शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘इसिस’

By admin | Updated: July 4, 2015 03:59 IST

कट्टर इस्लामी ‘खिलाफत’ स्थापन करण्याच्या वल्गना करीत क्रौर्य आणि धर्मवेड या जोरावर इराक आणि सीरियाच्या बऱ्याच मोठ्या भूप्रदेशावर कब्जा करून

श्रीनगर : कट्टर इस्लामी ‘खिलाफत’ स्थापन करण्याच्या वल्गना करीत क्रौर्य आणि धर्मवेड या जोरावर इराक आणि सीरियाच्या बऱ्याच मोठ्या भूप्रदेशावर कब्जा करून जागतिक नेत्यांची झोप उडविलेली ‘इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया’ (इसिस) ही दहशतवादी संघटना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणजेच इसिस भारताच्या उंबरठ्यावर येऊ पाहात आहे, असे संकेत भारतीय लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी येथे दिले.जम्मू-काश्मीर सीमेवर जागता पाहरा देण्याची जबाबदारी असलेल्या भारतीय लष्कराच्या १६व्या कॉर्प्सचे ध्वजाधिकारी लेफ्ट. जनरल के. एच. सिंग यांनी राजौरी जिल्ह्यात झांगर येथे लष्कराच्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी वार्ताहरांशी बोलताना हे संकेत दिले. ते म्हणाले, की आम्हाला ज्या काही गुप्तवार्ता मिळत आहेत त्यावरून ‘इसिस’ने अद्याप मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केली नसली तरी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाय रोवण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच सुरू असल्याचे दिसते. ‘इसिस’ने काश्मीर खोऱ्यात शिरकाव केल्याच्या पार्श्वभूमीवर पाकव्याप्त काश्मीरमध्ये या दहशतवादी संघटनेचा कितपत धोका संभवतो, या आशयाच्या प्रश्नास जनरल सिंग उत्तर देत होते. जनरल सिंग म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये अजून तरी ’इसिस’चा दखल घेण्याइतपत शिरकाव झाल्याचे दिसून आले नसले तरी सीमेपलिकडे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारी (पाक पुरस्कृत) प्रशिक्षण केंद्रे मात्र अबाधित आहेत. योग्य संधी मिळताच भारतात घुसखोरी करण्यासाठी पिर पांजाळ पर्वतराजीच्या पलिकडे २०० ते २५० दहशतवादी ३५ ठिकाणी दबा धरून बसले असल्याची माहिती लष्करास मिळाली आहे.लष्कराने आयोजित केलल्या ‘झांगर दिन’ समारंभासाठी येथे आले होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर लगेचच सन १९४७-४८ मध्ये काश्मीरच्या राजौरी विभागात पाकिस्तानशी झालेल्या सशस्त्र संघर्षात लष्कराच्या १५ पॅराशूट डिव्हिजनने कमांडर ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांच्या नेतृत्वाखाली नौशेरा आघाडीवर अतुलनीय शौर्य दाखवून झांगर परत मिळविले होते. त्या लढाईत ब्रिगेडियर उस्मान यांना हौतात्म्य आले व त्यासाठी त्यांना मरणोत्तर महावीरचक्र देऊन गौरविण्यात आले. भारतीय लष्करात ब्रिगेडियर उस्मान आजही ‘नौशेर का शेर’ म्हणून ओळखले जातात व त्या लढाईच्या स्मृत्यर्थ ‘झांगर दिन’ साजरा केला जातो. लेफ्ट. जनरल सिंग यांनी या कार्यक्रमात स्मृतीस्तंभावर पुष्कचक्र वाहिले व शहीद जवानांच्या कुटुंबियाशीही संवाद साधला.