शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

कर्मयोगी मोठे भाऊ अशोक जैन : शेतकरी आणि सर्वसामान्यांना मानला परिवार

By admin | Updated: February 27, 2016 00:22 IST

परिवार या शब्दाची व्याख्या मोठे भाऊ यांच्या दृष्टीने केवळ आमच्या परिवारापुरती मर्यादित नव्हती. आमचे कुटुंब, जैन इरिगेशन कंपनीतील सहकारी, शेतकरी तसेच सर्वसामान्यांना ते परिवार मानत होते. कोट्यावधी लोकांमधून एखादे व्यक्तिमत्त्व हे मोठ्या भाऊंसारखे निर्माण होत असते. वर्षानुवर्षांचा कालखंड गेल्यानंतर असे माणसे तयार होत असतात. त्यांच्या निधनाने ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही. मोठ्या भाऊंनी छोटा, मोठा, गरीब, श्रीमंत असा कधी भेद केला नाही. या सर्वांच्या दृष्टीने मोठे भाऊ म्हणजे जमिनीवरचा माणूस आहे. जैन हिल्स् या भूमीला उभी करण्यासाठी त्यांनी २५ वर्षांपेक्षा जास्त कालखंड मेहनत घेतली. या ठिकाणी त्यांच्या हाताने लावण्यात आलेल्या वृक्ष व पशूपक्षांशी त्यांचा संवाद होता. या भूमीबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा होता. त्यांच्या अंतिम इच्छेबाबत त्यांनी आज नाही त्

परिवार या शब्दाची व्याख्या मोठे भाऊ यांच्या दृष्टीने केवळ आमच्या परिवारापुरती मर्यादित नव्हती. आमचे कुटुंब, जैन इरिगेशन कंपनीतील सहकारी, शेतकरी तसेच सर्वसामान्यांना ते परिवार मानत होते. कोट्यावधी लोकांमधून एखादे व्यक्तिमत्त्व हे मोठ्या भाऊंसारखे निर्माण होत असते. वर्षानुवर्षांचा कालखंड गेल्यानंतर असे माणसे तयार होत असतात. त्यांच्या निधनाने ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही. मोठ्या भाऊंनी छोटा, मोठा, गरीब, श्रीमंत असा कधी भेद केला नाही. या सर्वांच्या दृष्टीने मोठे भाऊ म्हणजे जमिनीवरचा माणूस आहे. जैन हिल्स् या भूमीला उभी करण्यासाठी त्यांनी २५ वर्षांपेक्षा जास्त कालखंड मेहनत घेतली. या ठिकाणी त्यांच्या हाताने लावण्यात आलेल्या वृक्ष व पशूपक्षांशी त्यांचा संवाद होता. या भूमीबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा होता. त्यांच्या अंतिम इच्छेबाबत त्यांनी आज नाही तर अनेक वर्षांपूर्वी सांगितले होते. १९९४ मध्ये त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी त्यांनी शस्त्रक्रियेनंतर आपले काय होणार याची शाश्वती नाही. मात्र जेव्हा केव्हा या देहाचा त्याग करील, त्यावेळी आपले अंत्यसंस्कार जैन हिल्स्च्या भूमीत व्हावे ही त्यांची अंतिम इच्छा होती. वर्क इज लाईफ ॲण्ड लाईफ इज वर्क या विचारानुसार सर्वसामान्यांसारखे जीवन जगणारे मोठे भाऊ हे कर्मयोगी होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबिय, जैन इरिगेशन कंपनीतील कर्मचारी, विविध समाजाचे आणि धर्माचे लोक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.