शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जैश-ए-मोहम्मद भाजपाचं पिल्लू, कपिल सिब्बल यांचा सनसनाटी आरोप

By admin | Updated: October 7, 2016 14:51 IST

भाजपा एवढ्या खालच्या स्तराला जाईल असं वाटलं नव्हतं म्हणत कपिल सिब्बल यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवरुन आरोप - प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका करत खून की दलाली करत असल्याचा आरोप केल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेत दलाली हा शब्द काँग्रेसला लागू पडतो. तो शब्द त्यांनी आपल्यापर्यंतच ठेवावा. आम्हाला तो शब्द जोडू नये अशा समाचार घेतला. यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेत ज्यांच्या विरोधात हत्येचे गुन्हे आहेत ते आम्हाला शिकवणार, भाजपा एवढ्या खालच्या स्तराला जाईल असं वाटलं नव्हतं म्हणत कपिल सिब्बल यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. 
 
कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर आरोपांच्या फैरी झाडल्या. जैश-ए-मोहम्मदला भाजपाने तयार केलं असल्याचा आरोप कपिल सिब्बल यांनी केला. मसूद अजहरला भाजपाने सोडलं, आणि तिकडे जाऊन त्याने जैश-ए-मोहम्मद तयार केला, आणि आमच्यावर आरोप करता असा सवाल कपिल सिब्बल यांनी विचारला. 
 
 
पाकिस्तान काय आहे माहित असतानाही तिकडे जाऊन वाढदिवस साजरा करण्याची काय गरज होती. एका बाजूने मैत्री करता आणि दुसरीकडे आमच्यावर आरोप करता असं कपिल सिब्बल बोलले आहेत. पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक केला असं म्हणणं लष्कराचा अपमान आहे, त्यांची माफी मागायला हवी. लष्कराच्या यशस्वी कामगिरीवर राजकारण करणं बंद करा, पोस्टरबाजी बंद करा असंही कपिल सिब्बल बोलले आहेत. 
 
अटलबिहारी वाजपेयी ज्यांना दुर्गा म्हणायचे त्या इंदिरा गांधींमध्ये दोष होता का ? राजीव गांधींमध्ये दोष होता का ? असे सवाल कपिल सिब्बल यांनी विचारले. बेजबाबदार वक्तव्य होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: निवेदन द्यावे, पण फायदा उचलायचा असल्याने तेदेखील मजबूर आहेत असा टोला कपिल सिब्बल यांनी लगावला.
 
पाकिस्तान एक पेशंट आहे, तो चांगला राहावा अशी भारताची इच्छा आहे. आज त्या पेशंटला दहशतवादाचा कॅन्सर झाला आहे. आपल्याला केमिओथेरपी देण्याची गरज आहे, जे संरक्षण दल देत आहे. हा कॅन्सर संपवण्यासाठी आम्ही मोदींसोबत आहोत, कॅन्सर बरा व्हावा आणि दोघांनी एकत्र नांदावे असं आम्हाला वाटतं. पण सर्जिकल स्ट्राईकनंतर हा कॅन्सर संपला, आपण जिंकलो असं यांना वाटत आहे. पण एका सर्जिकल स्ट्राईकने कॅन्सर संपत नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. 
 
पत्रकार परिषदेतील मुद्दे - 
- ज्यांच्या विरोधात हत्येचे गुन्हे आहेत ते आम्हाला शिकवणार, भाजपा एवढ्या खालच्या स्तराला जाईल असं वाटलं नव्हतं 
- अटलबिहारी वाजपेयी ज्यांना दुर्गा म्हणायचे त्या इंदिरा गांधींमध्ये दोष होता ? राजीव गांधींमध्ये दोष होता ?
- नरेंद्र मोदी यांनी स्वत: निवेदन द्यावे, पण तेदेखील मजबूर आहेत कारण फायदा उचलायचा आहे 
- कारगिलमध्ये नियंत्रण रेषा ओलांडली गेली नव्हती का 
- आम्ही कधीच लष्कराच्या कारवाईचं राजकारण केलं नाही 
- पाकिस्तान एक पेशंट आहे, तो चांगला राहावा अशी भारताची इच्छा आहे
- आज त्या पेशंटला दहशतवादाचा कॅन्सर झाला आहे, आपल्याला केमिओथेरपी देण्याची गरज आहे, जे संरक्षण दल देत आहे
- हा कॅन्सर संपवण्यासाठी आम्ही मोदींसोबत आहोत, कॅन्सर बरा व्हावा आणि एकत्र नांदावे असं आम्हाला वाटतं
- सर्जिकल स्ट्राईकनंतर हा कॅन्सर संपला, आपण जिंकलो असं यांना वाटत आहे, एका सर्जिकल स्ट्राईकने कॅन्सर संपत नाही 
- पोस्टरबाजी बंद करा, लष्कराच्या यशस्वी कामगिरीवर राजकारण करणं बंद करा
- जैश-ए-मोहम्मदला भाजपाने तयार केलं, मसूद अजहरला भाजपाने सोडलं, आणि आमच्यावर आरोप करता  
- पाकिस्तान काय आहे माहित असतानाही तिकडे जाऊन वाढदिवस साजरा करण्याची काय गरज होती
- एका बाजूने मैत्री करता आणि दुसरीकडे आमच्यावर आरोप करता
- पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक केला असं म्हणणं लष्कराचा अपमान आहे, त्यांची माफी मागायला हवी