शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

काश्मीर अब्दुल्लांची खासगी मालमत्ता नाही - RSSचा हल्ला

By admin | Updated: May 28, 2014 13:21 IST

काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याची धमकी देणारे ओमर या राज्याला स्वत:ची खासगी संपत्ती समजतात का,' असा खडा सवाल करत संघाने सडेतोड उत्तर दिले आहे.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २८ - नरेंद्र मोदींच्या सरकारमधील पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेण्याच्या केलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद शमण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. या मुद्यावर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या ट्विटला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सडेतोड उत्तर मिळाले आहे. 'अनुच्छेद ३७० राहो अथवा न राहो, जम्मू-काश्मीर नेहमीच भारताचा अविभाज्य भाग राहिला आहे व यापुढेही राहील' असे खडसावत संघाचे नेते राम माधव यांनी ओमर यांना प्रत्युत्तर दिले.
राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७0 अन्वये जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेण्याच्या मुद्दय़ावर चर्चा करायला नवे सरकार तयार आहे, असे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी म्हटले होते. काश्मीर मुख्य भारतीय प्रवाहात येण्यात अनुच्छेद ३७0 हा भौतिक अडसराहून मानसिक अडसर जास्त आहे, असेही त्यांनी सांगितले होते. सिंह यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.  जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी, एक तर अनुच्छेद ३७0 तरी राहील नाहीतर काश्मीर तरी भारतात राहील, अशी गर्भित धमकी दिली होती. 
संघाचे नेते राम माधव यांनी ट्विटरद्वारे या मुद्यावर सडेतोड मत मांडले. ' कलम ३७० राहो वा न राहो, जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे आणि नेहमीच राहील. काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याची धमकी देणारे ओमर या राज्याला स्वत:ची खासगी संपत्ती समजतात का,'  असा खडा सवालही माधव यांनी ट्विटरवर विचारला आहे.  
अनुच्छेद ३७0 हा भारत व जम्मू-काश्मीर यांच्यातील एकमेव संवैधानिक दुवा आहे. हा अनुच्छेद रद्द करण्याची भाषा करणे हे केवल असमंजसपणाचेच नव्हे तर बेजबाबदारपणाचेही आहे. मोदी सरकार विस्मृतीत जाण्याच्या बर्‍याच आधी एक तर जम्मू-काश्मीर तरी भारतात राहणार नाही किंवा अनुच्छेद ३७0 तरी कायम राहील, असे ट्विट ओमर अब्दुल्ला यांनी केले होते.