शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

आयकराच्या १९ वर्षे जुन्या प्रकरणातून जयललिता मुक्त

By admin | Updated: January 9, 2015 02:13 IST

१९ वर्षांपासून सुरू असलेली कारवाई त्यांनी चक्रवाढ शुल्क भरल्यानंतर आयकर विभागाने अंतिम आदेश काढून संपुष्टात आणली आहे.

चेन्नई : अण्णाद्रमुकच्या प्रमुख जयललिता व त्यांच्या निकटच्या स्नेही शशिकला यांच्याविरुद्धची १९ वर्षांपासून सुरू असलेली कारवाई त्यांनी चक्रवाढ शुल्क भरल्यानंतर आयकर विभागाने अंतिम आदेश काढून संपुष्टात आणली आहे.गुरुवारी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान जयललिता यांचे वकील जे. करुपय्या यांनी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाला निवेदन देऊन, आयकर विभागाने चक्रवाढ शुल्क स्वीकारून अंतिम आदेश जारी केल्याचे सांगितले. आयकर विभागाचे सरकारी वकील के. रामासामी यांनी हे प्रकरण मागे घेण्याकरिता ते याचिका दाखल करणार असल्याचे यावेळी सांगितले. गेल्या वर्षी १ डिसेंबर रोजी जयललिता व शशिकला यांनी आपल्या व्यक्तिगत क्षमतेनुसार व त्यांच्या भागीदारीतील कंपनीसोबत मिळून चक्रवाढ शुल्काच्या रूपात १.९९ कोटी रुपये जमा केले होते. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध १९ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकरणाच्या समाप्तीची प्रक्रिया सुरू झाली होती. १९९३-९४ करिता जयललिता यांनी ३०,८३,८८७ रुपये, तर शशिकला यांनी २८,०७,९७२ रुपयांचे चक्रवाढ शुल्क भरले. शशी एंटरप्राइजेसने १९९१-९२ करिता ७५,३३,३३० रुपये व १९९२-९३ करिता ६५,६७,८७२ रुपये जमा केले आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात यासंबंधी समझोता करण्याचे निवेदन देण्यात आले होते. आयकरने १९९१-९२ व १९९२-९३ मध्ये आयकराचे परतावे न भरल्याबद्दल तक्रार दाखल केली होती. (वृत्तसंस्था)