शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

काश्मीरला भारतापासून वेगळं करणाऱ्यांशी चर्चा नाही

By admin | Updated: April 28, 2017 19:19 IST

काश्मीरमध्ये परिस्थिती वारंवार बिघडत चालली आहे. काश्मीरमध्ये आम्हाला शांतता हवी आहे. यासंबंधी राजकीय पक्षांशी चर्चा होऊ शकते. मात्र

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - काश्मीरमध्ये परिस्थिती वारंवार बिघडत चालली आहे. काश्मीरमध्ये आम्हाला शांतता हवी आहे. यासंबंधी राजकीय पक्षांशी चर्चा होऊ शकते. मात्र स्वातंत्र्य मागून काश्मीरला भारतापासून वेगळं मागणाऱ्या फुटीरतावाद्यांशी कोणतीच चर्चा होऊ शकत नाही असे केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. काश्मीरमधील पेलेट गनच्या वापराविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी मुख्य न्यायमुर्ती जे एस खेहर यांच्या खंडपीठासमोर झाली. काश्मीरमधील पेलेट गनच्या वापरावर आम्ही बंदी घालण्याचा आदेश देतो, मात्र स्थानिकांकडून होणारी दगडफेक थांबेल असा विश्वास देऊ शकता का? असा सवाल सुप्रीम कोर्टानं काश्मीर बार असोसिएशनसमोर उपस्थित केला. खंडपीठानं दगडफेक आणि स्थानिकांकडून होणाऱ्या उपद्रवावर सकारात्मक तोडगा कसा काढता येईल असा सवालही उपस्थित केला आहे. तसंच याचिकाकर्त्यांना सर्प पक्षांशी बातचित करुन परिस्थिती कशी नियंत्रणात आणता येईल याचा विचार करण्यास सांगितलं आहे.जमावाकडून होणारी जोरदार दगडफेक रोखण्यासाठीच पॅलेट गन्स चालवावी लागल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं. यावेळी काही महत्त्वाच्या गोष्टीही केंद्राने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याप्रकरणी पुढील सुनावणी 9 मे रोजी होणार आहे.