शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कारेगाव ग्रामपंचायतीत सत्तांतर विकासाचा मुद्दा ठरला कळीचा

By admin | Updated: August 7, 2015 21:35 IST

शिरूर : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्यालगत असलेल्या वार्षिक दोन कोटी रुपयांचा महसूल असणार्‍या कोट्यधीश कारेगाव ग्रामपंचायतीमध्ये .... वर्षांनी सत्तापरिवर्तन झाले. महसूल वाढला, मात्र गावात अपेक्षित सोयी-सुविधा सत्ताधार्‍यांना उपलब्ध करून देता आल्या नाहीत. थोडक्यात विकास झाला नाही, या मुद्यावर विरोधकांनी निवडणूक लढवली आणि त्यात यशस्वीही झाले.

शिरूर : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्यालगत असलेल्या वार्षिक दोन कोटी रुपयांचा महसूल असणार्‍या कोट्यधीश कारेगाव ग्रामपंचायतीमध्ये .... वर्षांनी सत्तापरिवर्तन झाले. महसूल वाढला, मात्र गावात अपेक्षित सोयी-सुविधा सत्ताधार्‍यांना उपलब्ध करून देता आल्या नाहीत. थोडक्यात विकास झाला नाही, या मुद्यावर विरोधकांनी निवडणूक लढवली आणि त्यात यशस्वीही झाले.
पुणे-अहमदनगर रस्त्यावर असलेल्या कारेगावला पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे महत्त्व प्राप्त झाले. या गावाची रेकॉर्डनुसार लोकसंख्या पाच हजार असली तरी मोठ्या प्रमाणावर कामगारवर्ग येथे वसल्याने जवळपास २५ हजारांवर लोकसंख्या या गावात आहे. गावाच्या हद्दीत येणार्‍या कारखान्यांकडून मिळणार्‍या करामुळे गावाचे वार्षिक महसूल दोन कोटींवर गेले. या गावात गेल्या ... वर्षांपासून विश्वास --- व त्यांच्या सहकार्‍यांची सत्ता होती; १० वर्षांत यांच्याकडून अपेक्षित विकास झाला नाही, या मुद्यावर शंकर नवले व नाथा शेवाळे व दोघांचे सहकारी यांनी सत्ताधार्‍यांविरोधात पॅनल उभा केले. निकालही त्यांच्या बाजूने लागला.
शेवाळे यांना विजयाबाबत छेडले असता, ते म्हणाले, तालुक्यातील मोठे महसुली गाव असतानाही सत्ताधार्‍यांना अपेक्षित विकास करता आला नाही. आरोग्य, पाणी, रस्ते, वीज, शिक्षण आदींबाबत प्रश्न आहेत. झपाट्याने वाढणार्‍या गावात दहावीनंतर शिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही, चांगली व्यायामशाळा नाही, वाचनालय नाही, रस्त्याच्या कडेला बसशेड नाही, महिलांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. २५ हजारांवर लोकसंख्या मात्र गरज असताना ग्रामीण रुग्णालयही येथे नाही. दारात औद्योगिक वसाहत मात्र स्थानिकांना तेथे प्राधान्य नाही. यासाठी सत्ताधार्‍यांनी कधी प्रयत्न केले नाहीत. वाढत्या लोकसंख्येमुळे, वाढणार्‍या लोंढ्यामुळे रस्त्यावर होणारी गर्दी, वाहनांचा ताफा यासाठी साधी पार्किंग सुविधाही सत्ताधार्‍यांना उपलब्ध करून देता आली नाही. फक्त इमारती वाढल्या म्हणून विकास होत नसतो. पायाभूत सुविधा तसेच त्याला संलग्न इतरही सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
सत्तापरिवर्तन झाले खरे, मात्र नवीन कारभार्‍यांना दिलेली विजयाची वचने पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे. औद्योगिक वसाहतीमुळे नागरीकरण झपाट्याने वाढते आहे. याला ध्यानात घेऊन विकासाचा आराखडा तयार करणे गरजेचे आहे.
हे गाव पुणे-अहमदनगर या महामार्गावर आहे. या गावांतून वाहने जाताना मात्र मोठी कसरत करावी लागते. प्रचंड मोठा लोंढा नेहमीच या रस्त्यावर असतो. वाहने कशाही प्रकारे लावली जातात. याचे नियोजन ग्रामपंचायतीने करणे गरजेचे आहे.
०००००