शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

जुलै, आॅगस्टमध्ये मात्र कमी पाऊस

By admin | Updated: June 29, 2015 00:04 IST

आगामी दोन महिन्यात कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने कृषी मंत्रालयाला आकस्मिक योजनेसाठी सज्ज राहण्याचा सल्ला भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे.

नवी दिल्ली : जूनमध्ये बऱ्याच भागात चांगला पाऊस झाला असला तरी पुढील दोन महिन्यांत सामान्यापेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवतानाच कृषी मंत्रालयाला आकस्मिक योजनेसाठी सज्ज राहण्याचा सल्ला भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे.जुलै व आॅगस्टमध्ये अनुक्रमे ८ ते १० टक्के कमी पाऊस होण्याची शक्यता असल्याचे आयएमडीचे महासंचालक लक्ष्मणसिंग राठोड यांनी म्हटले. जून महिन्यात पेरणीला सुरुवात होते. या महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाला असला तरी पुढील दोन महिन्यांत तशी परिस्थिती राहणार नसल्यामुळे आकस्मिक योजना तयार ठेवाव्या लागतील. काही भागांत मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्यामुळे जलाशये भरली आहेत. ‘चारधाम’ यात्रा ३० जूनपर्यंत स्थगितडेहराडून : संततधार पावसामुळे रस्ते आणि पूल कोसळल्यानंतर सरकारने चारधाम यात्रा ३० जूनपर्यंत स्थगित केली. हेमकुंडच्या मार्गासह बद्रीनाथ, केदारनाथ व अन्य ठिकाणी किमान दहा हजारांवर यात्रेकरू अडकून पडले आहेत. दरम्यान, तेथे सुरू असलेल्या बचाव कार्यावर यात्रेकरू कमालीचे नाराज आहेत व यात्रेकरूंजवळचे पैसेही संपलेले आहेत. तेथील एटीएममध्येही पैसे भरण्यात येत नसल्याची माहिती आहे.> पावसामुळे बद्रीनाथ यात्रा व चलोली जिल्ह्यातील हेमकुं ड साहिब यात्रा ठप्प पडली आहेस्कायमेटचा अंदाज> स्कायमेट या खासगी हवामानविषयक संस्थेने जुलै महिन्यात सामान्यापेक्षा जास्त (१०४ टक्के), आॅगस्टमध्ये सामान्य (९९ टक्के), तर सप्टेंबरमध्ये ९६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) तुलनेत ९० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे अपुरा पाऊस मानला जातो. ९० ते ९६ टक्के म्हणजे सामान्यापेक्षा कमी तर १०४ ते ११० टक्के म्हणजे सामान्य तर त्याहीपेक्षा जास्त पाऊस म्हणजे अतिवृष्टी ठरते. आयएमडीने यावर्षी ८८ टक्के म्हणजे सामान्यापेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला असून, विशेषत: वायव्य भारतात मान्सून अपुरा राहील. यावर्षी जूनमध्ये सामान्यापेक्षा २८ टक्के जास्त पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांना सल्ला> हवामानाचा काळजीपूर्वक अभ्यास करून पिकांची निवड करा. ज्या भागात १०० ते ११० मि.मि. पाऊस पडतो त्या ठिकाणी ६० ते ७० मि.मि. पाऊस झाला असेल, तर धानाऐवजी (भात) मक्याच्या पिकाची निवड करावी, असा सल्ला राठोड यांनी दिला.