शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

काळू धरणग्रस्तांचा पुन्हा बहिष्कार

By admin | Updated: October 9, 2014 04:10 IST

काळू धरणात बाधित होणारे ४१ गावांतील सर्वसामान्य नागरिक धरण होऊ नये, या मागणीवर आजही ठाम आहेत.

श्याम राऊत, टोकावडेकाळू धरणात बाधित होणारे ४१ गावांतील सर्वसामान्य नागरिक धरण होऊ नये, या मागणीवर आजही ठाम आहेत. चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीवर या गावापाड्यांनी पूर्णत: बहिष्कार टाकून शासनाला आपण धरणाच्या विरोधात आहोत, हे दाखवून दिले. तोच बहिष्काराचा पवित्रा त्यांनी विधानसभा निवडणुकीवरही कायम ठेवला आहे. परंतु, त्यांचे नेते मात्र विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांचे झेंडे घेऊन प्रचारात मग्न झाल्याने आपला लढा आता कोण लढणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.काळू नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणाचे पाणी मुंबई शहराला पुरविले जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी शासनाने दडपशाहीचा प्रयत्न करून २५ टक्के धरणाचे बांधकाम पूर्ण केले आहे. परंतु, धरणविरोधी संघर्ष समित्या स्थापन करून न्यायालयात धाव घेऊन या बांधकामास स्थगिती मिळवण्यात त्यांनी यश मिळविल्याने धरणाचे बांधकाम थांबविले आहे. परंतु, संघर्षाची धुरा या बाधितांनी स्वत: हालअपेष्टा सहन करून ज्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर सोपवली होती, तेच पदाधिकारी पोपटराव देशमुख, अशोक पाठारे, माजी आमदार कृष्णकांत तेलम, दशरथ देशमुख हे आपल्या पक्षाच्या नेत्याला विजयी करण्यासाठी धावत असल्याने या संघर्षची धार बोथट झाल्याची चर्चा होत असून काहींनी तर हे पदाधिकारी मॅनेज झाल्याची प्रतिक्रिया नाव छापण्याच्या अटीवर दिली. काळू धरणात ४१ गावांपैकी १९ गावे पूर्णत: बाधित होणार असून २२ गावे अंशत: बाधित होणार आहेत. त्याचबरोबर १२०० हेक्टर खाजगी जमीन, १००० हेक्टर वनजमीन या धरणात जाणार आहे. वन्यप्राणी-पशू, दुर्मीळ वनौषधी, वनस्पती नष्ट होणार आहे. तसेच चासोळे येथील पुरातन शिवमंदिर (मठ) यामध्ये बुडणार असून हे धरण या शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे. संघर्ष समिती प्रचारात सहभागी झाली असली तरी आम्ही श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेत्या इंदवी तुळपुळे (साठे) यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरविणार असल्याचे या परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)