शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

‘जेएनयू’ वादाने झाकोळली सर्वपक्षीय बैठक

By admin | Updated: February 17, 2016 02:58 IST

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत चालावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वाद उफाळून आला.

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत चालावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वाद उफाळून आला. विरोधी पक्षांनी अटकेतील विद्यार्थी संघाच्या नेत्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्याच्या निर्णयावर रोष व्यक्त केला, तर विद्यार्थ्यांनी केलेली घोषणाबाजी आक्षेपार्ह असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला. रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण, अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रपती राजवट आणि त्यापाठोपाठ उद्भवलेला जेएनयूमधील वाद या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरळीत चालावे, यासाठी केंद्र सरकारला बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळेच संसदेच्या २३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जेएनयूमधील वादावर चर्चा करण्याची तयारी सरकारने दर्शविली. बैठकीनंतर संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी संसदेचे कामकाज सुरळीत व्हावे यावर सर्वसहमती झाल्याचा दावा केला. जेएनयू वादावर भाजपाकडून काँग्रेसवर देशद्रोह्णांना पाठिंबा देत असल्याचा आरोप करण्यात येत असतानाच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, देशाचे ऐक्य आणि राज्यघटनेला लक्ष्य करून घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी काँग्रैसला अजिबात सहानुभूती नाही. मात्र अटकेतील नेता कन्हय्याकुमार याच्याविरुद्ध देशद्रोहाचा कुठलाही पुरावा नाही. देशद्रोही आणि हिटलरगुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपा नेत्यांकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांबद्दल होणाऱ्या देशद्रोही शब्दाच्या वापरावर तीव्र आक्षेप घेतला. दुसरीकडे वेंकय्या नायडू यांनी सुद्धा याबाबत चिंता व्यक्त करतानाच पंतप्रधानांना ‘हिटलर’ हे संबोधन कसे लावले जाते असा सवाल केला. सर्व पक्षांनी संयम बाळगावा,असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)विरोधकांद्वारे उपस्थित मुद्देतृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संमत करण्याकडे लक्ष वेधले.महत्त्वानुरुप विधेयके संमत व्हावीत आणि त्यासाठी सरकारने संसदेतील कोंडी फोडण्याच्या दृष्टीने वादाच्या मुद्द्यांवर तोडगा काढावा, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा म्हणाले.काँग्रेस नेत्यांनी हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येचाही मुद्दा बैठकीत उपस्थित केला. अरुणाचल प्रदेशमधील राजकीय कोंडीवरही बैठकीत चर्चा झाली.मारहाण प्रकरणी आज सुनावणीदिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टात पत्रकार, जेएनयूतील विद्यार्थी आणि शिक्षकांना वकिलांच्या संघटनेने मारहाण केल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि पोलिसांच्या निष्क्रियतेकडे लक्ष वेधणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज बुधवारी सुनावणी करणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)