शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कसाबने बिर्याणी मागितलीच नव्हती

By admin | Updated: March 21, 2015 23:53 IST

मुंबई दहशतवादी हल्ल्यात जिवंत राहिलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याने कारागृहात बंदिस्त असताना कधीही मटण बिर्याणीची मागणी केली नव्हती.

उज्ज्वल निकम : सहानुभूतीला काटशह दिल्यानेच जनक्षोभाची निर्मितीजयपूर: मुंबई दहशतवादी हल्ल्यात जिवंत राहिलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याने कारागृहात बंदिस्त असताना कधीही मटण बिर्याणीची मागणी केली नव्हती. त्याच्याबद्दल लोकांना वाटत असलेल्या सहानुभूतीची जागा संतापाने घ्यावी, या हेतूने अशा प्रकारच्या अफवा पसरविण्यात आल्या होत्या, असा धक्कादायक खुलासा ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला आहे.सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादावर शुक्रवारी येथे आयोजित एका आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी निकम येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, या दहशतवादी हल्ल्याच्या सुनावणीदरम्यान माध्यमांची कसाबच्या हालचालींवर बारीक नजर होती. तो केव्हा हसतो, केव्हा रडतो याचीही नोंद घेतली जात असे. त्याचा एक किस्साही निकम यांनी सांगितला. कसाबने एक दिवस याचाच फायदा घेत सुनावणीच्या वेळी गुडघ्यात मान घालून डोळ्यातील अश्रू पुसले. त्यानंतर माध्यमांनी लगेच कसाब रडल्याची बातमी प्रसिद्ध केली. योगयोग म्हणजे त्या दिवशी राखीपौर्णिमा होती. त्यामुळे कसाबच्या या वृत्ताला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. कसाबला आपल्या बहिणीची आठवण झाली म्हणूनच तो रडला, असा कयास या वृत्तांमध्ये लावण्यात आला होता. (वृत्तसंस्था)कसाबने कधी बिर्याणी मागितली नाही आणि शासनाने कधी पुरविली नाही, असे निकम यांनी स्पष्ट केले. मूळ पाकिस्तानी असलेल्या कसाबला हल्ला झाल्यानंतर चार वर्षांनी नोव्हेंबर २०१२ मध्ये पुण्याच्या येरवडा तुरुंगात फासावर लटकविण्यात आले.