शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
4
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
5
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
6
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
7
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
8
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
9
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
10
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
11
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
12
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
13
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
14
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
15
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
16
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
17
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
18
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
19
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
20
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी

Karnataka Assembly Elections 2018 : नरेंद्र मोदी-राहुल गांधी यांचे परस्परांवर जोरदार हल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 01:57 IST

कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभांमुळे राजकीय वातावरण भलतेच तापले असून, इंदिरा गांधी यांच्या काळापासून काँग्रेस जनतेला मूर्ख बनवत आली असल्याचा गंभीर आरोप मोदी यांनी केला, तर कर्नाटकातील तुमच्याच पक्षातील मोस्ट वाँटेड उमेदवारांच्या नेत्यांबद्दल मोदी यांनी मौन सोडून बोलावे, असे तगडे आव्हान राहुल गांधी यांनी दिले.

बंगळुरू : कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभांमुळे राजकीय वातावरण भलतेच तापले असून, इंदिरा गांधी यांच्या काळापासून काँग्रेस जनतेला मूर्ख बनवत आली असल्याचा गंभीर आरोप मोदी यांनी केला, तर कर्नाटकातील तुमच्याच पक्षातील मोस्ट वाँटेड उमेदवारांच्या नेत्यांबद्दल मोदी यांनी मौन सोडून बोलावे, असे तगडे आव्हान राहुल गांधी यांनी दिले.बुगळुरूजवळील टुमकूरच्या सभेत मोदी यांनी काँग्रेसने गरिबांसाठी आतापर्यंत काहीच केले नसल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, इंदिरा गांधी यांच्या काळापासून काँग्रेस गरीब, गरीब, गरीब असा शंखनाद करीत आली, पण गरिबी दूर करण्यासाठी, गरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या पक्षाने काहीच केले नाही. कर्नाटकातही काँग्रेस नेत्यांनी गरिबांच्या नावाखाली स्वत:चे खिसे भरण्याचे काम केले, असे ते म्हणाले.पण राहुल गांधी यांनी भाजपाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व वादग्रस्त नेत्यांची नावे घेऊ न, पंतप्रधानांनी तुरुंगात जाऊ न आलेल्या येडियुरप्पांविषयी आणि रेड्डी बंधू यांच्याविषयी बोलावे, असे आव्हान त्यांना दिले. राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ क्लिप जारी केली असून, त्यात अशा भाजपा नेत्यांचा थेट नावाने उल्लेख केला आहे. त्यांना दिलेल्या उमेदवारीबद्दल मोदी यांनी पाच मिनिटे तरी बोलावे, असा आग्रह राहुल यांनी धरला आहे.रेड्डी बंधूंच्या तब्बल ३५ हजार कोटीच्या खाण घोटाळ्यावर तुम्ही पांघरूण टाकले, असे राहुल गांधी यांनी व्हिडिओत ऐकविले आहे. मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे. या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी तुम्ही कागद वापरला तरी चालेल, असा टोलाही त्यांनी मोदी यांना लगावला आहे. (वृत्तसंस्था)क्लिपमध्ये वादग्रस्त नेत्यांची नावेभ्रष्टाचार, फसवणूक, खोटी कागदपत्रे तयार करणे असे गंभीर गुन्हे असलेल्या येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार केले असल्याचा उल्लेख करणाऱ्या राहुल गांधी यांनी या क्लिपमध्ये बी. श्रीरामुलू, जी. सोमशेखर रेड्डी, टी. एच. सुरेश बाबू, के. सुब्रमण्यम नायडू, सी. टी. रवी, मुरुगेश निराणी, एस एन कृष्णय्या शेट्टी मालूर, के. शिवगौडा नाईक, आर. अशोक व शोभा करंदलाजे या गुन्हे दाखल असलेल्या भाजपाच्या नेत्यांची व उमेदवारी नावे घेतली आहेत.निवडणुकांनंतर काँग्रेस पीपीपी : मोदीगदगमधील सभेत मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, कर्नाटकमधील पराभवानंतर काँग्रेस केवळ पीपीपी म्हणजेच पंजाब, पुडुच्चेरी व परिवार यांच्यापुरतीच शिल्लक राहील. कर्नाटकातून काँग्रेस नेत्यांना दिल्लीत मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असून, तो कायम राहावा, यासाठी काँग्रेस प्रयत्न करीत आहेत, असे ते म्हणाले.भाजपाचा तो कार्यकर्ता जिवंतचकाँग्रेसच्या काळात कर्नाटकातील भाजपाचे २३ कार्यकर्ते शहीद झाले, असे म्हणत, काँग्रेसवर जिहादी असल्याचा आरोप भाजपाने केला होता. पंतप्रधान मोदी यांनीही २३ जणांचा सभेत उल्लेख केला होता. त्या २३ जणांच्या यादीत पहिले नाव होते, अशोक पुजारी यांचे.तो २0 सप्टेंबर २0१५ रोजी हुतात्मा झाला, असे भाजपा नेत्याने म्हटले होते, पण अशोक पुजारी अद्याप जिवंतच आहेतं, असे उघड झाले आहे. त्यानंतर, भाजपाच्या उडुपीतील खा. शोभा करंदलाजे यांनी दिलगिरी व्यक्त केली.मात्र, विश्व हिंदू परिषदेचे नेते जगदीश शेणवाई म्हणाले की, भाजपाने त्यांचे नाव दिले असेल, तर ते खरेच असेल. भाजपा खोटी माहिती कधीच देणार नाही.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी