शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये पोलिसाला जमावाने ठेचून ठार मारले

By admin | Updated: June 24, 2017 04:33 IST

गेल्या काही महिन्यांपासून धगधगत असलेल्या काश्मीरमध्ये सुरक्षादलांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांनी

श्रीनगर : गेल्या काही महिन्यांपासून धगधगत असलेल्या काश्मीरमध्ये सुरक्षादलांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांनी शुक्रवारी कळस गाठला. मशिदीबाहेर सुरक्षेसाठी असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यालाच जमावाने ठेचून मारल्याची धक्कादायक घटना श्रीनगर शहरात घडली. या घटनेने संतापाची लाट उमटली असून, या प्रकरणी आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली आहे.मोहम्मद आयुब पंडित असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. श्रीनगरमधील नौहट्टा परिसरातील मशिदीबाहेर ते बंदोबस्तासाठी होते. ते अनेक काळापासून तिथे बंदोबस्तासाठी असल्याने मशिदीत नियमित जाणारे त्यांना ओळखत असत. त्या भागातील पोलीस नेहमीच साध्या वेशात असतात. गुरुवारी रात्री जामिया मशिदीमध्ये ‘शब-ए-कद्र’ची प्रार्थना सुरू होती. त्यासाठी तिथे शेकडो लोक जमले होते. त्यातील काहींना पंडित यांच्याविषयी शंका आली व त्यांनी उलटसुलट प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यातून तणाव वाढत गेला. जमाव वाढत गेला आणि त्याला पांगवण्यासाठी पंडित यांनी गोळीबार केला. त्यात तीन जण जखमी झाले. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी या अधिकाऱ्याचे कपडे काढले आणि त्यास मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र फुटिरवाद्यांनी माथी भडकवल्याने अशी घटना घडल्याचा संशय असून, फुटिरवादी संघटना हुर्रियत कॉन्फरन्सचा नेता मिरवाइज हा तेव्हा मशिदीत होता अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, मिरवाइजनेही या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी सांगितले की, ह्यजमावाने केलेल्या मारहाणीमध्ये पंडित यांचा मृत्यु झाला. जमावाने पोलीस चौकीही उद्ध्वस्त केली.ह्ण यात सहभागी असणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही वैद यांनी दिला.नेमका हल्ला का झाला?काहींच्या म्हणण्यानुसार नमाज सुरू असताना पंडित मशिदीचा फोटो काढत होते. त्यामुळे जमावाचा गैरसमज झाला आणि तो पंडित यांच्या अंगावर धावून आला. स्वसंरक्षणासाठी या अधिकाऱ्याने गोळीबार केला, ज्यात तीन जण जखमी झाले.बंदोबस्त वाढविलामाजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या प्रकाराची तीव्र शब्दांत निंदा केली आहे. भाकप तसेच जम्मू-काश्मीर काँग्रेसनेही घटनेचा निषेध केला आहे. या प्रकारानंतर संपूर्ण श्रीनगर शहरात आणि काश्मीर खोऱ्यात पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. जवानांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका ही घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. जर पोलिसांच्या संयमाचा हा परिणाम असेल, तर येणाऱ्या दिवसांमध्ये मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. हे असे किती दिवस चालणार आहे ? जर असेच चालू राहिले, तर जसे आधी पोलिसांची जीप पाहताच लोक पळ काढायचे, तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते. जवानांच्या सहनशक्तीचा असा अंत पाहू नका, असा इशारा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिला.