शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

काश्मीर अब्दुल्लांची खासगी मालमत्ता नाही - RSSचा हल्ला

By admin | Updated: May 28, 2014 13:21 IST

काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याची धमकी देणारे ओमर या राज्याला स्वत:ची खासगी संपत्ती समजतात का,' असा खडा सवाल करत संघाने सडेतोड उत्तर दिले आहे.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २८ - नरेंद्र मोदींच्या सरकारमधील पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेण्याच्या केलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद शमण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. या मुद्यावर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या ट्विटला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सडेतोड उत्तर मिळाले आहे. 'अनुच्छेद ३७० राहो अथवा न राहो, जम्मू-काश्मीर नेहमीच भारताचा अविभाज्य भाग राहिला आहे व यापुढेही राहील' असे खडसावत संघाचे नेते राम माधव यांनी ओमर यांना प्रत्युत्तर दिले.
राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७0 अन्वये जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेण्याच्या मुद्दय़ावर चर्चा करायला नवे सरकार तयार आहे, असे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी म्हटले होते. काश्मीर मुख्य भारतीय प्रवाहात येण्यात अनुच्छेद ३७0 हा भौतिक अडसराहून मानसिक अडसर जास्त आहे, असेही त्यांनी सांगितले होते. सिंह यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.  जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी, एक तर अनुच्छेद ३७0 तरी राहील नाहीतर काश्मीर तरी भारतात राहील, अशी गर्भित धमकी दिली होती. 
संघाचे नेते राम माधव यांनी ट्विटरद्वारे या मुद्यावर सडेतोड मत मांडले. ' कलम ३७० राहो वा न राहो, जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे आणि नेहमीच राहील. काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याची धमकी देणारे ओमर या राज्याला स्वत:ची खासगी संपत्ती समजतात का,'  असा खडा सवालही माधव यांनी ट्विटरवर विचारला आहे.  
अनुच्छेद ३७0 हा भारत व जम्मू-काश्मीर यांच्यातील एकमेव संवैधानिक दुवा आहे. हा अनुच्छेद रद्द करण्याची भाषा करणे हे केवल असमंजसपणाचेच नव्हे तर बेजबाबदारपणाचेही आहे. मोदी सरकार विस्मृतीत जाण्याच्या बर्‍याच आधी एक तर जम्मू-काश्मीर तरी भारतात राहणार नाही किंवा अनुच्छेद ३७0 तरी कायम राहील, असे ट्विट ओमर अब्दुल्ला यांनी केले होते.