शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
2
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
3
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात
5
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
6
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
7
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
8
'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
9
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
10
ऐतिहासिक पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील तळघरात आतापर्यंत काय काय सापडलं?
11
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
12
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
13
Mr. & Mrs. Mahi Movie Review : राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या अभिनयाचा 'षटकार'
14
मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा
15
कोकण पदवीधरमधून मनसे उमेदवारी मागे घेणार का? अभिजीत पानसेंनी सगळंच सांगितलं
16
मुंबईत उद्या ‘जम्बो’ हाल होणार; ५३४ लोकल फेऱ्या रद्द!
17
भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार
18
"बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते", परकीय गुंतवणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!
19
मुंबई महानगरात ४० पेक्षा अधिक मजल्यांच्या तब्बल १५४ इमारती, २०३० पर्यंत ३६१ होणार!
20
"तो निर्णय संघ व्यवस्थापनाचा होता, यात विशेष काही नाही", जितेश शर्माच्या मनाचा मोठेपणा 

केजरी-जंग सत्तासंघर्ष शिगेला

By admin | Published: June 02, 2015 11:27 PM

दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील सत्तासंघर्ष मंगळवारी पुन्हा उफाळून आला

नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील सत्तासंघर्ष मंगळवारी पुन्हा उफाळून आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) बिहारमधील पाच अधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्याच्या आम आदमी पार्टी (आप) सरकारच्या निर्णयावर नायब राज्यपालांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तर दिल्ली सरकारने यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.त्याचे झाले असे की, आप सरकारतर्फे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या कार्यालयाला विनंती करण्यात आल्यानंतर बिहार पोलीस विभागातील तीन निरीक्षक आणि दोन उपनिरीक्षक दिल्लीच्या एसीबीत सामील झाले आणि येथेच वादाची ठिणगी पडली. नायब राज्यपालांनी आप सरकारच्या या निर्णयावर कठोर पवित्रा घेत तडकाफडकी या पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नायब राज्यपालांच्या प्रत्यक्ष अधिकार व नियंत्रणात असल्याचे ठासून सांगितले. विशेष म्हणजे केजरीवाल सरकार आणि नायब राज्यपालांदरम्यान अधिकार क्षेत्रावरून युद्ध पेटले असताना या नियुक्त्या झाल्या आहेत.एसीबी, दिल्ली एका पोलीस ठाण्याच्या रूपात नायब राज्यपालांच्या नियंत्रणात आणि देखरेखीखाली कार्यरत आहे. गृहमंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेतही (संख्या १३६८ ई) हे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असताना बिहार पोलिसांच्या नियुक्तीशी संबंधित कुठलाही प्रस्ताव अद्याप नायब राज्यपालांकडे आलेला नाही. दिल्ली सरकारच्या दक्षता विभागाकडून असा प्रस्ताव आल्यास त्याचे संपूर्ण अध्ययन केले जाईल, असे जंग यांच्या कार्यालयातून काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)