शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

यूपी, राजस्थान सोडण्यासाठी काश्मिरी नागरिकांना धमक्या

By admin | Updated: April 22, 2017 01:29 IST

काश्मिरी नागरिकांनो, उत्तर प्रदेश सोडून जा, असे बॅनर मेरठमध्ये लागले असून, त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काश्मिरात सुरक्षा दलाच्या जवानांवर होत असलेल्या

मेरठ : काश्मिरी नागरिकांनो, उत्तर प्रदेश सोडून जा, असे बॅनर मेरठमध्ये लागले असून, त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काश्मिरात सुरक्षा दलाच्या जवानांवर होत असलेल्या दगडफेकीच्या घटनांनंतर असे बॅनर लागले आहेत. काश्मिरी नागरिकांवर बहिष्कार करण्याचे आवाहन यात करण्यात आले आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानी यांनी सांगितले की, काश्मिरींवर बहिष्काराबाबतचे बॅनर आणि होर्डिंग मेरठच्या परतापूर बायपासस्थित मार्गावर काही महाविद्यालयांच्या बाहेर लावले आहेत, जिथे काही काश्मिरी विद्यार्थी शिक्षण घेतात. अर्थात, हे पहिले पाऊल असून, त्यानंतरही काश्मिरी नागरिक येथून गेले नाहीत, तर हल्ला बोल करण्यात येईल. ३० एप्रिलपासून काश्मिरींना जबरदस्तीने येथून बाहेर काढण्यात येईल. परतापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी दिनेश शर्मा यांनी सांगितले की, हे बॅनर हटविण्यात आले आहेत. उपनिरीक्षक विपिन कुमार यांनी सांगितले की, धर्म, जाती, जन्मस्थळ, भाषा या आधारे समुदायात मतभेद निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात दिसत होते की, काही तरुण सीआरपीएफच्या जवानांना मारहाण करत आहेत. यावर देशभरातून टीका होत आहे. (वृत्तसंस्था)चौथ्या दिवशीही महाविद्यालये बंद श्रीनगर : संपूर्ण काश्मिरातील महाविद्यालये शुक्रवारी चौथ्या दिवशीही बंद होती. सुरक्षा दलाकडून बळाचा वापर होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे. या मुद्द्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले होते. त्यानंतर, या शिक्षण संस्था बंद आहेत. विभागीय आयुक्त बशीर खान यांच्या आदेशानंतर ही महाविद्यालये सलग चौथ्या दिवशी बंद आहेत.