शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

काश्मीर आमचेच!

By admin | Updated: May 22, 2017 03:31 IST

‘काश्मीर आमचे आहे. काश्मिरी आमचे आहेत आणि काश्मिरियतही आमचीच आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी केले

पेलिंग (सिक्कीम) : ‘काश्मीर आमचे आहे. काश्मिरी आमचे आहेत आणि काश्मिरियतही आमचीच आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी केले. मोदी सरकार निश्चितपणे काश्मीर समस्येवर कायमचा तोडगा काढेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. काश्मीर खोऱ्यातील सातत्यपूर्ण हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही ग्वाही दिली. येथे जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. काश्मीरमध्ये कुरापती काढून पाकिस्तान भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, आमचे सरकार काश्मीर मुद्यावर निश्चित कायमचा तोडगा काढेल.गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुऱ्हाण वनी मारला गेल्यापासून काश्मीर धगधगत आहे. मध्यंतरी हिंसाचाराचा थोडा खंड पडला होता. मात्र, श्रीनगर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान पुन्हा तो उफाळला. तेव्हापासून राज्यात सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. गृहमंत्री तीन दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी चीन-भारत सीमेलगतची विकास कामे आणि सुरक्षा स्थितीचा एका बैठकीत आढावा घेतला. त्यांनी नथूला सीमा चौकीसह इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस आणि एसएसबीच्या काही चौक्यांना भेटी दिल्या. (वृत्तसंस्था)‘पाकिस्तान बदलेल; न बदलल्यास बदलण्यास भाग पाडू’२०१४ मध्ये मोदी सरकारच्या शपथविधीसाठी सर्व शेजारी देशांच्या प्रमुखांना आमंत्रित केले होते. भारताला सर्व शेजाऱ्यांशी सौहार्दाचे संबंध हवे असल्याचे ते संकेत होते. तथापि, पाकच्या वर्तणुकीत कोणताही बदल झाला नाही ही खेदाची बाब आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तान बदलेल, अशी आम्हाला आशा आहे. जर तो बदलला नाही तर आम्हाला त्याला बदलण्यास भाग पाडावे लागेल. जागतिकीकरणानंतर एक देश दुसऱ्या देशाला उलथून टाकू शकत नाही. कारण, ही बाब आंतरराष्ट्रीय समुदाय विसरणार नाही.