शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

झाविमोचे सहा आमदार भाजपात

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

नवी दिल्ली- झारखंड विकास मोर्चाच्या (प्रजातांत्रिक)सहा आमदारांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राज्य विधानसभेत आम्हाला सत्ताधारी आघाडीच्या सदस्यांसोबत बसण्याची परवानगी दिली जावी, अशी विनंती त्यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्षांना केली होती.

नवी दिल्ली- झारखंड विकास मोर्चाच्या (प्रजातांत्रिक)सहा आमदारांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राज्य विधानसभेत आम्हाला सत्ताधारी आघाडीच्या सदस्यांसोबत बसण्याची परवानगी दिली जावी, अशी विनंती त्यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्षांना केली होती.
नवीन जयस्वाल (हतिया), अमरकुमार बौरी (चंदनकियारी), गणेश गंजू (सिमेरिया), आलोककुमार चौरसिया (डाल्टनगंज), रणजीतसिंग (सारथ) आणि जानकी यादव (बरखटा)यांनी नवी दिल्लीतील झारखंड भवनात राज्याचे मुख्यमंत्री रघुवर दास आणि भाजपाच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश घेतल्याची माहिती प्रदेश भाजपाचे प्रवक्ते प्रदीप सिन्हा यांनी दिली.
सध्या ८१ सदस्यीय झारखंड विधानसभेत भाजपाची सदस्य संख्या ३७ असून सुदेश महतो यांच्या आजसूच्या मदतीने त्यांनी राज्यात सरकार स्थापन केले आहे. आता सत्ताधारी भाजप आघाडीची सदस्य संख्या ४८ झाली आहे.
भाजपा इतर पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न का करीत आहे? असा प्रश्न विचारला असता आमचा तोडण्यावर नाही तर जोडण्यावर विश्वास असल्याचे दास यांनी सांगितले. राज्याच्या विकासासाठी भाजपा सरकारला सहकार्य करण्यास इच्छु्रक असलेल्यांचे पक्षात स्वागत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष व राज्याचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी भाजपावर झाविमो आणि काँग्रेस पक्षाचे आमदार पळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. मरांडी यांनी जयस्वाल, बौरी आणि चौरसिया या तिघांना पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून पक्षातून निलंबित केले होते. (वृत्तसंस्था)