शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कनिष्ठ नोकऱ्या मुलाखतीविना!

By admin | Updated: October 26, 2015 02:55 IST

केंद्र सरकारच्या अराजपत्रित गट डी, सी आणि बी दर्जांच्या कनिष्ठ पदांसाठी पुढील वर्षी १ जानेवारीपासून मुलाखतीची गरज उरणार नाही,

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अराजपत्रित गट डी, सी आणि बी दर्जांच्या कनिष्ठ पदांसाठी पुढील वर्षी १ जानेवारीपासून मुलाखतीची गरज उरणार नाही, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात केली. नोकरीतील भ्रष्टाचार संपविण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कनिष्ठ पदांची भरती करताना मुलाखती घेण्याची प्रक्रिया दूर सारण्याची गरज मोदींनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना प्रतिपादित केली होती. अशा पदांसाठी मुलाखती ठेवल्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळतो. ‘दलाल’ गरिबांना लुटतात. रोजगार देण्याच्या नावाखाली लोकांना लुटले जाते. नोकरीही दिली जात नाही. मग छोट्या पदांसाठी मुलाखत ठेवण्याची काय गरज आहे? एक-दोन मिनिटांच्या मुलाखतीत त्या उमेदवाराचे मूल्यांकन कसे करणार? मुलाखतीला जाताना युवक शिफारस मिळवतात. विधवा मातेलाही तिच्या मुलांना मुलाखतीला पाठविताना शिफारस मिळविण्यासाठी पायपीट करावी लागते, असे मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना म्हटले होते. बँकेत सोने ठेवा...सुवर्णमुद्रा योजनेनुसार तुम्ही बँकेत सोने जमा करून त्यावर रोख रकमेप्रमाणे व्याज मिळवू शकाल. सोने लॉकरमध्ये ठेवण्याची परंपरा राहिली आहे. त्यासाठी तुम्ही बँकेला पैसे देता. आता त्याच सोन्यावर पैसे मिळवा, असेही ते म्हणाले.>>काय असतील सुवर्णरोखेसुवर्णरोखे योजनेची माहिती देताना ते म्हणाले की, लोकांना सोन्याचे बार नव्हे, तर एक कागदाचा तुकडा दिला जाईल. त्याची किंमत सोन्याएवढीच असेल. तो तुम्ही परत कराल तेव्हा त्याच्या किमतीएवढा पैसा मिळेल. त्यामुळे तुम्हाला सोने खरेदी करण्याची व ते कुठे ठेवावे ही चिंता उरणार नाही. काही आठवड्यांत या योजनेला प्रारंभ होईल.दिवाळीत सुवर्णमुद्रेसह विविध योजनांचा प्रारंभदिवाळीच्या पूर्वसंध्येला सुवर्णमुद्रा, सुवर्णरोखे, अशोक चक्र असलेल्या सुवर्णनाण्यांसह विविध योजनांचा शुभारंभ केला जाणार आहे. त्यामुळे आर्थिक विकासाला वेगळी दिशा दिली जाईल, अशी आशा मोदींनी व्यक्त केली. आपल्या देशात सोने हा सामाजिक जीवनाचा भाग बनला आहे. आर्थिक संकटाच्या काळात पारंपरिकरीत्या सोन्याला आर्थिक सुरक्षा मानले जात आहे. गेल्या अर्थसंकल्पात दिलेल्या वचनाची पूर्तता करताना आनंद होत आहे, असे ते म्हणाले. धनत्रयो-दशीला मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते, त्याच दिवशी या योजनांचे लोकार्पण केले जाईल.>>> जाती-धर्मातील विविधता हेच भारताचे सौंदर्य आहे. विचार आणि अभिव्यक्तीच्या माध्यमातून ऐक्याचा मंत्र पुढे नेला जावा, या शब्दांत मोदींनी सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन केले. > जातीय हिंसाचार व चिथावणीजनक विधानांचा त्यामागे संदर्भ होता. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती येऊ घातली असताना त्यांनी शांतता, सलोखा आणि ऐक्य हीच प्रगतीची ३ मुख्य अंगे आहेत. आपले विचार, वर्तणूक व अभिव्यक्ती या माध्यमातून ऐक्याचाच मंत्र दिला जावा, असे त्यांनी नमूद केले.