शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

कसाबने बिर्याणी मागितलीच नव्हती

By admin | Updated: March 21, 2015 23:53 IST

मुंबई दहशतवादी हल्ल्यात जिवंत राहिलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याने कारागृहात बंदिस्त असताना कधीही मटण बिर्याणीची मागणी केली नव्हती.

उज्ज्वल निकम : सहानुभूतीला काटशह दिल्यानेच जनक्षोभाची निर्मितीजयपूर: मुंबई दहशतवादी हल्ल्यात जिवंत राहिलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याने कारागृहात बंदिस्त असताना कधीही मटण बिर्याणीची मागणी केली नव्हती. त्याच्याबद्दल लोकांना वाटत असलेल्या सहानुभूतीची जागा संतापाने घ्यावी, या हेतूने अशा प्रकारच्या अफवा पसरविण्यात आल्या होत्या, असा धक्कादायक खुलासा ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला आहे.सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादावर शुक्रवारी येथे आयोजित एका आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी निकम येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, या दहशतवादी हल्ल्याच्या सुनावणीदरम्यान माध्यमांची कसाबच्या हालचालींवर बारीक नजर होती. तो केव्हा हसतो, केव्हा रडतो याचीही नोंद घेतली जात असे. त्याचा एक किस्साही निकम यांनी सांगितला. कसाबने एक दिवस याचाच फायदा घेत सुनावणीच्या वेळी गुडघ्यात मान घालून डोळ्यातील अश्रू पुसले. त्यानंतर माध्यमांनी लगेच कसाब रडल्याची बातमी प्रसिद्ध केली. योगयोग म्हणजे त्या दिवशी राखीपौर्णिमा होती. त्यामुळे कसाबच्या या वृत्ताला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. कसाबला आपल्या बहिणीची आठवण झाली म्हणूनच तो रडला, असा कयास या वृत्तांमध्ये लावण्यात आला होता. (वृत्तसंस्था)कसाबने कधी बिर्याणी मागितली नाही आणि शासनाने कधी पुरविली नाही, असे निकम यांनी स्पष्ट केले. मूळ पाकिस्तानी असलेल्या कसाबला हल्ला झाल्यानंतर चार वर्षांनी नोव्हेंबर २०१२ मध्ये पुण्याच्या येरवडा तुरुंगात फासावर लटकविण्यात आले.