शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

काश्मीरमध्ये परिस्थिती चिघळली! खुलेआम फिरताहेत दहशतवादी

By admin | Updated: April 18, 2017 12:06 IST

जम्मू आणि काश्मीरमधील वातावरण दिवसेंदिवस स्फोटक होत चालले असून, पोटनिवडणुकीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर आता

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 18 - जम्मू आणि काश्मीरमधील वातावरण दिवसेंदिवस स्फोटक होत चालले असून,  पोटनिवडणुकीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर आता दहशतवादी संघटनांमध्ये दाखल झालेले काश्मिरी युवक शस्त्रास्त्रांसह काश्मीर खोऱ्यातील रस्त्यांवर खुलेआम फिरत आहे. या तरुणांना राज्यशासनावर विश्वास राहिला नसून, लष्करासाठीही हे तरुण डोकेदुखी ठरत आहेत. त्यांना स्थानिकांचा पाठिंबा असल्याने लष्करालाही त्यांच्याविरोधात कारवाई करताना सावधगिरी बाळगावी लागत आहे.
यासंदर्भातील वृत्त मुंबई मिरर या वृत्तपत्रात प्रकाशित झाले आहे. काश्मीरमधील शोपियाँ, कुलगाम, पुलवामा आणि अवंतीपोरामध्ये हे दहशतवादी रस्त्यांवरून बंदुका शस्त्रास्त्रे घेऊन भटकत असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. संबंधित वृत्तपत्राने आपल्याकडे यासंदर्भातील छायाचित्रे आणि व्हिडिओ असल्याचा दावाही केला आहे. यामध्ये बरेच काश्मिरी तरुण एके-47  आणि रायफल्स घेऊन एका बागेमध्ये जमल्याचे दिसत आहे. 
गेल्या वर्षी 8 जुलै रोजी लष्कराने बुऱ्हाण वानी या कुख्यात दहशतवाद्याचा खात्मा केला होता. त्यानंतर काश्मिरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला. तसेच अनेक तरुणांनी दहशतवादाची वाट धरली होती. उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे युवा दहशतवादी लष्कर आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांमध्ये सामील झालेले आहेत. बुऱ्हाण वाणीला ठार मारण्यात आल्यापासून सुमारे 200 हून अधिक तरुण दहशतवादी संघटनांमध्ये दाखल झाले आहेत.  दक्षिण काश्मीरमध्ये या दहशतवाद्यांना बऱ्यापैकी समर्थन मिळत आहे. स्थानिकांकडून त्यांना आसरा आणि अन्नपाणी मिळत आहे. दहशतवाद्यांशी चकमक सुरू असल्यास त्याठिकाणी दगडफेक आणि आंदोलन केले जात आहे. 
अजून एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही अशीच माहिती दिली आहे.  दक्षिण काश्मीरमधील परिस्थिती अत्यंत स्फोटक असून, कारवाईची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. 90 च्या दशकाशी तुलना केली असता स्थानिकांची दहशतवादाबाबतची धारणा बदलली आहे. दहशतवादी आणि हुर्रियतचे नेते स्थानिकांना भरकटवत आहेत.  तसेच सोशल मीडियाही अशा तरुणांना दहशतवादाकडे आकर्षित करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.