शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

न्यायाधीशांचे फोन टॅप होत आहेत - केजरीवाल यांचा सनसनाटी आरोप

By admin | Updated: October 31, 2016 14:16 IST

देशात न्यायाधीशांचे फोन टॅप केले जात असून, हा न्यायपालिकेच्या स्वायत्ततेवरील हल्ला असल्याचा आरोप केजरीवाल यांनी सोमवारी केला

ऑनलाइन लोकमत
 नवी दिल्ली, दि. 31 -  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. देशात न्यायाधीशांचे फोन टॅप केले जात असून, हा न्यायपालिकेच्या स्वायत्ततेवरील हल्ला असल्याचा आरोप केजरीवाल यांनी सोमवारी केला. मात्र कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केजरीवाल यांनी केलेले आरोप फेटाळून लावले.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केजरीवाल यांनी हे सनसनाटी आरोप करत खळबळ उडवली. विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद आणि सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर हेही उपस्थित होते. केजरीवाल म्हणाले, " न्यायाधीशांचे फोन टॅप असल्याचे  न्यायाधीश एकमेकांना सांगत असताना मी ऐकले आहे. न्याधीशांचे फोन टॅप होणे योग्य नाही. आता ही गोष्ट खरी की खोटी हे मला माहीत नाही. पण न्यायाधीशांचे फोन टॅप होत असतील तर ती अत्यंत गंभीर बाब आहे."
न्यायाधीशांचे फोन टॅप होणे हे  न्यायसंस्थेच्या स्वायत्ततेला बाधा आणणारे असल्याचेही केरीवाल यांनी सांगितले. "जर एखादा न्यायाधीश काही चुकीचे कृत्य करत असेल. तरीही त्याचा फोन टॅप करता कामा नये. त्याचाविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत," असेही केजरीवाल म्हणाले.  
मात्र केजरीवाल यांच्या या सनसनाटी आरोपांना केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी याच कार्यक्रमात प्रत्युत्तर देत सर्व आरोप फेटाळून लावले. "न्यायाधीशांचे फोन टॅप होत असल्याचा आरोप पूर्णपणे निराधार आणि आहेत. तसेच मोदी सरकार न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी  कटीबद्ध आहे," असे प्रसाद यांनी सांगितले.