शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘इसिस’

By admin | Updated: July 4, 2015 03:59 IST

कट्टर इस्लामी ‘खिलाफत’ स्थापन करण्याच्या वल्गना करीत क्रौर्य आणि धर्मवेड या जोरावर इराक आणि सीरियाच्या बऱ्याच मोठ्या भूप्रदेशावर कब्जा करून

श्रीनगर : कट्टर इस्लामी ‘खिलाफत’ स्थापन करण्याच्या वल्गना करीत क्रौर्य आणि धर्मवेड या जोरावर इराक आणि सीरियाच्या बऱ्याच मोठ्या भूप्रदेशावर कब्जा करून जागतिक नेत्यांची झोप उडविलेली ‘इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया’ (इसिस) ही दहशतवादी संघटना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणजेच इसिस भारताच्या उंबरठ्यावर येऊ पाहात आहे, असे संकेत भारतीय लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी येथे दिले.जम्मू-काश्मीर सीमेवर जागता पाहरा देण्याची जबाबदारी असलेल्या भारतीय लष्कराच्या १६व्या कॉर्प्सचे ध्वजाधिकारी लेफ्ट. जनरल के. एच. सिंग यांनी राजौरी जिल्ह्यात झांगर येथे लष्कराच्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी वार्ताहरांशी बोलताना हे संकेत दिले. ते म्हणाले, की आम्हाला ज्या काही गुप्तवार्ता मिळत आहेत त्यावरून ‘इसिस’ने अद्याप मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केली नसली तरी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाय रोवण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच सुरू असल्याचे दिसते. ‘इसिस’ने काश्मीर खोऱ्यात शिरकाव केल्याच्या पार्श्वभूमीवर पाकव्याप्त काश्मीरमध्ये या दहशतवादी संघटनेचा कितपत धोका संभवतो, या आशयाच्या प्रश्नास जनरल सिंग उत्तर देत होते. जनरल सिंग म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये अजून तरी ’इसिस’चा दखल घेण्याइतपत शिरकाव झाल्याचे दिसून आले नसले तरी सीमेपलिकडे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारी (पाक पुरस्कृत) प्रशिक्षण केंद्रे मात्र अबाधित आहेत. योग्य संधी मिळताच भारतात घुसखोरी करण्यासाठी पिर पांजाळ पर्वतराजीच्या पलिकडे २०० ते २५० दहशतवादी ३५ ठिकाणी दबा धरून बसले असल्याची माहिती लष्करास मिळाली आहे.लष्कराने आयोजित केलल्या ‘झांगर दिन’ समारंभासाठी येथे आले होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर लगेचच सन १९४७-४८ मध्ये काश्मीरच्या राजौरी विभागात पाकिस्तानशी झालेल्या सशस्त्र संघर्षात लष्कराच्या १५ पॅराशूट डिव्हिजनने कमांडर ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांच्या नेतृत्वाखाली नौशेरा आघाडीवर अतुलनीय शौर्य दाखवून झांगर परत मिळविले होते. त्या लढाईत ब्रिगेडियर उस्मान यांना हौतात्म्य आले व त्यासाठी त्यांना मरणोत्तर महावीरचक्र देऊन गौरविण्यात आले. भारतीय लष्करात ब्रिगेडियर उस्मान आजही ‘नौशेर का शेर’ म्हणून ओळखले जातात व त्या लढाईच्या स्मृत्यर्थ ‘झांगर दिन’ साजरा केला जातो. लेफ्ट. जनरल सिंग यांनी या कार्यक्रमात स्मृतीस्तंभावर पुष्कचक्र वाहिले व शहीद जवानांच्या कुटुंबियाशीही संवाद साधला.