शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

कामठी....

By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST

कामठेश्वर मंदिर बनले लाखो भाविकांचे श्रद्धास्थान

कामठेश्वर मंदिर बनले लाखो भाविकांचे श्रद्धास्थान
कन्हान नदी तीरावर गर्दी : महाशिवरात्री उत्सवाची जय्यत तयारी
कामठी : ३५० वर्षांपूर्वी कन्हान नदीच्या तीरावर जुनी कामठी येथील प्राचीन कामठेश्वर मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावर नागपूरसह महाराष्ट्रातून जवळपास चार ते पाच लाख भाविक येथे नतमस्तक होऊन आपल्या मनोकामना पूर्ण करतात. येथील मंदिरात महाशिवरात्री उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.
कन्हान (कर्णिका) नदीच्या तीरावर ३५० वर्षांपूर्वी भगवान शंकराचे प्राचीन ज्योतिर्लिंग कामठेश्वर मंदिर असून सूर्याची प्रथम किरणे ज्योतिर्लिंगावर पडत असतात. काही वर्षांपूर्वी राजे रघुजी भोसले कोणत्याही कामाची सुरुवात करण्यापूर्वी ज्योतिर्लिगाचे कामाष्टी यज्ञ करून आशीर्वाद घेत होते. त्यांच्या प्रत्येक कामाची सुरुवात ही यज्ञ करून होत असे. त्याच काळात भगवान श्रीराम प्रभू रामटेकवरून चित्रकूटला जात असताना जुनी कामठी कामठेश्वर मंदिरात काही वेळेसाठी वास्तव्य केले होते. त्यामुळेच या मंदिराला श्रद्धेचे स्थान प्राप्त झाले असल्याचे भाविकांनी सांगितले.
या मंदिराला ओंकारेश्वर महादेव मंदिर म्हणूनदेखील ओळखल्या जाते. मंदिराला राज्य शासनाकडून तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला असून मंदिर परिसरात भगवान शिवशंकर, श्रीगणेश भगवान, श्रीअन्नपूर्णामाता, भगवान विष्णू, भगवान नारायण देव यांची प्राचीन मूर्ती विराजमान आहे. या मंदिरात प्राचीन काळापासूनच महाशिवरात्री उत्सवानिमित्त अभिषेक पूजा, आरती केली जाते.
भगवान कामठेश्वराचे मंदिर कन्हान नदीच्या तीरावर असल्यामुळे मंदिर परिसर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. या परिसरात विविध विकास कामांना सुरुवात झाली आहे. मंदिरालगत उद्यान उभारले जाणार असल्याचे सांगण्यात आले. मंदिर पंचकमिटीच्या अध्यक्ष चित्रलेखा भोसले, जिजाताई आसोले, बाबूलाल हिरणवार, महादेव मामीलवार, अशोक अग्रवाल, श्रीराम कुशवाह, अनिल गडालिया, नरेश विज, युगचंद छल्लाणी, प्रकाश सिरिया, भूषण ज्योती, उत्तम सायरे, श्याम खंते, गजानन आसोले आदी अनेक भाविक उत्सवास सहकार्य करीत आहेत. महाशिवरात्री उत्सवानिमित्त ७ ते १७ फेब्रुवारीपर्यंत संगीतमय रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. १८ फेब्रुवारीला दहीकाला व महाप्रसाद सोबतच सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. या उत्सवाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पंचकमिटीने केले आहे. (तालुका प्रतिनिधी)