शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानवा महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
3
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
4
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
5
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
6
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
7
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
8
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
9
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
10
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
11
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
12
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
13
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
14
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
15
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
16
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
17
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
18
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
19
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
20
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

जुलै, आॅगस्टमध्ये मात्र कमी पाऊस

By admin | Updated: June 29, 2015 00:04 IST

आगामी दोन महिन्यात कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने कृषी मंत्रालयाला आकस्मिक योजनेसाठी सज्ज राहण्याचा सल्ला भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे.

नवी दिल्ली : जूनमध्ये बऱ्याच भागात चांगला पाऊस झाला असला तरी पुढील दोन महिन्यांत सामान्यापेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवतानाच कृषी मंत्रालयाला आकस्मिक योजनेसाठी सज्ज राहण्याचा सल्ला भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे.जुलै व आॅगस्टमध्ये अनुक्रमे ८ ते १० टक्के कमी पाऊस होण्याची शक्यता असल्याचे आयएमडीचे महासंचालक लक्ष्मणसिंग राठोड यांनी म्हटले. जून महिन्यात पेरणीला सुरुवात होते. या महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाला असला तरी पुढील दोन महिन्यांत तशी परिस्थिती राहणार नसल्यामुळे आकस्मिक योजना तयार ठेवाव्या लागतील. काही भागांत मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्यामुळे जलाशये भरली आहेत. ‘चारधाम’ यात्रा ३० जूनपर्यंत स्थगितडेहराडून : संततधार पावसामुळे रस्ते आणि पूल कोसळल्यानंतर सरकारने चारधाम यात्रा ३० जूनपर्यंत स्थगित केली. हेमकुंडच्या मार्गासह बद्रीनाथ, केदारनाथ व अन्य ठिकाणी किमान दहा हजारांवर यात्रेकरू अडकून पडले आहेत. दरम्यान, तेथे सुरू असलेल्या बचाव कार्यावर यात्रेकरू कमालीचे नाराज आहेत व यात्रेकरूंजवळचे पैसेही संपलेले आहेत. तेथील एटीएममध्येही पैसे भरण्यात येत नसल्याची माहिती आहे.> पावसामुळे बद्रीनाथ यात्रा व चलोली जिल्ह्यातील हेमकुं ड साहिब यात्रा ठप्प पडली आहेस्कायमेटचा अंदाज> स्कायमेट या खासगी हवामानविषयक संस्थेने जुलै महिन्यात सामान्यापेक्षा जास्त (१०४ टक्के), आॅगस्टमध्ये सामान्य (९९ टक्के), तर सप्टेंबरमध्ये ९६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) तुलनेत ९० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे अपुरा पाऊस मानला जातो. ९० ते ९६ टक्के म्हणजे सामान्यापेक्षा कमी तर १०४ ते ११० टक्के म्हणजे सामान्य तर त्याहीपेक्षा जास्त पाऊस म्हणजे अतिवृष्टी ठरते. आयएमडीने यावर्षी ८८ टक्के म्हणजे सामान्यापेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला असून, विशेषत: वायव्य भारतात मान्सून अपुरा राहील. यावर्षी जूनमध्ये सामान्यापेक्षा २८ टक्के जास्त पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांना सल्ला> हवामानाचा काळजीपूर्वक अभ्यास करून पिकांची निवड करा. ज्या भागात १०० ते ११० मि.मि. पाऊस पडतो त्या ठिकाणी ६० ते ७० मि.मि. पाऊस झाला असेल, तर धानाऐवजी (भात) मक्याच्या पिकाची निवड करावी, असा सल्ला राठोड यांनी दिला.