शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

कर्मयोगी मोठे भाऊ अशोक जैन : शेतकरी आणि सर्वसामान्यांना मानला परिवार

By admin | Updated: February 27, 2016 00:22 IST

परिवार या शब्दाची व्याख्या मोठे भाऊ यांच्या दृष्टीने केवळ आमच्या परिवारापुरती मर्यादित नव्हती. आमचे कुटुंब, जैन इरिगेशन कंपनीतील सहकारी, शेतकरी तसेच सर्वसामान्यांना ते परिवार मानत होते. कोट्यावधी लोकांमधून एखादे व्यक्तिमत्त्व हे मोठ्या भाऊंसारखे निर्माण होत असते. वर्षानुवर्षांचा कालखंड गेल्यानंतर असे माणसे तयार होत असतात. त्यांच्या निधनाने ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही. मोठ्या भाऊंनी छोटा, मोठा, गरीब, श्रीमंत असा कधी भेद केला नाही. या सर्वांच्या दृष्टीने मोठे भाऊ म्हणजे जमिनीवरचा माणूस आहे. जैन हिल्स् या भूमीला उभी करण्यासाठी त्यांनी २५ वर्षांपेक्षा जास्त कालखंड मेहनत घेतली. या ठिकाणी त्यांच्या हाताने लावण्यात आलेल्या वृक्ष व पशूपक्षांशी त्यांचा संवाद होता. या भूमीबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा होता. त्यांच्या अंतिम इच्छेबाबत त्यांनी आज नाही त्

परिवार या शब्दाची व्याख्या मोठे भाऊ यांच्या दृष्टीने केवळ आमच्या परिवारापुरती मर्यादित नव्हती. आमचे कुटुंब, जैन इरिगेशन कंपनीतील सहकारी, शेतकरी तसेच सर्वसामान्यांना ते परिवार मानत होते. कोट्यावधी लोकांमधून एखादे व्यक्तिमत्त्व हे मोठ्या भाऊंसारखे निर्माण होत असते. वर्षानुवर्षांचा कालखंड गेल्यानंतर असे माणसे तयार होत असतात. त्यांच्या निधनाने ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही. मोठ्या भाऊंनी छोटा, मोठा, गरीब, श्रीमंत असा कधी भेद केला नाही. या सर्वांच्या दृष्टीने मोठे भाऊ म्हणजे जमिनीवरचा माणूस आहे. जैन हिल्स् या भूमीला उभी करण्यासाठी त्यांनी २५ वर्षांपेक्षा जास्त कालखंड मेहनत घेतली. या ठिकाणी त्यांच्या हाताने लावण्यात आलेल्या वृक्ष व पशूपक्षांशी त्यांचा संवाद होता. या भूमीबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा होता. त्यांच्या अंतिम इच्छेबाबत त्यांनी आज नाही तर अनेक वर्षांपूर्वी सांगितले होते. १९९४ मध्ये त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी त्यांनी शस्त्रक्रियेनंतर आपले काय होणार याची शाश्वती नाही. मात्र जेव्हा केव्हा या देहाचा त्याग करील, त्यावेळी आपले अंत्यसंस्कार जैन हिल्स्च्या भूमीत व्हावे ही त्यांची अंतिम इच्छा होती. वर्क इज लाईफ ॲण्ड लाईफ इज वर्क या विचारानुसार सर्वसामान्यांसारखे जीवन जगणारे मोठे भाऊ हे कर्मयोगी होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबिय, जैन इरिगेशन कंपनीतील कर्मचारी, विविध समाजाचे आणि धर्माचे लोक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.