शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

खुनी पित्यासोबत जेलमध्ये राहून केली जेईई क्रॅक

By admin | Updated: July 1, 2016 05:20 IST

ध्येय, चिकाटी आणि जिद्द असली की प्रतिकूल परिस्थितीवरही मात करून यश मिळविता येते.

जयपूर : ध्येय, चिकाटी आणि जिद्द असली की प्रतिकूल परिस्थितीवरही मात करून यश मिळविता येते. कोटा येथील पीयूष मीना याने असेच अपवादात्मक यश मिळवित इतरांसाठी आदर्शवत ठरणारी स्वत:ची अनोखी कहाणी घडवली आहे.पूर्वाश्रमीचे शासकीय शिक्षक असलेले वडील फुलचंद हे हत्येच्या आरोपाखाली कारागृहात असल्यामुळे आणि होस्टेलची फी देण्यासाठी पैसे नसल्यामुळे वडील राहत असलेल्या खुल्या कारागृहातील ८ बाय ८च्या सेलमध्ये राहून त्याला अभ्यास करावा लागला. आयआयटी प्रवेशासाठी असलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्सचा निकाल नुकताच लागला. या परीक्षेत ४५३वी रँक (अनुसूचित जमाती श्रेणी) घेत त्याने मिळविलेले यश म्हणूनच अनोखे ठरते. खुल्या कारागृहात आरोपीसोबत कुटुंबीयांना राहता येत नाही, पण आरोपीला दररोज कमाईसाठी बाहेर जाता येते. मला मुुलाच्या कोचिंग आणि होस्टेलसाठी २ लाख रुपयांची गरज होती. नातेवाईक, मित्रांची मनधरणी करून १ लाख रुपये जमवता आले, पण त्यात कोचिंगची फीसुद्धा भागत नव्हती.पीयूषचे आयआयटीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खासगी शाळेत नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र माझ्यावरील खुनाचा आरोप त्यात अडसर ठरत होता. त्यामुळे मेडिकल स्टोअरमध्ये मदतनीस म्हणून कमी पगाराची नोकरी स्वीकारली, असे फुलचंद यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)खिडकीतील कवडसा ठरला आधार...कारागृहातील अनुभव सांगताना पीयूष भावुक झाला, पण यशाचा आनंदही त्याला लपवता आला नाही. कारागृहातील कडक नियमांमुळे मला प्रारंभी अभ्यास करता येत नव्हता. रात्री ११ वाजता दिवे बंद व्हायचे. खिडकीतून येणाऱ्या अंधुक प्रकाशात मी अभ्यास केला. खोली छोटी असल्याने अभ्यास होईस्तोवर पहाटे ४ वाजेपर्यंत वडील सेलबाहेर थांबायचे, असे त्याने सांगितले.मी वडिलांसोबत कारागृहात राहतो हे कुणालाही सांगितले नव्हते मात्र आता वडिलांनी माझ्यासाठी जे केले त्याची तुलना कुणीही करू शकत नाही असे मी अभिमानाने सांगत आहे, असे त्याने म्हटले. फुलचंद यांनी १२ वर्षे कारागृहात काढली. आणखी दोन वर्षांनी शिक्षा पूर्ण होताच मुक्त होण्याची त्यांना आशा आहे. कारावास पूर्ण होताच पीयूषला चांगले आयुष्य देणे हेच माझे ध्येय आहे, असे ते म्हणाले.