शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

काश्मीरमधील व्यवहार विस्कळीतच

By admin | Updated: July 15, 2016 02:34 IST

संचारबंदीसारखे निर्बंध आणि फुटीरवाद्यांनी दिलेल्या बंदच्या हाकेमुळे काश्मीर खोऱ्यातील दैनंदिन जीवन गुरुवारी सलग सहाव्या दिवशीही विस्कळीत होते

श्रीनगर : संचारबंदीसारखे निर्बंध आणि फुटीरवाद्यांनी दिलेल्या बंदच्या हाकेमुळे काश्मीर खोऱ्यातील दैनंदिन जीवन गुरुवारी सलग सहाव्या दिवशीही विस्कळीत होते. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनी याचा ८ जुलै रोजी पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर खोऱ्यात उसळलेल्या हिंसाचारात ठार झालेल्यांची संख्या ३६ वर गेली आहे. श्रीनगरचा काही भाग, उत्तर काश्मीर आणि दक्षिण काश्मीरच्या चार जिल्ह्यांमध्ये ९ जुलैपासून नागरिकांच्या हालचालींवर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी घातलेली बंधने अजूनही कायम आहेत. त्यामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असून, भाजीपाला व किराणा मालासाठीही घराबाहेर पडणे लोकांना अशक्य झाले आहे.सार्वजनिक वाहतूक सलग सहाव्या दिवशी बंद आहे. दुकाने, खासगी कार्यालये, पेट्रोलपंप बंद असून, सरकारी कार्यालयांत उपस्थिती तुरळक आहे. बँकांचे व्यवहारही बंद असून, एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाणेही अवघड झाले आहे.त्यामुळे लोकांमध्ये अधिक राग आहे. वनीच्या मृत्यूनंतर फुटीरवाद्यांनी चार वेळा संपाची हाक दिली आहे. दुकाने, आस्थापना आता शुक्रवारपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन फुटीरवाद्यांनी केले आहे. ८ जुलैपासून लोकांना त्यांनी संप पाळण्यास सांगितले होते.दरम्यान, पोलीस आणि सशस्त्र दलाच्या जवानांनी केलेल्या छर्ऱ्याच्या माऱ्यात डोळ्यांना इजा झालेल्यांची संख्या १00हून अधिक झाली आहे. वेळेत उपचार न झाल्यास त्यांना अंधत्व येण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे ज्यांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे, त्यांना दिल्लीत उपचारासाठी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (वृत्तसंस्था)खोळंबासंप आणि निर्बंधांमुळे मोठ्या संख्येने लोकांनी विवाह समारंभ पुढे ढकलले आहेत. अनेक कुटुंबे विवाह समारंभ पारंपरिक थाटमाट टाळून व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अतिशय साध्या पद्धतीने करीत आहेत. खोऱ्यातील वृत्तपत्रांमध्ये विवाह समारंभ रद्द झाल्याच्या छोट्या जाहिराती रोजच्या रोज प्रसिद्ध होत आहेत.