शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

काश्मीर आमचेच!

By admin | Updated: May 22, 2017 03:31 IST

‘काश्मीर आमचे आहे. काश्मिरी आमचे आहेत आणि काश्मिरियतही आमचीच आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी केले

पेलिंग (सिक्कीम) : ‘काश्मीर आमचे आहे. काश्मिरी आमचे आहेत आणि काश्मिरियतही आमचीच आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी केले. मोदी सरकार निश्चितपणे काश्मीर समस्येवर कायमचा तोडगा काढेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. काश्मीर खोऱ्यातील सातत्यपूर्ण हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही ग्वाही दिली. येथे जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. काश्मीरमध्ये कुरापती काढून पाकिस्तान भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, आमचे सरकार काश्मीर मुद्यावर निश्चित कायमचा तोडगा काढेल.गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुऱ्हाण वनी मारला गेल्यापासून काश्मीर धगधगत आहे. मध्यंतरी हिंसाचाराचा थोडा खंड पडला होता. मात्र, श्रीनगर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान पुन्हा तो उफाळला. तेव्हापासून राज्यात सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. गृहमंत्री तीन दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी चीन-भारत सीमेलगतची विकास कामे आणि सुरक्षा स्थितीचा एका बैठकीत आढावा घेतला. त्यांनी नथूला सीमा चौकीसह इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस आणि एसएसबीच्या काही चौक्यांना भेटी दिल्या. (वृत्तसंस्था)‘पाकिस्तान बदलेल; न बदलल्यास बदलण्यास भाग पाडू’२०१४ मध्ये मोदी सरकारच्या शपथविधीसाठी सर्व शेजारी देशांच्या प्रमुखांना आमंत्रित केले होते. भारताला सर्व शेजाऱ्यांशी सौहार्दाचे संबंध हवे असल्याचे ते संकेत होते. तथापि, पाकच्या वर्तणुकीत कोणताही बदल झाला नाही ही खेदाची बाब आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तान बदलेल, अशी आम्हाला आशा आहे. जर तो बदलला नाही तर आम्हाला त्याला बदलण्यास भाग पाडावे लागेल. जागतिकीकरणानंतर एक देश दुसऱ्या देशाला उलथून टाकू शकत नाही. कारण, ही बाब आंतरराष्ट्रीय समुदाय विसरणार नाही.