शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
3
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
4
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
5
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
6
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
7
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
8
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
9
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
10
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
11
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
12
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
13
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
14
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
15
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
16
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
17
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
18
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
19
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
20
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   

फौजदार महिलेचे घर फोडून रिव्हॉल्वरसह दागिने लंपास

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

पुणे : सूस रस्त्यावरील महालक्ष्मी हाईट्स या सोसायटीतील फ्लॅटचे कुलुप बनावट किल्लीने उघडून फौजदार महिलेच्या सरकारी रिव्हॉल्वरसह सोन्याच्या २ बांगड्या चोरांनी लंपास केल्या. स्मिता पाटील (वय २६ शिवालय सोसायटी, साई चौक, सूस रस्ता, पाषाण ) यांनी याबाबत फिर्याद केली आहे.१९ तारखेच्या दुपारी साडेचार पासून २१ तारखेच्या सकाळपर्यंत त्यांचा फ्लॅट कुलुपबंद ...


पुणे : सूस रस्त्यावरील महालक्ष्मी हाईट्स या सोसायटीतील फ्लॅटचे कुलुप बनावट किल्लीने उघडून फौजदार महिलेच्या सरकारी रिव्हॉल्वरसह सोन्याच्या २ बांगड्या चोरांनी लंपास केल्या.
स्मिता पाटील (वय २६ शिवालय सोसायटी, साई चौक, सूस रस्ता, पाषाण ) यांनी याबाबत फिर्याद केली आहे.१९ तारखेच्या दुपारी साडेचार पासून २१ तारखेच्या सकाळपर्यंत त्यांचा फ्लॅट कुलुपबंद होता.
चोरांनी बेडरूमच्या लाकडी ड्राव्हरमध्ये ठेवलेले रिव्हॉल्वर आणि ४५ हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या. पाटील आणि त्यांचे पती सकाळी कामानिमित्त बाहेर पडतात, आणि सायंकाळनंतर परततात. पाटील यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त संचलनाची तयारी करावयाची असल्याने त्या रिव्हॉल्वर न घेताच घरातून जात होत्या.

-------
नर्‍हे गावात महिलेचा अपघाती मृत्यु
पुणे : नर्‍हे गावातील तानाजीनगरमध्ये भरधाव दुचाकीची धडक बसून महिलेचा मृत्यु झाला.
२० तारखेला रात्री नऊच्या सुमारास झालेल्या या अपघातातील महिलेचे नाव शोभा प्रकाश काटवटे (वय ४५ कुंभारचावडी, धायरी)असे आहे. त्यांच्या मृत्युस कारण झाल्याच्या आरोपावरून निरंजन विटकर याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.
-------
हरित न्यायप्राधिकरणात गैरहजर राहिल्याने ४ जिल्हाधिकार्‍यांवर वॉरंट
पुणे : फ्लोरोसिससारख्या गंभीर विकारावर बाजू मांडण्यासाठी गैरहजर राहिल्याने राष्ट्रीय हरित न्यायप्राधिकरणाचे न्यायाधीश विकास किनगावकर आणि डॉ.अजय देशपांडे यांनी नांदेड, चंद्रपूर, परभणी आणि हिंगोलीच्या जिल्हाधिकार्‍यांना जामिनपात्र वॉरंट जारी केले.
या जिल्हाधिकार्‍यांनी जामिनाची प्रत्येकी २० हजार रूपयांची रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. भुजलाचा दर्जा निकृष्ट झाल्याने सामान्य नागरिकांना प्लोरोसिससारख्या गंभीर विकारांचा सामना करावा लागत असून पिण्याच्या पाण्याचा प्रदूषित पुरवठा, पाण्याचा बेकायदेशीर उपसा, फ्लोराईयुक्त पाण्यामुळे चिंताजनक झालेले आरोग्य प्रश्न असे विषय असताना संबंधित जिल्हाधिकार्‍यांनी न्यायालयात साधी उपस्थितीही ठेवली नाही.त्याची खेदपूर्वक नोंद या न्यायालयाने घेतली आहे.
नांदेड, बीड, यवतमाळ, लातूर, वाशिम, परभणी, हिंगोली,जालना, जळगाव, नागपूर, भंडारा आदी जिल्ह्यांमध्ये फ्लोरोसिससारख्या विकारांनी नागरिक बाधित आहेत.बेकायदेशीरपणे विंधन विहिरी घेणे,अति पाणी उपसा करणे, शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यात शासनाचे दुर्लक्ष अशा अनास्थेमुळे ॲड.असीम सरोदे व त्यांच्या सहकार्‍यांनी जनहित अर्ज दाखल केला होता.
त्यानंतर १२ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांनी राष्ट्रीय हरित न्यायप्राधिकरणात हजर राहावे अशी नोटीस बजावण्यात आली होती. त्यावरही जिल्हाधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने न्यायाधिकरणाने हा आदेश दिला.
------