शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

कामठी....

By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST

कामठेश्वर मंदिर बनले लाखो भाविकांचे श्रद्धास्थान

कामठेश्वर मंदिर बनले लाखो भाविकांचे श्रद्धास्थान
कन्हान नदी तीरावर गर्दी : महाशिवरात्री उत्सवाची जय्यत तयारी
कामठी : ३५० वर्षांपूर्वी कन्हान नदीच्या तीरावर जुनी कामठी येथील प्राचीन कामठेश्वर मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावर नागपूरसह महाराष्ट्रातून जवळपास चार ते पाच लाख भाविक येथे नतमस्तक होऊन आपल्या मनोकामना पूर्ण करतात. येथील मंदिरात महाशिवरात्री उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.
कन्हान (कर्णिका) नदीच्या तीरावर ३५० वर्षांपूर्वी भगवान शंकराचे प्राचीन ज्योतिर्लिंग कामठेश्वर मंदिर असून सूर्याची प्रथम किरणे ज्योतिर्लिंगावर पडत असतात. काही वर्षांपूर्वी राजे रघुजी भोसले कोणत्याही कामाची सुरुवात करण्यापूर्वी ज्योतिर्लिगाचे कामाष्टी यज्ञ करून आशीर्वाद घेत होते. त्यांच्या प्रत्येक कामाची सुरुवात ही यज्ञ करून होत असे. त्याच काळात भगवान श्रीराम प्रभू रामटेकवरून चित्रकूटला जात असताना जुनी कामठी कामठेश्वर मंदिरात काही वेळेसाठी वास्तव्य केले होते. त्यामुळेच या मंदिराला श्रद्धेचे स्थान प्राप्त झाले असल्याचे भाविकांनी सांगितले.
या मंदिराला ओंकारेश्वर महादेव मंदिर म्हणूनदेखील ओळखल्या जाते. मंदिराला राज्य शासनाकडून तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला असून मंदिर परिसरात भगवान शिवशंकर, श्रीगणेश भगवान, श्रीअन्नपूर्णामाता, भगवान विष्णू, भगवान नारायण देव यांची प्राचीन मूर्ती विराजमान आहे. या मंदिरात प्राचीन काळापासूनच महाशिवरात्री उत्सवानिमित्त अभिषेक पूजा, आरती केली जाते.
भगवान कामठेश्वराचे मंदिर कन्हान नदीच्या तीरावर असल्यामुळे मंदिर परिसर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. या परिसरात विविध विकास कामांना सुरुवात झाली आहे. मंदिरालगत उद्यान उभारले जाणार असल्याचे सांगण्यात आले. मंदिर पंचकमिटीच्या अध्यक्ष चित्रलेखा भोसले, जिजाताई आसोले, बाबूलाल हिरणवार, महादेव मामीलवार, अशोक अग्रवाल, श्रीराम कुशवाह, अनिल गडालिया, नरेश विज, युगचंद छल्लाणी, प्रकाश सिरिया, भूषण ज्योती, उत्तम सायरे, श्याम खंते, गजानन आसोले आदी अनेक भाविक उत्सवास सहकार्य करीत आहेत. महाशिवरात्री उत्सवानिमित्त ७ ते १७ फेब्रुवारीपर्यंत संगीतमय रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. १८ फेब्रुवारीला दहीकाला व महाप्रसाद सोबतच सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. या उत्सवाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पंचकमिटीने केले आहे. (तालुका प्रतिनिधी)