शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कामठी... खत

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

रासायनिक खतांचा काळाबाजार

रासायनिक खतांचा काळाबाजार
महालगाव परिसरातील शेतकरी त्रस्त : पालकमंत्री व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
कामठी : तालुक्यातील नागपूर-भंडारा मार्गावरील महालगाव येथील कृषी सेवा केंद्र दुकानदारांकडून रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याची शेतकऱ्यांनी ओरड आहे. यामुळे महालगाव व परिसरातील शेतकरी त्रस्त असून याबाबत त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
महालगाव येथील एका कृषी सेवा केंद्रातून विविध प्रकारची रासायनिक खते व कीटकनाशक औषधांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. अश्विन इटनकर (रा. महालगाव, ता. कामठी) या शेतकऱ्याने १५ जानेवारीला युरिया रासायनिक खताची एक बॅग सदर कृषी सेवा केंद्र दुकानातून खरेदी केली. यात शेतकऱ्याने युरियाच्या एका बॅगेसाठी ३२० रुपये दुकानदारास दिले. परंतु सदर कृषी सेवा केंद्र मालकाने शेतकऱ्यास २९८ रुपयांची पावती दिली. शिवाय, दुकानदाराने शेतकऱ्यास पक्के बिल न देता डिलवरी मेमोची साधी पावती दिली.
येथील कृषी सेवा केंद्र दुकानदार शेतकऱ्यांना पक्के बिल न देता नेहमी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करीत असल्याचा आरोप सदर शेतकऱ्यांनी केला आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांची खरेदी केल्यानंतर एकाही शेतकऱ्यास मुख्य बिलाची प्रत न देता डिलवरी मेमोची पावती दिली जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दुकानावरील फलकांवर खतांच्या किमंतीचे दर, उपलब्ध साठा लावला जात नाही. कृषी सेवा केंद्रधारक अनेक दिवसांपासून रासायनिक खतांचा काळाबाजार करून शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत असल्याचे शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी २७ जानेवारी रोजी तालुका कृषी अधिकारी व मौदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे महालगावचे माजी सरपंच प्रकाश इटनकर यांच्या नेतृर्त्वात शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली आहे. खतांच्या काळाबाजार करणाऱ्या कृषी सेवा केंद्र दुकानदारांवर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी प्रकाश इटनकर, धनराज खांडेकर, हिरामण काटवले, कोठीराम ठाकरे, सुकराम मुळे, भोजराज मेश्राम, सुरेश शिंघाडे, अश्विन इटनकर आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)