शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

न्यायाधीशांचे फोन टॅप होत आहेत - केजरीवाल यांचा सनसनाटी आरोप

By admin | Updated: October 31, 2016 14:16 IST

देशात न्यायाधीशांचे फोन टॅप केले जात असून, हा न्यायपालिकेच्या स्वायत्ततेवरील हल्ला असल्याचा आरोप केजरीवाल यांनी सोमवारी केला

ऑनलाइन लोकमत
 नवी दिल्ली, दि. 31 -  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. देशात न्यायाधीशांचे फोन टॅप केले जात असून, हा न्यायपालिकेच्या स्वायत्ततेवरील हल्ला असल्याचा आरोप केजरीवाल यांनी सोमवारी केला. मात्र कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केजरीवाल यांनी केलेले आरोप फेटाळून लावले.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केजरीवाल यांनी हे सनसनाटी आरोप करत खळबळ उडवली. विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद आणि सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर हेही उपस्थित होते. केजरीवाल म्हणाले, " न्यायाधीशांचे फोन टॅप असल्याचे  न्यायाधीश एकमेकांना सांगत असताना मी ऐकले आहे. न्याधीशांचे फोन टॅप होणे योग्य नाही. आता ही गोष्ट खरी की खोटी हे मला माहीत नाही. पण न्यायाधीशांचे फोन टॅप होत असतील तर ती अत्यंत गंभीर बाब आहे."
न्यायाधीशांचे फोन टॅप होणे हे  न्यायसंस्थेच्या स्वायत्ततेला बाधा आणणारे असल्याचेही केरीवाल यांनी सांगितले. "जर एखादा न्यायाधीश काही चुकीचे कृत्य करत असेल. तरीही त्याचा फोन टॅप करता कामा नये. त्याचाविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत," असेही केजरीवाल म्हणाले.  
मात्र केजरीवाल यांच्या या सनसनाटी आरोपांना केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी याच कार्यक्रमात प्रत्युत्तर देत सर्व आरोप फेटाळून लावले. "न्यायाधीशांचे फोन टॅप होत असल्याचा आरोप पूर्णपणे निराधार आणि आहेत. तसेच मोदी सरकार न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी  कटीबद्ध आहे," असे प्रसाद यांनी सांगितले.