शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कौल दिलात तर नेतृत्व करेन - राज ठाकरे

By admin | Updated: September 30, 2014 14:04 IST

सत्ता मिळाली नाही तर आमदार बनून विरोधी बाकांवर बसणार नसल्याचे राज ठाकरे यांनी सूचित केले.

ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. ३० - निवडणुकीत जर मला कौल दिलात तर राज्याचे नेतृत्व करेन असं सांगत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याचे आणि सत्ता मिळाली नाही तर आमदार होऊन विरोधी बाकांवर बसणार नसल्याचेही सूचित केले आहे. विदर्भात मंगळवारी प्रचाराला सुरूवात करताना अमरावती येथील सभेत ते बोलत होते. 
यापूर्वी पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विधानसभा निव़डणूक लढवण्याची घोषणा केली होती. पण त्यानंतर नागपूर येथे बोलताना निवडणूक लढवणे आमच्या रक्तात नाही, कारण आम्ही एका मतदारसंघापुरता विचार करू शकत नाही, संपूर्ण महाराष्ट्र हाच आमचा मतदारसंघ आहे, असे सांगत त्यांनी निवडणूक न लढण्याचे संकेत दिले होते. मंगळवारी अमरावती येथील सभेत बोलताना त्यांनी याचाच पुनरुच्चार करत जनतेने कौल दिल्यास नेतृत्व करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. जर सत्ता दिलीत तर नेतृत्व करत तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले.
या सभेत त्यांनी अन्य राजकारण्यांवर सडकून टीका केली. महाराष्ट्रातील मंत्री इस्राइलमध्ये जाऊन तिथल्या शेतीची पाहणी करतात, पण त्यांनीच या राज्याचं ओसाड वाळवंट करून टाकलयं असा टोला त्यांनी हाणला. महाराष्ट्राला देशातील एक नंबरचे राज्य करण्याचे आश्वासन देणारे राजकारणी महाराष्ट्र अनेक बाबतीत पुढे असल्याची शेखी मिरवतात, मात्र राज्य कोणत्या बाबतीत पुढे आहे हेही त्यांनी सांगावे असे आवाहन ठाकरे यांनी केले. खून, दरोडे, बलात्कार, बेरोजगारी या सर्व गुन्ह्यांत महाराष्ट्र पुढे असल्याचे सांगत राजकीय पक्ष जनतेला मुर्ख बनवत असल्याची टीका त्यांनी केली.
खासगी सुरक्षा एजन्सीज संपूर्णपणे बंद करून सुरक्षा व्यवस्थेचे सरकारीकरण करण्याची घोषणाही राज यांनी केली आहे.