शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
3
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
4
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
5
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
6
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
7
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
8
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
9
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
10
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
11
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
12
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
13
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
14
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
15
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
16
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
17
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
18
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
19
Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या
20
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?

काश्मीरचे राज्यपाल बदलणार?

By admin | Updated: August 29, 2016 02:42 IST

गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या २५ आॅगस्टच्या काश्मीर दौऱ्यानंतर केंद्र सरकारने जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन.एन. वोहरा यांना बदलण्याची तयारी चालवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीगृहमंत्री राजनाथसिंह यांच्या २५ आॅगस्टच्या काश्मीर दौऱ्यानंतर केंद्र सरकारने जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन.एन. वोहरा यांना बदलण्याची तयारी चालवल्याची माहिती सूत्रांनी दिली. काश्मीरमधे अजूनही तणावाची स्थिती आहे. ८ जुलैपासून व्यापार, व्यवसाय, कार्यालये, दुकाने, शाळा सारेकाही ठप्प आहे. रविवारी राज्यात कर्फ्युचा ५१वा दिवस होता. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात सलग ५१ दिवस संचारबंदी लागू असल्याचे बहुधा हे पहिलेच उदाहरण असावे. वोहरा यांच्या जागेवर राज्यपाल पदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते निवृत्त मेजर जनरल भुवनचंद्र खंडुरी, माजी गृहसचिव अनिल बैजल, निवृत्त लेफ्टनंट जनरल सैयद अता हसेनन व निवृत्त जनरल वेदप्रकाश मलिक, मिझोरमचे माजी राज्यपाल अमोलक रतन कोहली व दिल्लीचे माजी उपराज्यपाल विजय कपूर अशी ६ नावे नावे चर्चेत आहेत. कोण आहेत वोहरा?राज्यपाल एन.एन. वोहरा माजी नोकरशहा आहेत. १९९७ ते १९९८ या काळात ते पंतप्रधानांचे मुख्य सचिव होते. २00७ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी राज्यपाल जगमोहन व विद्यमान राज्यपाल वोहरा यांच्या कारकिर्दीच्या अगोदर सैन्यदलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडेच जम्मू काश्मीरचे राज्यपालपद सोपवले जात असे. १९८९ साली काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचा प्रारंभ झाला. त्यानंतर २00८ साली एन.एन. वोहरांच्या हाती राज्यपालपदाची सूत्रे सोपवण्यात आली. २0१३ साली दुसऱ्या कार्यकालासाठी केंद्र सरकारने त्यांची पुनर्नियुक्ती केली. बुऱ्हाण वाणीच्या वडिलांनी रविशंकर यांच्याशी केली चर्चा १ सुरक्षा दलाशी चकमकीत मारला गेलेला हिज्बुलचा अतिरेकी बुऱ्हाण वाणी याचे वडील मुजफ्फर वाणी यांनी ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्याशी बंगळुरूस्थित आश्रमात चर्चा केली. मुजफ्फर वाणी यांनी फोनवरून वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गत आठवड्यात आपण बंगळुरूत खासगी कामानिमित्त गेलो होतो. या वेळी श्री श्री रविशंकर यांच्याशी चर्चा केली. श्री श्री रविशंकर हे शांतिपुरुष आहेत. त्यांना आपण काश्मीरमधील परिस्थितीची माहिती दिली. वाणी असेही म्हणाले की, आपण श्री श्री रविशंकर यांना या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी आपल्या प्रभावाचा उपयोग करण्याचे आवाहन केले आहे. २ श्री श्री रविशंकर यांनी मला विचारले की, काश्मीरच्या जनतेला काय हवे आहे? त्यावर आपण त्यांना काश्मिरात येऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे आवाहन केले, असेही वाणी म्हणाले. शिक्षक असलेल्या वाणी यांनी सांगितले की, काश्मीरप्रश्नी दीर्घकालीन तोडगा काढण्यास फुटीरवाद्यांसोबत विनाअट चर्चा व्हायला हवी. हुर्रियत हे काश्मीरचे नेतृत्व आहे आणि त्यांच्याशी विनाअट चर्चा व्हायला हवी.