शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
3
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
4
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
5
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
6
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
7
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
9
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
10
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
11
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
12
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
13
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
14
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
15
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
16
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
17
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
18
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
19
उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी
20
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल

"काश्‍मिरींनो, उत्तर प्रदेश सोडा, अन्यथा...,"यूपी"मध्ये बॅनरबाजी

By admin | Updated: April 21, 2017 16:44 IST

काश्‍मीरमध्ये भारतीय जवानांवर दगडफेकीचा उद्रेक उत्तर प्रदेशमध्ये उफाळून आला आहे

ऑनलाइन लोकमतउत्तर प्रदेश, दि. 21 - काश्‍मीरमध्ये भारतीय जवानांवर दगडफेकीचा उद्रेक उत्तर प्रदेशमध्ये उफाळून आला आहे. काश्मिरात जवानांवर दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध एका संघटनेने उत्तर प्रदेशमधल्या काश्‍मिरी नागरिकांना उत्तर प्रदेश सोडण्याचा इशारा दिला आहे. "काश्‍मिरींनो, उत्तर प्रदेश सोडा. अन्यथा.." परिणाम भोगा, असा संदेश लिहिलेले बॅनर मेरठमध्ये लावण्यात आले आहेत. "भारतीय लष्कराच्या जवानांवर दगडफेक करणा-या काश्‍मिरींचा बहिष्कार. काश्‍मिरींनो, उत्तर प्रदेश सोडा. अन्यथा..", असा हिंदी भाषेत लिहिलेले पोस्टर झळकावण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेने हे बॅनर लावले असून, बॅनरवर काश्मीरमध्ये दगडफेक होत असतानाचे छायाचित्र आणि बॅनर लावणाऱ्या संघटनेचा अध्यक्ष अमित जानीचेही छायाचित्र दिसत आहे. दिल्ली-डेहराडून हायवेवरील एका कॉलेजवळ हे बॅनर लावण्यात आले आहेत. काश्मिरी लोक शिक्षण आणि नोकरी भारतात करतात. मात्र ते फुटीरतावाद्यांना पाठिंबा देतात. त्यामुळेच आम्ही उत्तर प्रदेशमधून काश्मिरी लोकांचा बहिष्कार करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांना दूध, पाणी, वर्तमानपत्र, राहण्यासाठी भाड्यानं घरं आणि प्रवेश मिळू न देण्यासाठी जनजागृती अभियानही राबवणार आहोत. तसेच लोकांना जम्मू-काश्मीर बँकेतील त्यांची खाती बंद करण्यासही सांगणार आहोत. जर काश्मिरींनी उत्तर प्रदेश सोडलं नाही, तर आम्ही 30 एप्रिलला त्यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढून, असंही अमित जानी म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही काश्मिरींकडून होणा-या दगडफेकीवर चिंता व्यक्त करत काश्मिरींशी दुजाभाव न करण्याची विनंती केली होती. ते म्हणाले होते. काश्मिरी तरुणांसोबत होणा-या दुजाभावाच्या प्रकाराचा मी निषेध करतो. काश्‍मिरी तरुणांना अयोग्य वागणूक देणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल. उत्तर प्रदेशमधील सर्व तरुणांना आवाहन करतो की, त्यांनी काश्‍मिरी तरुणांना स्वतःचे बंधू समजावे. देशातील कोणत्याही भागात कोणत्याही काश्‍मिरी तरुणांना मारहाण केली जाणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन मी देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना करतो. काश्‍मीरमधील अनेक लोक देशाची सुरक्षितता आणि समृद्धीसाठी योगदान देत आहेत, हे कोणीही विसरू शकत नसल्याचं गृहमंत्री म्हणाले आहेत.