शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

काश्मीरचा मुद्दा लष्कराच्या मार्गानं सुटणार नाही- बिलावल भुत्तो

By admin | Updated: October 5, 2016 20:07 IST

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुत्तो यांनी भारत आणि पाकिस्ताननं युद्धाची भूमिका टाळून शांती स्वीकारली पाहिजे, असं वक्तव्य केलं

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांचे पुत्र आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुत्तो यांनी भारत आणि पाकिस्ताननं युद्धाची भूमिका टाळून शांती स्वीकारली पाहिजे. तसेच काश्मीरचा मुद्दा हा लष्कराच्या मार्गानं न सुटता शांततेच्या मार्गानं सुटू शकतो, असंही टि्वटरच्या माध्यमातून म्हटलं आहे. विशेष म्हणजे काश्मीर पाकिस्तानचं आहे, असं म्हणणा-या बेनझीर भुत्तो यांच्या पुत्रानेच भारत आणि पाकिस्ताननं युद्धाची भूमिका टाळून शांती नांदावी, अशी भूमिका घेतल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भुत्तो परिवाराचा पाकिस्तानच्या राजकारणावर जबरदस्त प्रभाव आहे. त्यामुळे बिलावल भुत्तो यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.  दोन्ही देशांनी सर्वसामान्यांचं जीवन उद्ध्वस्त करणारा युद्धाचा विचार त्यागला पाहिजे, असं आवाहन बिलावल भुत्तो यांनी केलं आहे.

दोन दिवसांपूर्वी नवाज शरीफ यांनी बोलावलेल्या बैठकीलाही बिलावल भुत्तो उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी असं ट्विट केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बिलावल भुत्तो यांनी नवाज शरीफांवरही टीका केली आहे. काश्मीरचा मुद्दावर लष्कराच्या मार्गानं तोडगा निघणार नसून, शांततेच्या मार्गानं तो प्रश्न सुटू शकतो, असं उपरोधिक टीका नवाज शरीफांवर केली आहे.