शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

न्यायमूर्तींना कामबंदी!

By admin | Updated: February 9, 2017 02:13 IST

मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांविरुद्ध न्या. सी. एस. कर्नन यांनी लिहिलेल्या अपमानास्पद पत्रांचा आधार घेत सर्वोच्च न्यायालयाने

नवी दिल्ली : मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांविरुद्ध न्या. सी. एस. कर्नन यांनी लिहिलेल्या अपमानास्पद पत्रांचा आधार घेत सर्वोच्च न्यायालयाने न्या. कर्नन यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. न्यायालयाने न्या. कर्नन यांना व्यक्तिगतरित्या हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्याविरुद्ध अवमानसंबंधी कारवाई का सुरू करू नये अशी विचारणाही करण्यात आली आहे. न्यायिक आणि प्रशासकीय कार्य करण्यापासूनही त्यांना तात्काळ रोखण्यात आले आहे. न्या. कर्नन यांना त्यांच्या वर्तनामुळे मद्रास उच्च न्यायालयातून कलकत्ता उच्च न्यायालयात पाठविण्यात आले आहे. सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील सात न्यायाधीशांच्या पीठाने म्हटले आहे की, न्या. कर्नन यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात यावी. याचे उत्तर त्यांनी १३ फेब्रुवारीपर्यंत द्यावे. या न्यायाधीशात न्या. दीपक मिश्रा, न्या. जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. एम. बी. लोकुर, न्या. पी.सी. घोष आणि न्या. कुरियन जोसेफ यांचा समावेश आहे. न्या. कर्नन यांनी आपल्याजवळील सर्व फाइल्स कलकत्ता उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांच्याकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरुवातीला अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी न्या. कर्नन यांच्या वर्तनाचा उल्लेख केला. ही कृती न्याय प्रशासन व्यवस्थेला बदनाम करणारी असल्याचे ते म्हणाले. त्यांनी खंडपीठाला विनंती केली की, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना निर्देश देण्यात यावेत की, संबंधित न्यायाधीशांना न्यायिक आणि प्रशासकीय कार्य करण्यापासून रोखण्यात यावे. यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, आम्ही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध प्रथमच कारवाई करणार आहोत. असे करताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)काय आहे प्रकरण? न्या. कर्नन यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांविरुद्ध तिरस्कार व्यक्त करणारे पत्र लिहिले होते. सरन्यायाधीश, पंतप्रधान यांना संबोधित करून हे पत्र लिहिले होते. न्या. कर्नन यांना या वर्तनामुळे मद्रास उच्च न्यायालयातून कोलकाता उच्च न्यायालयात पाठविण्यात आले. आता त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू होत आहे. पंतप्रधानांना लिहिले होते पत्र जानेवारी २०१७ मध्ये त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. यात म्हटले होते की, नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार कमी झाला आहे. पण, न्यायपालिकेत मनमानीपणे आणि कुणालाही न घाबरता भ्रष्टाचार होत आहे. याची चौकशी होण्याची गरज आहे. यात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या विद्यमान २० पेक्षा अधिक न्यायाधीशांचे नावे देण्यात आली होती. असे हे वाद न्या. कर्नन आणि वाद यांचे नाते तसे जुने आहे. २०११ मध्ये त्यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या आपल्या सहकारी न्यायाधीशांविरुद्ध जातीवाचक उद्गार काढल्याची तक्रार दिली होती. २०१४ मध्ये मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत ते तत्कालिन मुख्य न्यायाधीशांच्या केबिनमध्ये घुसले होते आणि वाद घातला होता.