शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

‘जेएनयू’ वादाने झाकोळली सर्वपक्षीय बैठक

By admin | Updated: February 17, 2016 02:58 IST

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत चालावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वाद उफाळून आला.

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत चालावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वाद उफाळून आला. विरोधी पक्षांनी अटकेतील विद्यार्थी संघाच्या नेत्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्याच्या निर्णयावर रोष व्यक्त केला, तर विद्यार्थ्यांनी केलेली घोषणाबाजी आक्षेपार्ह असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला. रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण, अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रपती राजवट आणि त्यापाठोपाठ उद्भवलेला जेएनयूमधील वाद या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरळीत चालावे, यासाठी केंद्र सरकारला बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळेच संसदेच्या २३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जेएनयूमधील वादावर चर्चा करण्याची तयारी सरकारने दर्शविली. बैठकीनंतर संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी संसदेचे कामकाज सुरळीत व्हावे यावर सर्वसहमती झाल्याचा दावा केला. जेएनयू वादावर भाजपाकडून काँग्रेसवर देशद्रोह्णांना पाठिंबा देत असल्याचा आरोप करण्यात येत असतानाच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, देशाचे ऐक्य आणि राज्यघटनेला लक्ष्य करून घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी काँग्रैसला अजिबात सहानुभूती नाही. मात्र अटकेतील नेता कन्हय्याकुमार याच्याविरुद्ध देशद्रोहाचा कुठलाही पुरावा नाही. देशद्रोही आणि हिटलरगुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपा नेत्यांकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांबद्दल होणाऱ्या देशद्रोही शब्दाच्या वापरावर तीव्र आक्षेप घेतला. दुसरीकडे वेंकय्या नायडू यांनी सुद्धा याबाबत चिंता व्यक्त करतानाच पंतप्रधानांना ‘हिटलर’ हे संबोधन कसे लावले जाते असा सवाल केला. सर्व पक्षांनी संयम बाळगावा,असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)विरोधकांद्वारे उपस्थित मुद्देतृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संमत करण्याकडे लक्ष वेधले.महत्त्वानुरुप विधेयके संमत व्हावीत आणि त्यासाठी सरकारने संसदेतील कोंडी फोडण्याच्या दृष्टीने वादाच्या मुद्द्यांवर तोडगा काढावा, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा म्हणाले.काँग्रेस नेत्यांनी हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येचाही मुद्दा बैठकीत उपस्थित केला. अरुणाचल प्रदेशमधील राजकीय कोंडीवरही बैठकीत चर्चा झाली.मारहाण प्रकरणी आज सुनावणीदिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टात पत्रकार, जेएनयूतील विद्यार्थी आणि शिक्षकांना वकिलांच्या संघटनेने मारहाण केल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि पोलिसांच्या निष्क्रियतेकडे लक्ष वेधणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज बुधवारी सुनावणी करणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)