शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

माणसांची राक्षसी भूक, देवभूमीचा खचला पाया

By shrimant mane | Updated: January 15, 2023 09:26 IST

पर्यटन व पाण्यातून विजेची राक्षसी भूक

श्रीमंत माने, कार्यकारी संपादक, नागपूर: देवभूमीचा पाया खचला आहे. हिरण्यकश्यपू खांबातून निघाला होता, तसा जिथे आदिशंकराचार्यांनी तपश्चर्या केली, त्या पवित्र जोशीमठाच्या भूगर्भातून नवा राक्षस धरतीचे कवच फोडून बाहेर येऊ पाहतो आहे. माणसांनी विकासाच्या नावाखाली हिमालयाची चाळण केल्याने भूगर्भात प्रचंड आक्रंदन सुरू आहे आणि त्याची परिणती काय होईल, या भीतिदायक कल्पनेने पंचवीस हजार लोकसंख्येच्या छोट्याशा, पर्वताच्या उतारावर वसलेल्या जोशीमठाची, उत्तराखंडची, हिमालयीन पर्वतराजीची झोप उडाली आहे. 

जोशीमठातील खचलेल्या घरांवर लाल फुल्या मारणे, लोकांना इतरत्र हलविणे, धोकादायक हॉटेल्स व इमारती पाडणे सुरू आहे. बहुतेक ते गाव हलवावेच लागेल आणि या आपत्तीचे मुख्य कारण तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्पात धरणाचे पाणी टर्बाईनपर्यंत नेणारा १२ किमी लांबीचा बोगदा असल्याचे स्पष्ट झाले आहे. ८ किमीचा बोगदा खोदून झालाय. उरलेले चार किमी खोदताना टनेल बोअरिंग मशिन अडकली. ती बाहेर काढण्यासाठी ब्लास्ट केले. त्याने भूगर्भातील जलप्रवाह फुटले. पाणी वाहू लागले. त्या भुसभुशीत पोकळीत मलबा शिरला व वरची जमीन ढासळू लागली, असा काहीसा हा घटनाक्रम आहे. 

केवळ जोशीमठ किंवा चमोली जिल्हाच नव्हे, तर आयताकृती उत्तराखंड राज्यातील मधला आडवा टापू अस्वस्थ आहे. अतिउत्तरेकडील गंगोत्री व नंदादेवी हिमशिखरांच्या दोन प्रमुख समूहापैकी पूर्वेकडील, नेपाळ सीमेला लागून असलेले नंदादेवी ग्लेशियर्स नैसर्गिक आपत्तीप्रवण आहे. भूकंप, भूस्खलन, हिमस्खलन, हिमवादळे, ढगफुटी, महापूर अशा संकटांची मालिका हा भाग भोगतो आहे. जोशीमठासोबत केदारनाथ, बागेश्वर, चमोली, पिठोरगड, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी या भागांतील अनेक गावांमध्ये भूस्खलन होतेय. पक्क्या डांबरी, सिमेंटच्या रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. बहुतेक ठिकाणी घराखालून भूगर्भातील पाण्याचे प्रवाह सुरू आहेत. हे तिथे घडतेय, ज्या परिसरात जलविद्युत प्रकल्पांसाठी बोगदे खणले जात आहेत,  पर्यटकांसाठी चांगले दहा मीटर रुंदीचे महामार्ग बांधले जात आहेत. झालेच तर उत्तराखंडच्या दक्षिणेकडील, उत्तर प्रदेश सीमेलगतचा हरिद्वार वगैरे मैदानी भाग उंचीवरच्या तीर्थस्थळांना जोडण्यासाठी रेल्वेमार्ग तयार होत आहेत. हा निसर्गाशी खेळ सुरू आहे. हा खेळ अतिसंवेदनशील हिमालयाच्या पर्यावरणाचा खंडोबा करील, अशी भीती आहे. 

उत्तराखंड ही सुरुवात आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे हिमकवच लाभलेला वायव्येकडील हिंदुकुश पर्वतराजीपासून ते पूर्व, आग्नेयकडील म्यानमारपर्यंतचा अंदाजे २,४०० किमी लांबीचा संपूर्ण हिमालय पर्वतसमूह ग्लोबल वॉर्मिंगच्या दुष्परिणामांचा सामना करीत आहे. 

आपण संकटांचा योग्य तो धडा घेत नाही. आपत्तींमुळे आत्मपरीक्षण करीत नाही. निसर्ग ओरबाडणे थांबवत नाही, हेच खरे, अन्यथा अवघ्या दोन वर्षांपूर्वी चमोली, जाेशीमठ परिसरात नंदादेवी खोऱ्यातील हिमस्खलन व ढगफुटीमुळे झालेला प्रलय, दोनशेवर बळी, जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात शे-दीडशे जणांना जलसमाधी हे इतक्या लवकर विसरलाे नसतो. त्याही आधी २०१३ साली चार हजारांवर जीव घेणाऱ्या केदारनाथ, बद्रीनाथ परिसरातील हिमालयीन त्सुनामीचेही विस्मरण झाले नसते. निसर्गाच्या, पर्यावरणाच्या हाका विकासाच्या गोंगाटात विरून गेल्या नसत्या. १९९१ मधील उत्तरकाशी, १९९९ मधील चमोलीच्या भूकंपाने बेचिराख गावे पुन्हा तशाच आपत्तीच्या अक्राळविक्राळ जबड्यात ढकलायला सरसावलो नसतो.

पर्यटन व पाण्यातून विजेची राक्षसी भूक 

- पर्यटन उत्तराखंडच्या उत्पन्नाचा आधार. - सव्वाकोटी लोकसंख्येच्या उत्तराखंडमध्ये वर्षाला तीन कोटींहून अधिक पर्यटक. - पर्यटन विकासासाठी चांगले रस्ते, रेल्वे, बहुमजली हॉटेल्सची उभारणी - गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ व बद्रीनाथ या चार पवित्र ठिकाणांची, उत्तराखंडची छोटी चारधाम यात्रा करणारे अधिक - जलविद्युत निर्मिती हा उत्तराखंडच्या अर्थकारणाचा दुसरा मोठा स्रोत. २००० साली  राज्यनिर्मितीवेळीच २१ हजार मेगावॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट - साडेचार-पाच हजार मेगावॉट निर्मिती सुरू - उत्तराखंडमध्ये सरकारी, खासगी, व्यावसायिक मिळून तब्बल तीनशेच्या आसपास छोटेमोठे जलविद्युत प्रकल्प २०१३ च्याकेदारनाथ प्रलयानंतर सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड जलविद्युत निगमचे ७० पैकी ४४ प्रकल्प थांबविले. - वीस प्रकल्प पूर्ण, सहा प्रगतिपथावर. स्थगित ४४ प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न - भौगोलिक स्थिती व नद्यांचे प्रवाह जलविद्युत निर्मितीसाठी अत्यंत पोषक. - दरीच्या तोंडावर धरण बांधले की मुबलक जलसाठा - टिहरी धरण हे याचे चांगले उदाहरण. त्याची उंची २६० मीटर, तर लांबी अवघी ५७५ मीटर. जलसाठा ४२ किलोमीटरपर्यंत. - हे भारतातील सर्वाधिक व जगात बाराव्या क्रमांकाचे उंच धरण. - तब्बल २,४०० मेगावॉट म्हणजे देशातील सर्वाधिक क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प पूर्णत्वाच्या वाटेवर

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड