शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
2
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
3
कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
पाकिस्तानच्या शेअर बाजारात पैशांचा पाऊस, भारत राहिला मागे; एक्सपर्ट म्हणाले, "पुढच्या १० वर्षांत..."
5
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
6
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
7
२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना
8
Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
9
देव दिवाळी २०२५: ९ राशींना शुभ-लाभ, मनासारखे यश; ठरलेली कामे होतील, पैसा मिळेल, पण मोह टाळा!
10
रशियाचं भारतप्रेम वाढलं! कच्चं तेल-गॅसनंतर आता दिली 'ही' मोठी ऑफर; अमेरिकेला लागणार झटका?
11
Mumbai Weather: मुंबईत हुडहुडी! १२ वर्षांत पहिल्यांदाच 'इतक्या' नीचांकी ताममानाची नोंद
12
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
13
"त्या माणसाच्या अवयवांचा माज ठेचायला हवा...", मालेगावात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या, मराठी अभिनेत्री संतापली
14
नेपाळमध्ये पुन्हा भडकलं Gen Z आंदोलन, युवक रस्त्यावर उतरले; कर्फ्यू लागू, एअरपोर्ट सेवा बंद
15
Mumbai: जोडीदाराकडून आत्महत्येची वारंवार धमकी ही क्रूरताच: मुंबई उच्च न्यायालय
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; Nifty २६,१०० च्या जवळ, मेटल-ऑटो शेअर्समध्ये खरेदी
17
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
18
लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत घुसून मारू; हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याची PoKची कबुली
19
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
20
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Assembly Elections 2018 : नरेंद्र मोदी-राहुल गांधी यांचे परस्परांवर जोरदार हल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 01:57 IST

कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभांमुळे राजकीय वातावरण भलतेच तापले असून, इंदिरा गांधी यांच्या काळापासून काँग्रेस जनतेला मूर्ख बनवत आली असल्याचा गंभीर आरोप मोदी यांनी केला, तर कर्नाटकातील तुमच्याच पक्षातील मोस्ट वाँटेड उमेदवारांच्या नेत्यांबद्दल मोदी यांनी मौन सोडून बोलावे, असे तगडे आव्हान राहुल गांधी यांनी दिले.

बंगळुरू : कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभांमुळे राजकीय वातावरण भलतेच तापले असून, इंदिरा गांधी यांच्या काळापासून काँग्रेस जनतेला मूर्ख बनवत आली असल्याचा गंभीर आरोप मोदी यांनी केला, तर कर्नाटकातील तुमच्याच पक्षातील मोस्ट वाँटेड उमेदवारांच्या नेत्यांबद्दल मोदी यांनी मौन सोडून बोलावे, असे तगडे आव्हान राहुल गांधी यांनी दिले.बुगळुरूजवळील टुमकूरच्या सभेत मोदी यांनी काँग्रेसने गरिबांसाठी आतापर्यंत काहीच केले नसल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, इंदिरा गांधी यांच्या काळापासून काँग्रेस गरीब, गरीब, गरीब असा शंखनाद करीत आली, पण गरिबी दूर करण्यासाठी, गरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या पक्षाने काहीच केले नाही. कर्नाटकातही काँग्रेस नेत्यांनी गरिबांच्या नावाखाली स्वत:चे खिसे भरण्याचे काम केले, असे ते म्हणाले.पण राहुल गांधी यांनी भाजपाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व वादग्रस्त नेत्यांची नावे घेऊ न, पंतप्रधानांनी तुरुंगात जाऊ न आलेल्या येडियुरप्पांविषयी आणि रेड्डी बंधू यांच्याविषयी बोलावे, असे आव्हान त्यांना दिले. राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ क्लिप जारी केली असून, त्यात अशा भाजपा नेत्यांचा थेट नावाने उल्लेख केला आहे. त्यांना दिलेल्या उमेदवारीबद्दल मोदी यांनी पाच मिनिटे तरी बोलावे, असा आग्रह राहुल यांनी धरला आहे.रेड्डी बंधूंच्या तब्बल ३५ हजार कोटीच्या खाण घोटाळ्यावर तुम्ही पांघरूण टाकले, असे राहुल गांधी यांनी व्हिडिओत ऐकविले आहे. मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे. या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी तुम्ही कागद वापरला तरी चालेल, असा टोलाही त्यांनी मोदी यांना लगावला आहे. (वृत्तसंस्था)क्लिपमध्ये वादग्रस्त नेत्यांची नावेभ्रष्टाचार, फसवणूक, खोटी कागदपत्रे तयार करणे असे गंभीर गुन्हे असलेल्या येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार केले असल्याचा उल्लेख करणाऱ्या राहुल गांधी यांनी या क्लिपमध्ये बी. श्रीरामुलू, जी. सोमशेखर रेड्डी, टी. एच. सुरेश बाबू, के. सुब्रमण्यम नायडू, सी. टी. रवी, मुरुगेश निराणी, एस एन कृष्णय्या शेट्टी मालूर, के. शिवगौडा नाईक, आर. अशोक व शोभा करंदलाजे या गुन्हे दाखल असलेल्या भाजपाच्या नेत्यांची व उमेदवारी नावे घेतली आहेत.निवडणुकांनंतर काँग्रेस पीपीपी : मोदीगदगमधील सभेत मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, कर्नाटकमधील पराभवानंतर काँग्रेस केवळ पीपीपी म्हणजेच पंजाब, पुडुच्चेरी व परिवार यांच्यापुरतीच शिल्लक राहील. कर्नाटकातून काँग्रेस नेत्यांना दिल्लीत मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असून, तो कायम राहावा, यासाठी काँग्रेस प्रयत्न करीत आहेत, असे ते म्हणाले.भाजपाचा तो कार्यकर्ता जिवंतचकाँग्रेसच्या काळात कर्नाटकातील भाजपाचे २३ कार्यकर्ते शहीद झाले, असे म्हणत, काँग्रेसवर जिहादी असल्याचा आरोप भाजपाने केला होता. पंतप्रधान मोदी यांनीही २३ जणांचा सभेत उल्लेख केला होता. त्या २३ जणांच्या यादीत पहिले नाव होते, अशोक पुजारी यांचे.तो २0 सप्टेंबर २0१५ रोजी हुतात्मा झाला, असे भाजपा नेत्याने म्हटले होते, पण अशोक पुजारी अद्याप जिवंतच आहेतं, असे उघड झाले आहे. त्यानंतर, भाजपाच्या उडुपीतील खा. शोभा करंदलाजे यांनी दिलगिरी व्यक्त केली.मात्र, विश्व हिंदू परिषदेचे नेते जगदीश शेणवाई म्हणाले की, भाजपाने त्यांचे नाव दिले असेल, तर ते खरेच असेल. भाजपा खोटी माहिती कधीच देणार नाही.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी