मुंबई : दोन वर्षांपासून वेगळे राहणारा अभिनेत्री करिष्मा कपूर हिचा पती संजय कपूर यांनी मुलांचा ताबा घेण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल कली आहे़ करिष्मा व संजयचा विवाह २००३मध्ये झाला़ या जोडप्याला समीर व किआन-राज अशी दोन मुले आहेत़ २००५मध्ये समीरचा तर २०१०मध्ये किआन-राजचा जन्म झाला़ या विवाहितांच्या संबंधांमध्ये काही वर्षांपूर्वी तणाव निर्माण झाला़ दोन वर्षांपासून दोघे एकमेकांपासून वेगळे राहतात़ काही दिवसांपूर्वी संजयने करिष्माकडे मुलांचा ताबा मागितला़ त्यास करिष्माने नकार दिला़ त्यामुळे संजय यांनी न्यायालयात धाव घेतली. या याचिकेची एक प्रत संजय यांनी करिष्माला पाठवली असून, येत्या काही दिवसांत या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
करिष्मा कपूरचा पती मुलांसाठी न्यायालयात
By admin | Updated: May 21, 2014 03:13 IST