शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
3
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
4
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
5
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
6
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
7
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
8
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
9
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
10
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
11
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
12
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
13
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
14
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
15
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
16
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
17
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
18
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
19
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
20
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

पत्रकाराच्या मृत्यूने भाजपची कोंडी?

By admin | Updated: July 5, 2015 23:36 IST

टीव्ही पत्रकार अक्षयसिंग यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. अक्षयसिंग यांच्या मृत्यूच्या निमित्ताने विविध मुद्दे उपस्थित झाले असल्यामुळे योग्य तपास करून सर्व प्रकारचा संशय दूर केला जावा.

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या (व्यापमं) प्रवेश आणि भरती घोटाळ््याच्या मुळाशी जाऊ पाहणाऱ्या दिल्लीच्या टीव्ही टुडे वृत्तवाहिनीचे शोध पत्रकार अक्षयसिंग यांच्या मृत्यूने सत्ताधारी भाजपची कोंडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अक्षय यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, असे मत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी व्यक्त केले आहे. पण ही अतिशय धक्कादायक बाब असून या घोटाळ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन का बाळगून आहेत, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते आरपीएन सिंग यांनी केला आहे.शनिवारी मध्य प्रदेशातील झबुआ जिल्ह्यात अक्षय यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर ४८ तासांच्या आत याच घोटाळ््याचा तपास करणाऱ्या डॉ.शर्मा यांचा मृत्यू झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. घोटाळ्यात नाव असलेली विद्यार्थिनी निर्माता दामोर हिचा मृतदेह ७ जानेवारी २०१२ रोजी उज्जैन जिल्ह्यात रेल्वे रूळावर आढळून आला होता. दोनच दिवसांपूर्वी ३८ वर्षीय अक्षयसिंग यांनी तिच्या मातापित्याची मुलाखत घेतली होती. अक्षयसिंग यांच्यावर रविवारी पूर्व दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय माकन, दिग्विजयसिंग, रणदीपसिंग सूर्जेवाला आदी नेते उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)--------------टीव्ही पत्रकार अक्षयसिंग यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. अक्षयसिंग यांच्या मृत्यूच्या निमित्ताने विविध मुद्दे उपस्थित झाले असल्यामुळे योग्य तपास करून सर्व प्रकारचा संशय दूर केला जावा. - अर्थमंत्री अरुण जेटली --------------मोदींचे मौन धक्कादायक- काँग्रेस > अक्षयसिंग यांचा मृत्यू एक पत्र लिहून केंद्र सरकारकडे सीबीआय चौकशीची मागणी करणे ही मुख्यमंत्री चौहान यांच्यासाठी अतिशय साधी बाब आहे. व्यापमं घोटाळा असो की छत्तीसगडमधील तांदूळ घोटाळा. > राजस्थानमध्ये म्हणा की केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्र्यांबाबत जे घडत आहे ते पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन सोडायला तयार नाहीत. या सर्व घोटाळ्यांना त्यांचा आतून पाठिंबा असल्याचे दिसून येते, असेही ते म्हणाले.