शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

माणसांची राक्षसी भूक, देवभूमीचा खचला पाया

By shrimant mane | Updated: January 15, 2023 09:26 IST

पर्यटन व पाण्यातून विजेची राक्षसी भूक

श्रीमंत माने, कार्यकारी संपादक, नागपूर: देवभूमीचा पाया खचला आहे. हिरण्यकश्यपू खांबातून निघाला होता, तसा जिथे आदिशंकराचार्यांनी तपश्चर्या केली, त्या पवित्र जोशीमठाच्या भूगर्भातून नवा राक्षस धरतीचे कवच फोडून बाहेर येऊ पाहतो आहे. माणसांनी विकासाच्या नावाखाली हिमालयाची चाळण केल्याने भूगर्भात प्रचंड आक्रंदन सुरू आहे आणि त्याची परिणती काय होईल, या भीतिदायक कल्पनेने पंचवीस हजार लोकसंख्येच्या छोट्याशा, पर्वताच्या उतारावर वसलेल्या जोशीमठाची, उत्तराखंडची, हिमालयीन पर्वतराजीची झोप उडाली आहे. 

जोशीमठातील खचलेल्या घरांवर लाल फुल्या मारणे, लोकांना इतरत्र हलविणे, धोकादायक हॉटेल्स व इमारती पाडणे सुरू आहे. बहुतेक ते गाव हलवावेच लागेल आणि या आपत्तीचे मुख्य कारण तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्पात धरणाचे पाणी टर्बाईनपर्यंत नेणारा १२ किमी लांबीचा बोगदा असल्याचे स्पष्ट झाले आहे. ८ किमीचा बोगदा खोदून झालाय. उरलेले चार किमी खोदताना टनेल बोअरिंग मशिन अडकली. ती बाहेर काढण्यासाठी ब्लास्ट केले. त्याने भूगर्भातील जलप्रवाह फुटले. पाणी वाहू लागले. त्या भुसभुशीत पोकळीत मलबा शिरला व वरची जमीन ढासळू लागली, असा काहीसा हा घटनाक्रम आहे. 

केवळ जोशीमठ किंवा चमोली जिल्हाच नव्हे, तर आयताकृती उत्तराखंड राज्यातील मधला आडवा टापू अस्वस्थ आहे. अतिउत्तरेकडील गंगोत्री व नंदादेवी हिमशिखरांच्या दोन प्रमुख समूहापैकी पूर्वेकडील, नेपाळ सीमेला लागून असलेले नंदादेवी ग्लेशियर्स नैसर्गिक आपत्तीप्रवण आहे. भूकंप, भूस्खलन, हिमस्खलन, हिमवादळे, ढगफुटी, महापूर अशा संकटांची मालिका हा भाग भोगतो आहे. जोशीमठासोबत केदारनाथ, बागेश्वर, चमोली, पिठोरगड, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी या भागांतील अनेक गावांमध्ये भूस्खलन होतेय. पक्क्या डांबरी, सिमेंटच्या रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. बहुतेक ठिकाणी घराखालून भूगर्भातील पाण्याचे प्रवाह सुरू आहेत. हे तिथे घडतेय, ज्या परिसरात जलविद्युत प्रकल्पांसाठी बोगदे खणले जात आहेत,  पर्यटकांसाठी चांगले दहा मीटर रुंदीचे महामार्ग बांधले जात आहेत. झालेच तर उत्तराखंडच्या दक्षिणेकडील, उत्तर प्रदेश सीमेलगतचा हरिद्वार वगैरे मैदानी भाग उंचीवरच्या तीर्थस्थळांना जोडण्यासाठी रेल्वेमार्ग तयार होत आहेत. हा निसर्गाशी खेळ सुरू आहे. हा खेळ अतिसंवेदनशील हिमालयाच्या पर्यावरणाचा खंडोबा करील, अशी भीती आहे. 

उत्तराखंड ही सुरुवात आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे हिमकवच लाभलेला वायव्येकडील हिंदुकुश पर्वतराजीपासून ते पूर्व, आग्नेयकडील म्यानमारपर्यंतचा अंदाजे २,४०० किमी लांबीचा संपूर्ण हिमालय पर्वतसमूह ग्लोबल वॉर्मिंगच्या दुष्परिणामांचा सामना करीत आहे. 

आपण संकटांचा योग्य तो धडा घेत नाही. आपत्तींमुळे आत्मपरीक्षण करीत नाही. निसर्ग ओरबाडणे थांबवत नाही, हेच खरे, अन्यथा अवघ्या दोन वर्षांपूर्वी चमोली, जाेशीमठ परिसरात नंदादेवी खोऱ्यातील हिमस्खलन व ढगफुटीमुळे झालेला प्रलय, दोनशेवर बळी, जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात शे-दीडशे जणांना जलसमाधी हे इतक्या लवकर विसरलाे नसतो. त्याही आधी २०१३ साली चार हजारांवर जीव घेणाऱ्या केदारनाथ, बद्रीनाथ परिसरातील हिमालयीन त्सुनामीचेही विस्मरण झाले नसते. निसर्गाच्या, पर्यावरणाच्या हाका विकासाच्या गोंगाटात विरून गेल्या नसत्या. १९९१ मधील उत्तरकाशी, १९९९ मधील चमोलीच्या भूकंपाने बेचिराख गावे पुन्हा तशाच आपत्तीच्या अक्राळविक्राळ जबड्यात ढकलायला सरसावलो नसतो.

पर्यटन व पाण्यातून विजेची राक्षसी भूक 

- पर्यटन उत्तराखंडच्या उत्पन्नाचा आधार. - सव्वाकोटी लोकसंख्येच्या उत्तराखंडमध्ये वर्षाला तीन कोटींहून अधिक पर्यटक. - पर्यटन विकासासाठी चांगले रस्ते, रेल्वे, बहुमजली हॉटेल्सची उभारणी - गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ व बद्रीनाथ या चार पवित्र ठिकाणांची, उत्तराखंडची छोटी चारधाम यात्रा करणारे अधिक - जलविद्युत निर्मिती हा उत्तराखंडच्या अर्थकारणाचा दुसरा मोठा स्रोत. २००० साली  राज्यनिर्मितीवेळीच २१ हजार मेगावॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट - साडेचार-पाच हजार मेगावॉट निर्मिती सुरू - उत्तराखंडमध्ये सरकारी, खासगी, व्यावसायिक मिळून तब्बल तीनशेच्या आसपास छोटेमोठे जलविद्युत प्रकल्प २०१३ च्याकेदारनाथ प्रलयानंतर सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड जलविद्युत निगमचे ७० पैकी ४४ प्रकल्प थांबविले. - वीस प्रकल्प पूर्ण, सहा प्रगतिपथावर. स्थगित ४४ प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न - भौगोलिक स्थिती व नद्यांचे प्रवाह जलविद्युत निर्मितीसाठी अत्यंत पोषक. - दरीच्या तोंडावर धरण बांधले की मुबलक जलसाठा - टिहरी धरण हे याचे चांगले उदाहरण. त्याची उंची २६० मीटर, तर लांबी अवघी ५७५ मीटर. जलसाठा ४२ किलोमीटरपर्यंत. - हे भारतातील सर्वाधिक व जगात बाराव्या क्रमांकाचे उंच धरण. - तब्बल २,४०० मेगावॉट म्हणजे देशातील सर्वाधिक क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प पूर्णत्वाच्या वाटेवर

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड