शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

न्यायाधीशांचे फोन टॅप होत आहेत - केजरीवाल यांचा सनसनाटी आरोप

By admin | Updated: October 31, 2016 14:16 IST

देशात न्यायाधीशांचे फोन टॅप केले जात असून, हा न्यायपालिकेच्या स्वायत्ततेवरील हल्ला असल्याचा आरोप केजरीवाल यांनी सोमवारी केला

ऑनलाइन लोकमत
 नवी दिल्ली, दि. 31 -  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. देशात न्यायाधीशांचे फोन टॅप केले जात असून, हा न्यायपालिकेच्या स्वायत्ततेवरील हल्ला असल्याचा आरोप केजरीवाल यांनी सोमवारी केला. मात्र कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केजरीवाल यांनी केलेले आरोप फेटाळून लावले.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केजरीवाल यांनी हे सनसनाटी आरोप करत खळबळ उडवली. विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद आणि सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर हेही उपस्थित होते. केजरीवाल म्हणाले, " न्यायाधीशांचे फोन टॅप असल्याचे  न्यायाधीश एकमेकांना सांगत असताना मी ऐकले आहे. न्याधीशांचे फोन टॅप होणे योग्य नाही. आता ही गोष्ट खरी की खोटी हे मला माहीत नाही. पण न्यायाधीशांचे फोन टॅप होत असतील तर ती अत्यंत गंभीर बाब आहे."
न्यायाधीशांचे फोन टॅप होणे हे  न्यायसंस्थेच्या स्वायत्ततेला बाधा आणणारे असल्याचेही केरीवाल यांनी सांगितले. "जर एखादा न्यायाधीश काही चुकीचे कृत्य करत असेल. तरीही त्याचा फोन टॅप करता कामा नये. त्याचाविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत," असेही केजरीवाल म्हणाले.  
मात्र केजरीवाल यांच्या या सनसनाटी आरोपांना केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी याच कार्यक्रमात प्रत्युत्तर देत सर्व आरोप फेटाळून लावले. "न्यायाधीशांचे फोन टॅप होत असल्याचा आरोप पूर्णपणे निराधार आणि आहेत. तसेच मोदी सरकार न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी  कटीबद्ध आहे," असे प्रसाद यांनी सांगितले.