शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

"काश्‍मिरींनो, उत्तर प्रदेश सोडा, अन्यथा...,"यूपी"मध्ये बॅनरबाजी

By admin | Updated: April 21, 2017 16:44 IST

काश्‍मीरमध्ये भारतीय जवानांवर दगडफेकीचा उद्रेक उत्तर प्रदेशमध्ये उफाळून आला आहे

ऑनलाइन लोकमतउत्तर प्रदेश, दि. 21 - काश्‍मीरमध्ये भारतीय जवानांवर दगडफेकीचा उद्रेक उत्तर प्रदेशमध्ये उफाळून आला आहे. काश्मिरात जवानांवर दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध एका संघटनेने उत्तर प्रदेशमधल्या काश्‍मिरी नागरिकांना उत्तर प्रदेश सोडण्याचा इशारा दिला आहे. "काश्‍मिरींनो, उत्तर प्रदेश सोडा. अन्यथा.." परिणाम भोगा, असा संदेश लिहिलेले बॅनर मेरठमध्ये लावण्यात आले आहेत. "भारतीय लष्कराच्या जवानांवर दगडफेक करणा-या काश्‍मिरींचा बहिष्कार. काश्‍मिरींनो, उत्तर प्रदेश सोडा. अन्यथा..", असा हिंदी भाषेत लिहिलेले पोस्टर झळकावण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेने हे बॅनर लावले असून, बॅनरवर काश्मीरमध्ये दगडफेक होत असतानाचे छायाचित्र आणि बॅनर लावणाऱ्या संघटनेचा अध्यक्ष अमित जानीचेही छायाचित्र दिसत आहे. दिल्ली-डेहराडून हायवेवरील एका कॉलेजवळ हे बॅनर लावण्यात आले आहेत. काश्मिरी लोक शिक्षण आणि नोकरी भारतात करतात. मात्र ते फुटीरतावाद्यांना पाठिंबा देतात. त्यामुळेच आम्ही उत्तर प्रदेशमधून काश्मिरी लोकांचा बहिष्कार करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांना दूध, पाणी, वर्तमानपत्र, राहण्यासाठी भाड्यानं घरं आणि प्रवेश मिळू न देण्यासाठी जनजागृती अभियानही राबवणार आहोत. तसेच लोकांना जम्मू-काश्मीर बँकेतील त्यांची खाती बंद करण्यासही सांगणार आहोत. जर काश्मिरींनी उत्तर प्रदेश सोडलं नाही, तर आम्ही 30 एप्रिलला त्यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढून, असंही अमित जानी म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही काश्मिरींकडून होणा-या दगडफेकीवर चिंता व्यक्त करत काश्मिरींशी दुजाभाव न करण्याची विनंती केली होती. ते म्हणाले होते. काश्मिरी तरुणांसोबत होणा-या दुजाभावाच्या प्रकाराचा मी निषेध करतो. काश्‍मिरी तरुणांना अयोग्य वागणूक देणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल. उत्तर प्रदेशमधील सर्व तरुणांना आवाहन करतो की, त्यांनी काश्‍मिरी तरुणांना स्वतःचे बंधू समजावे. देशातील कोणत्याही भागात कोणत्याही काश्‍मिरी तरुणांना मारहाण केली जाणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन मी देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना करतो. काश्‍मीरमधील अनेक लोक देशाची सुरक्षितता आणि समृद्धीसाठी योगदान देत आहेत, हे कोणीही विसरू शकत नसल्याचं गृहमंत्री म्हणाले आहेत.