शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

राजकीय परिस्थिती बदलली तरीही लष्करी कारवाया थांबणार नाहीत- लष्करप्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 18:17 IST

काश्मीरमध्ये भाजपाने पीडीपीशी असलेली युती तोडून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

नवी दिल्ली: काश्मीरमधील राजकीय परिस्थिती बदलली असली तरी येथील लष्करी कारवायांमध्ये कोणताही फरक पडणार नाही, असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट आली तरी लष्कराला कोणताही फरक पडेल, असे मला वाटत नाही. आमच्या कारवायांमध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप केला जात नाही. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील लष्करी कारवाया पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील. तसेच केंद्र सरकारने रमझानमध्ये शस्त्रसंधी केल्यामुळेच लोकांना शांततापूर्ण वातावरणात नमाज अदा करता आली. मात्र, ही शस्त्रसंधी अधिक काळ सुरु राहिली असती तर दहशतवाद्यांच्या कारवायांनी वेग आला असता. त्यामुळे रमजाननंतर शस्त्रसंधी मागे घेण्यात आली, असे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. काश्मीरमध्ये भाजपाने नुकताच पीडीपीशी असलेली युती तोडून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. रमजानच्या काळातील शस्त्रसंधीचा मुद्दा युती तुटण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक होता. मात्र, पीडीपीने शस्त्रसंधीची ही मुदत आणखी काही काळ वाढवण्याची मागणी केली होती. परंतु, भाजपाने या मागणीला केराची टोपली दाखवत लष्कराला काश्मीरमध्ये पुन्हा फ्री हँड दिला होता. 

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतJammu Kashmirजम्मू-काश्मीर