शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

जुलै, आॅगस्टमध्ये मात्र कमी पाऊस

By admin | Updated: June 29, 2015 00:04 IST

आगामी दोन महिन्यात कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने कृषी मंत्रालयाला आकस्मिक योजनेसाठी सज्ज राहण्याचा सल्ला भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे.

नवी दिल्ली : जूनमध्ये बऱ्याच भागात चांगला पाऊस झाला असला तरी पुढील दोन महिन्यांत सामान्यापेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवतानाच कृषी मंत्रालयाला आकस्मिक योजनेसाठी सज्ज राहण्याचा सल्ला भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे.जुलै व आॅगस्टमध्ये अनुक्रमे ८ ते १० टक्के कमी पाऊस होण्याची शक्यता असल्याचे आयएमडीचे महासंचालक लक्ष्मणसिंग राठोड यांनी म्हटले. जून महिन्यात पेरणीला सुरुवात होते. या महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाला असला तरी पुढील दोन महिन्यांत तशी परिस्थिती राहणार नसल्यामुळे आकस्मिक योजना तयार ठेवाव्या लागतील. काही भागांत मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्यामुळे जलाशये भरली आहेत. ‘चारधाम’ यात्रा ३० जूनपर्यंत स्थगितडेहराडून : संततधार पावसामुळे रस्ते आणि पूल कोसळल्यानंतर सरकारने चारधाम यात्रा ३० जूनपर्यंत स्थगित केली. हेमकुंडच्या मार्गासह बद्रीनाथ, केदारनाथ व अन्य ठिकाणी किमान दहा हजारांवर यात्रेकरू अडकून पडले आहेत. दरम्यान, तेथे सुरू असलेल्या बचाव कार्यावर यात्रेकरू कमालीचे नाराज आहेत व यात्रेकरूंजवळचे पैसेही संपलेले आहेत. तेथील एटीएममध्येही पैसे भरण्यात येत नसल्याची माहिती आहे.> पावसामुळे बद्रीनाथ यात्रा व चलोली जिल्ह्यातील हेमकुं ड साहिब यात्रा ठप्प पडली आहेस्कायमेटचा अंदाज> स्कायमेट या खासगी हवामानविषयक संस्थेने जुलै महिन्यात सामान्यापेक्षा जास्त (१०४ टक्के), आॅगस्टमध्ये सामान्य (९९ टक्के), तर सप्टेंबरमध्ये ९६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) तुलनेत ९० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे अपुरा पाऊस मानला जातो. ९० ते ९६ टक्के म्हणजे सामान्यापेक्षा कमी तर १०४ ते ११० टक्के म्हणजे सामान्य तर त्याहीपेक्षा जास्त पाऊस म्हणजे अतिवृष्टी ठरते. आयएमडीने यावर्षी ८८ टक्के म्हणजे सामान्यापेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला असून, विशेषत: वायव्य भारतात मान्सून अपुरा राहील. यावर्षी जूनमध्ये सामान्यापेक्षा २८ टक्के जास्त पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांना सल्ला> हवामानाचा काळजीपूर्वक अभ्यास करून पिकांची निवड करा. ज्या भागात १०० ते ११० मि.मि. पाऊस पडतो त्या ठिकाणी ६० ते ७० मि.मि. पाऊस झाला असेल, तर धानाऐवजी (भात) मक्याच्या पिकाची निवड करावी, असा सल्ला राठोड यांनी दिला.