शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पत्रकार, साहित्यिकांनी शेतकर्‍यांचे दु:ख मांडावे- कदम

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

नांदेड: पत्रकार हे साहित्यिकांचे कवचकुंडल असून पत्रकारांनी अनंत भालेराव, रामनाथ गोयंका यांचा आदर्श समोर ठेवून शेतकर्‍यांचे दु:ख जगासमोर मांडावे, असे आवाहन मराठवाडा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी केले़

नांदेड: पत्रकार हे साहित्यिकांचे कवचकुंडल असून पत्रकारांनी अनंत भालेराव, रामनाथ गोयंका यांचा आदर्श समोर ठेवून शेतकर्‍यांचे दु:ख जगासमोर मांडावे, असे आवाहन मराठवाडा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी केले़
३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते़ ते म्हणाले, शेतकर्‍यांच्या प्रश्नावर विचार करणारे संमेलन असल्यामुळे याठिकाणी साहित्यिक व पत्रकारांनी शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी चर्चा करावी़ शेतकरी जगला पाहिजे हा सल्ला आम्ही ऐकतो़ ज्याच्या आधारावर आम्ही जगायचे तो निसर्गच सरकारसारखा वागत असेल तर कसे व्हायचे़ अशा या अनिश्चित वातावरणात शेतीचा व्यवसाय अवलंबून आहे़ सरकारच्या बजेटमध्ये ७० टक्के बजेट हे वेतनावर, १५ टक्के सेवानिवृत्तधारकांच्या पेन्शनवर खर्च होते़ तसेच महानगरांच्या विकासासाठी हजारो कोटी खर्च करण्यात येतात़ परंतु शेतकर्‍यांना काही मिळत नाही़ याविषयी पत्रकार, साहित्यिकांनी विचार केला पाहिजे़ सत्ताधिश जेव्हा अन्याय करतात तेव्हा पत्रकारितेची खरी कस लागत असते़
मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले, मराठवाडा हे साहित्य व सांस्कृतिक क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करत आहेत़ तेव्हा आंबेजोगाई येथे मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी आहे़ यापूर्वीच्या सरकारकडून या मागणीला प्रतिसाद मिळाला नाही़ परंतु या सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे़ प्रत्येक साहित्य संमेलन हे शेतकर्‍यांच्या प्रश्नाशी जोडले गेल्याचेही ठाले म्हणाले़
भारत सासणे यांनी साहित्यिकांची भूमिका सर्वसामान्य माणसांच्या बाजुने असावी, असे सांगितले़