी हे मला समजत नाही. (वृत्तसंस्था)>केजरीवाल यांनी धोका दिलामजिठिया यांची माफी मागून अरविंद केजरीवाल यांनी केवळ पक्षालाच नव्हे, तर पंजाबमधील जनतेलाही धोका दिला आहे. आपण घाबरट असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिद्धू यांनी केली आहे. या माफीमुळे केजरीवाल यांनी पक्षाचे पंजाबमधील अस्तित्वच संपवून टाकले आहे, असेही ते म्हणाले.>ंजेटली यांचीही माफी मागणार?केजरीवाल यांनी अरुण जेटली यांच्यावरही आरोप केले होते. जेटली यांनी त्यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा न्यायालयात केला आहे. त्यामुळे जेटली यांचीही केजरीवाल माफी मागण्याची शक्यता आहे. मात्र कोर्टबाजीमध्ये अडकण्याची केजरीवाल यांची सध्या मन:स्थिती नसल्याचे कळते.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल