शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
3
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
4
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
5
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
6
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
7
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
8
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
9
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
10
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
11
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
12
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
13
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
14
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
15
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
16
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
17
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
18
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
19
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

JNUमधील विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना ठेवले डांबून

By admin | Updated: October 20, 2016 11:40 IST

बायोटेकच्या विद्यार्थ्यांनी जेएनयूचे कुलगुरू, रजिस्ट्रार यांच्यासह 10 अधिका-यांना प्रशासकीय भवनात डांबून ठेवून, निदर्शनं केली.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 20 - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) बेपत्ता विद्यार्थी नजीब अहमदसाठी सुरू असलेले आंदोलन काल रात्री (बुधवारी) अधिक तीव्र झाले.  बायोटेकच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू, रजिस्ट्रार यांच्यासह 10 अधिका-यांना प्रशासकीय भवनात डांबून ठेवून, निदर्शने केली. नजीब बेपत्ता होऊन पाच दिवस झाले तरीही त्याची कोणतीही माहिती मिळत नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. जवळपास 200 विद्यार्थ्यांनी कॅम्पसबाहेर संताप व्यक्त करत रात्रभर निदर्शने केली. यावेळी कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले, मात्र विद्यार्थी त्यांचे काहीही ऐकले नाही.  
 
'दुपारी 2.30 वाजल्यापासून आम्हाला भवनात कोंडून ठेवण्यात आले. यातील एका महिला सहका-याला मधुमेहचा त्रास असल्याने त्या अस्वस्थदेखील झाल्या होत्या', असे सांगत कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विरोध दर्शवला. तर दुसरीकडे,  जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष मोहित पांडेयने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची बाजू मांडत सांगितले की, 'आम्ही कुणालाही बेकायदेशीर स्वरुपात बंद करुन ठेवले नव्हते, विद्यापीठात सर्व सोयीसुविधा उपलब्ध होत्या, तसेच आम्ही त्यांना जेवणही पुरवले होते',असे स्पष्टीकरण देत आरोप फेटाळून लावण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त आलोक कुमार वर्मा यांच्याशी बातचित करुन परिस्थितीबाबत माहिती घेतली आहे.
 
बायोटेकचा विद्यार्थी नजीब अहमद शनिवारपासून बेपत्ता झाला आहे. तो बेपत्ता होण्याआधी विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांसोबत त्याचे भांडण झाले होते. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याचे वृत्त मिळत आहे. नजीबचे अपहरण करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.