शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

कर्नाटक निकालांमुळे आर्थिक चिंता वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:06 IST

आश्वासनांची पूर्ती करताना दमछाक : ग्रामीण भागांवर लक्ष द्यावे लागणार

नवी दिल्ली : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मोदी सरकारसमोर २०१९च्या लोकसभा निवडणुकीचे मोठे आव्हान असून, त्यासाठी आतापर्यंत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना आर्थिक गाडा रूळांवरून सरकण्याची भीती आहे. ग्रामीण भारतावर अधिक खर्च करताना वित्तीय तूट फुगण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी हा चिंतेचा विषय ठरणार आहे.भारताच्या ग्रामीण भागात ६८ टक्के लोकसंख्या राहते. मतदारांचा हा सर्वांत मोठा घटक आहे. २0२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले होते. पण त्यावर काहीही काम झालेले नाही. त्यामुळे मोदी यांना काँग्रेसकडून मोठे आव्हान मिळत असल्याचे कर्नाटक आणि गुजरात निवडणुकीत दिसून आले आहे. कर्नाटक निवडणुकीच्या आधीपासूनच अर्थसंकल्पावर ताण होता. २0१८ वित्त वर्षात वित्तीय तुटीचे उद्दिष्ट सरकारला पाळता आले नाही. या वर्षासाठीचे उद्दिष्ट सकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३.३ टक्के करण्यात आले आहे. त्यातच कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. या वर्षात रुपया डॉलरच्या तुलनेत ६ टक्क्यांनी घसरला आहे. महागाईत वाढ होत आहे. भारताचे आर्थिक परिदृश्य काळवंडले आहे. या सर्वांचा ताण अर्थसंकल्पावर पडेल. ‘कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटिज’चे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सुवोदीप रक्षित यांनी सांगितले की, कर्नाटक निवडणुका अर्थव्यवस्थेसाठी अनिश्चिततेचा अतिरिक्त स्रोत बनल्या आहेत. तसेही निवडणुकीपूर्वीच्या वर्षात वित्तीय घसरणीची जोखीम असतेच. कच्च्या तेलाच्या किमतींनी चित्र अधिक बिकट केले आहे. यंदा वित्तीय तूट ३.५ टक्के राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे वित्तीय तूट वाढेल‘एचएसबीसी होल्डिंग पीएलसी’च्या भारतातील मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी सांगितले की, निवडणुकीच्या दबावामुळे सरकार पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढविण्याऐवजी उत्पादन शुल्कात कपात करेल. त्यामुळे वित्तीय तूट वाढेल. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १0 डॉलरने वाढल्यास भारताची वित्तीय तूट 0.३ टक्क्यांनी वाढेल.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८