शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये आठ जवान शहीद

By admin | Updated: June 26, 2016 04:58 IST

जम्मू आणि काश्मिरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) बसवर दहशतवाद्यांनी शनिवारी केलेल्या हल्ल्यात आठ जवान शहीद तर २१ जखमी झाले. सुरक्षा दलावरील गेल्या

श्रीनगर : जम्मू आणि काश्मिरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) बसवर दहशतवाद्यांनी शनिवारी केलेल्या हल्ल्यात आठ जवान शहीद तर २१ जखमी झाले. सुरक्षा दलावरील गेल्या काही वर्षांतील हा सर्वात घातक हल्ला असून त्याचे स्वरुप पहाता तो लष्कर ए तोयबाने घडवून आणलेला आत्मघाती हल्ला असल्याचे दिसते. यावेळी झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले.दहशतवाद्यांच्या मृतदेहांवरून प्रथमदृष्ट्या ते पाकिस्तानी असल्याचे दिसते. ते लष्कर ए तोयबाचे सदस्य तसेच फिदायीन असण्याची शक्यता आहे, असे सीआरपीएफचे महानिरीक्षक नलीन प्रभात यांनी सांगितले.गोळीबाराच्या सरावानंतर जवानांची बस श्रीनगरला परतत होती. तेव्हा दोघांनी बसला लक्ष्य केले. ते एका कारमधून उतरले आणि त्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यांचा बसमध्ये प्रवेशाचा इरादा होता. मात्र, तत्पूर्वीच सीआरपीएफच्या रोड ओपनिंग पार्टीने (आरओपी) त्यांना ठार केले, असे प्रभात यांनी सांगितले. २१ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी चार जणांची प्रकृति गंभीर असल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यात आणखी दोन दहशतवादी सहभागी होते, असे सांगितले जाते. तथापि, अधिकृत सूत्रांकडून याला दुजोरा मिळू शकला नाही. (वृत्तसंस्था)सुरक्षा दलांना लक्ष्य करून केलेला गेल्या तीन आठवड्यांतील हा तिसरा व २४ जून २०१३ नंतरचा सर्वात घातक दहशतवादी हल्ला आहे. २०१३ मध्ये श्रीनगरजवळील हैैदरपुरा येथे लष्करी दलांवर करण्यात आलेल्या हल्ल्यात नऊ जवान शहीद झाले होते.