शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

काळू धरणग्रस्तांचा पुन्हा बहिष्कार

By admin | Updated: October 9, 2014 04:10 IST

काळू धरणात बाधित होणारे ४१ गावांतील सर्वसामान्य नागरिक धरण होऊ नये, या मागणीवर आजही ठाम आहेत.

श्याम राऊत, टोकावडेकाळू धरणात बाधित होणारे ४१ गावांतील सर्वसामान्य नागरिक धरण होऊ नये, या मागणीवर आजही ठाम आहेत. चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीवर या गावापाड्यांनी पूर्णत: बहिष्कार टाकून शासनाला आपण धरणाच्या विरोधात आहोत, हे दाखवून दिले. तोच बहिष्काराचा पवित्रा त्यांनी विधानसभा निवडणुकीवरही कायम ठेवला आहे. परंतु, त्यांचे नेते मात्र विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांचे झेंडे घेऊन प्रचारात मग्न झाल्याने आपला लढा आता कोण लढणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.काळू नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणाचे पाणी मुंबई शहराला पुरविले जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी शासनाने दडपशाहीचा प्रयत्न करून २५ टक्के धरणाचे बांधकाम पूर्ण केले आहे. परंतु, धरणविरोधी संघर्ष समित्या स्थापन करून न्यायालयात धाव घेऊन या बांधकामास स्थगिती मिळवण्यात त्यांनी यश मिळविल्याने धरणाचे बांधकाम थांबविले आहे. परंतु, संघर्षाची धुरा या बाधितांनी स्वत: हालअपेष्टा सहन करून ज्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर सोपवली होती, तेच पदाधिकारी पोपटराव देशमुख, अशोक पाठारे, माजी आमदार कृष्णकांत तेलम, दशरथ देशमुख हे आपल्या पक्षाच्या नेत्याला विजयी करण्यासाठी धावत असल्याने या संघर्षची धार बोथट झाल्याची चर्चा होत असून काहींनी तर हे पदाधिकारी मॅनेज झाल्याची प्रतिक्रिया नाव छापण्याच्या अटीवर दिली. काळू धरणात ४१ गावांपैकी १९ गावे पूर्णत: बाधित होणार असून २२ गावे अंशत: बाधित होणार आहेत. त्याचबरोबर १२०० हेक्टर खाजगी जमीन, १००० हेक्टर वनजमीन या धरणात जाणार आहे. वन्यप्राणी-पशू, दुर्मीळ वनौषधी, वनस्पती नष्ट होणार आहे. तसेच चासोळे येथील पुरातन शिवमंदिर (मठ) यामध्ये बुडणार असून हे धरण या शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे. संघर्ष समिती प्रचारात सहभागी झाली असली तरी आम्ही श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेत्या इंदवी तुळपुळे (साठे) यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरविणार असल्याचे या परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)