शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

केवळ "गोमाता की जय" म्हटल्याने त्या वाचणार नाहीत - योगी आदित्यनाथ

By admin | Updated: April 30, 2017 21:56 IST

फक्त गोमाता की जय म्हणून गोमातेचे संरक्षण होणार नाही. त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणालेत.

 ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. 30 - "फक्त गोमाता की जय म्हणून गोमातेचे संरक्षण होणार नाही. त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने स्वत:हून गोमातेच्या रक्षणासाठी प्रयत्न केल्यावरच गोमातेला वाचवण्यात यश येईल," असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
 
योगी आदित्यनाथ त्यांचा मतदारसंघ असलेल्या गोरखपूरच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी आरएसएस आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी समन्वय बैठकीत बोलताना आदित्यनाथ यांनी गो-संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला.
महापुरुषांचे जातीच्या आधारावर विभाजन करणाऱ्यांनादेखील आदित्यनाथ यांनी खडेबोल सुनावलेत. "आपण महापुरुषांना जातीच्या आधारावर वाटून घेतले आहे. हे केवढे मोठे पाप आहे. प्रत्येक जातीचा एक महापुरुष आहे," अशी खंत यावेळी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली. 
 
तसंच नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करणेही आवश्यक आहे. नदी, नाले, तलाव प्रदुषित होऊ नयेत, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचं योगी म्हणालेत. यावेळी उदाहरण देत असताना त्यांनी पूर्वांचलमध्ये आजारांमुळे दर वर्षी शेकडो मुलांचा मृत्यू होतो असे सांगितले.  स्वच्छ भारत योजनेअंतर्गत पुरेशी स्वच्छता राखल्यास अनेक मुलांचा जीव वाचू शकेल, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.  
 
‘नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण आवश्यक आहे. आपण जलस्रोतांचे नुकसान केले आहे. जलस्रोत दूषित झाल्याने लहान मुलांना विविध आजार होतात.  नदीनाले प्रदुषित होऊ न देणे प्रत्येकाची जबाबदारी आहे,’ असे सांगत स्वच्छता राखण्याचं आवाहन यावेळी आदित्यनाथ यांनी केले.