शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकाराच्या मृत्यूने भाजपची कोंडी?

By admin | Updated: July 5, 2015 23:36 IST

टीव्ही पत्रकार अक्षयसिंग यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. अक्षयसिंग यांच्या मृत्यूच्या निमित्ताने विविध मुद्दे उपस्थित झाले असल्यामुळे योग्य तपास करून सर्व प्रकारचा संशय दूर केला जावा.

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या (व्यापमं) प्रवेश आणि भरती घोटाळ््याच्या मुळाशी जाऊ पाहणाऱ्या दिल्लीच्या टीव्ही टुडे वृत्तवाहिनीचे शोध पत्रकार अक्षयसिंग यांच्या मृत्यूने सत्ताधारी भाजपची कोंडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अक्षय यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, असे मत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी व्यक्त केले आहे. पण ही अतिशय धक्कादायक बाब असून या घोटाळ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन का बाळगून आहेत, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते आरपीएन सिंग यांनी केला आहे.शनिवारी मध्य प्रदेशातील झबुआ जिल्ह्यात अक्षय यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर ४८ तासांच्या आत याच घोटाळ््याचा तपास करणाऱ्या डॉ.शर्मा यांचा मृत्यू झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. घोटाळ्यात नाव असलेली विद्यार्थिनी निर्माता दामोर हिचा मृतदेह ७ जानेवारी २०१२ रोजी उज्जैन जिल्ह्यात रेल्वे रूळावर आढळून आला होता. दोनच दिवसांपूर्वी ३८ वर्षीय अक्षयसिंग यांनी तिच्या मातापित्याची मुलाखत घेतली होती. अक्षयसिंग यांच्यावर रविवारी पूर्व दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय माकन, दिग्विजयसिंग, रणदीपसिंग सूर्जेवाला आदी नेते उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)--------------टीव्ही पत्रकार अक्षयसिंग यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. अक्षयसिंग यांच्या मृत्यूच्या निमित्ताने विविध मुद्दे उपस्थित झाले असल्यामुळे योग्य तपास करून सर्व प्रकारचा संशय दूर केला जावा. - अर्थमंत्री अरुण जेटली --------------मोदींचे मौन धक्कादायक- काँग्रेस > अक्षयसिंग यांचा मृत्यू एक पत्र लिहून केंद्र सरकारकडे सीबीआय चौकशीची मागणी करणे ही मुख्यमंत्री चौहान यांच्यासाठी अतिशय साधी बाब आहे. व्यापमं घोटाळा असो की छत्तीसगडमधील तांदूळ घोटाळा. > राजस्थानमध्ये म्हणा की केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्र्यांबाबत जे घडत आहे ते पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन सोडायला तयार नाहीत. या सर्व घोटाळ्यांना त्यांचा आतून पाठिंबा असल्याचे दिसून येते, असेही ते म्हणाले.