शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

काश्मीर आमचेच!

By admin | Updated: May 22, 2017 03:31 IST

‘काश्मीर आमचे आहे. काश्मिरी आमचे आहेत आणि काश्मिरियतही आमचीच आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी केले

पेलिंग (सिक्कीम) : ‘काश्मीर आमचे आहे. काश्मिरी आमचे आहेत आणि काश्मिरियतही आमचीच आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी केले. मोदी सरकार निश्चितपणे काश्मीर समस्येवर कायमचा तोडगा काढेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. काश्मीर खोऱ्यातील सातत्यपूर्ण हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही ग्वाही दिली. येथे जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. काश्मीरमध्ये कुरापती काढून पाकिस्तान भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, आमचे सरकार काश्मीर मुद्यावर निश्चित कायमचा तोडगा काढेल.गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुऱ्हाण वनी मारला गेल्यापासून काश्मीर धगधगत आहे. मध्यंतरी हिंसाचाराचा थोडा खंड पडला होता. मात्र, श्रीनगर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान पुन्हा तो उफाळला. तेव्हापासून राज्यात सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. गृहमंत्री तीन दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी चीन-भारत सीमेलगतची विकास कामे आणि सुरक्षा स्थितीचा एका बैठकीत आढावा घेतला. त्यांनी नथूला सीमा चौकीसह इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस आणि एसएसबीच्या काही चौक्यांना भेटी दिल्या. (वृत्तसंस्था)‘पाकिस्तान बदलेल; न बदलल्यास बदलण्यास भाग पाडू’२०१४ मध्ये मोदी सरकारच्या शपथविधीसाठी सर्व शेजारी देशांच्या प्रमुखांना आमंत्रित केले होते. भारताला सर्व शेजाऱ्यांशी सौहार्दाचे संबंध हवे असल्याचे ते संकेत होते. तथापि, पाकच्या वर्तणुकीत कोणताही बदल झाला नाही ही खेदाची बाब आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तान बदलेल, अशी आम्हाला आशा आहे. जर तो बदलला नाही तर आम्हाला त्याला बदलण्यास भाग पाडावे लागेल. जागतिकीकरणानंतर एक देश दुसऱ्या देशाला उलथून टाकू शकत नाही. कारण, ही बाब आंतरराष्ट्रीय समुदाय विसरणार नाही.