शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

पत्रकार, साहित्यिकांनी शेतकर्‍यांचे दु:ख मांडावे- कदम

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

नांदेड: पत्रकार हे साहित्यिकांचे कवचकुंडल असून पत्रकारांनी अनंत भालेराव, रामनाथ गोयंका यांचा आदर्श समोर ठेवून शेतकर्‍यांचे दु:ख जगासमोर मांडावे, असे आवाहन मराठवाडा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी केले़

नांदेड: पत्रकार हे साहित्यिकांचे कवचकुंडल असून पत्रकारांनी अनंत भालेराव, रामनाथ गोयंका यांचा आदर्श समोर ठेवून शेतकर्‍यांचे दु:ख जगासमोर मांडावे, असे आवाहन मराठवाडा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी केले़
३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते़ ते म्हणाले, शेतकर्‍यांच्या प्रश्नावर विचार करणारे संमेलन असल्यामुळे याठिकाणी साहित्यिक व पत्रकारांनी शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी चर्चा करावी़ शेतकरी जगला पाहिजे हा सल्ला आम्ही ऐकतो़ ज्याच्या आधारावर आम्ही जगायचे तो निसर्गच सरकारसारखा वागत असेल तर कसे व्हायचे़ अशा या अनिश्चित वातावरणात शेतीचा व्यवसाय अवलंबून आहे़ सरकारच्या बजेटमध्ये ७० टक्के बजेट हे वेतनावर, १५ टक्के सेवानिवृत्तधारकांच्या पेन्शनवर खर्च होते़ तसेच महानगरांच्या विकासासाठी हजारो कोटी खर्च करण्यात येतात़ परंतु शेतकर्‍यांना काही मिळत नाही़ याविषयी पत्रकार, साहित्यिकांनी विचार केला पाहिजे़ सत्ताधिश जेव्हा अन्याय करतात तेव्हा पत्रकारितेची खरी कस लागत असते़
मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले, मराठवाडा हे साहित्य व सांस्कृतिक क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करत आहेत़ तेव्हा आंबेजोगाई येथे मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी आहे़ यापूर्वीच्या सरकारकडून या मागणीला प्रतिसाद मिळाला नाही़ परंतु या सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे़ प्रत्येक साहित्य संमेलन हे शेतकर्‍यांच्या प्रश्नाशी जोडले गेल्याचेही ठाले म्हणाले़
भारत सासणे यांनी साहित्यिकांची भूमिका सर्वसामान्य माणसांच्या बाजुने असावी, असे सांगितले़