शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

केवळ "गोमाता की जय" म्हटल्याने त्या वाचणार नाहीत - योगी आदित्यनाथ

By admin | Updated: April 30, 2017 21:56 IST

फक्त गोमाता की जय म्हणून गोमातेचे संरक्षण होणार नाही. त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणालेत.

 ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. 30 - "फक्त गोमाता की जय म्हणून गोमातेचे संरक्षण होणार नाही. त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने स्वत:हून गोमातेच्या रक्षणासाठी प्रयत्न केल्यावरच गोमातेला वाचवण्यात यश येईल," असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
 
योगी आदित्यनाथ त्यांचा मतदारसंघ असलेल्या गोरखपूरच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी आरएसएस आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी समन्वय बैठकीत बोलताना आदित्यनाथ यांनी गो-संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला.
महापुरुषांचे जातीच्या आधारावर विभाजन करणाऱ्यांनादेखील आदित्यनाथ यांनी खडेबोल सुनावलेत. "आपण महापुरुषांना जातीच्या आधारावर वाटून घेतले आहे. हे केवढे मोठे पाप आहे. प्रत्येक जातीचा एक महापुरुष आहे," अशी खंत यावेळी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली. 
 
तसंच नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करणेही आवश्यक आहे. नदी, नाले, तलाव प्रदुषित होऊ नयेत, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचं योगी म्हणालेत. यावेळी उदाहरण देत असताना त्यांनी पूर्वांचलमध्ये आजारांमुळे दर वर्षी शेकडो मुलांचा मृत्यू होतो असे सांगितले.  स्वच्छ भारत योजनेअंतर्गत पुरेशी स्वच्छता राखल्यास अनेक मुलांचा जीव वाचू शकेल, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.  
 
‘नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण आवश्यक आहे. आपण जलस्रोतांचे नुकसान केले आहे. जलस्रोत दूषित झाल्याने लहान मुलांना विविध आजार होतात.  नदीनाले प्रदुषित होऊ न देणे प्रत्येकाची जबाबदारी आहे,’ असे सांगत स्वच्छता राखण्याचं आवाहन यावेळी आदित्यनाथ यांनी केले.