शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जीतनराम मांझी यांचा शपथविधी

By admin | Updated: May 21, 2014 02:15 IST

जीतनराम मांझी यांनी मंगळवारी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल डी.वाय. पाटील यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली

पाटणा : जीतनराम मांझी यांनी मंगळवारी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल डी.वाय. पाटील यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मांझी बिहारचे ३२ वे मुख्यमंत्री आहेत. राजभवनात आयोजित समारंभात मांझी यांच्यासह १७ मंत्र्यांनी शपथ घेतली. येत्या २३ मे रोजी विश्वासमत सादर करणार आहेत. मांझी यांच्या पाठोपाठ विजय चौधरी यांनी शपथ घेतली. जतीन राम यांच्या मंत्रिमंडळात दुलाल चंद्र गोस्वामी आणि विनय बिहारी या दोन नव्या चेहर्‍यांचा समावेश आहे. हे दोन्ही आमदार अपक्ष आहेत. उर्वरित सर्व मंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील आहेत. मंत्रिमंडळात एका महिला सदस्याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच एका मुस्लीम सदस्याची वर्णी लागली आहे. गेल्या वर्षी १९ जून रोजी विश्वासमत प्रस्तावाच्यावेळी नितीशकुमार सरकारला चार अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यामध्ये दौलतचंद गोस्वामी, बिनय बिहार, पवन जयस्वाल आणि सोमप्रकाशसिंग यांच्या समावेश होता. लिपिक ते मुख्यमंत्री जतीनराम मांझी हे राजकारणात येण्यापूर्वी टपाल कार्यालयात लिपिक होते. ते मावळत्या नितीश कुमार सरकारमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कल्याण मंत्री होते. ते जहानाबाद जिल्ह्यातील मुखदूमपूर विधानसभा संघाचे आमदार आहेत. ते राजकारणात दीर्घ काळापासून सक्रिय आहेत. १९८० पासून आतापर्यंत ते काँग्रेस, राजद आणि जदयू राज्य सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. बिहारमधील गया जिल्ह्यातील महाकार गावातील रहिवासी आहेत. ते मांझी ऊर्फ ‘मुसहर’ समाजाचे आहेत. हा समाज उंदीर पकडणे आणि ते खाण्यासाठी ओखळल्या जातो. (वृत्तसंस्था)