शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

जवान चंदू चव्हाणने कथन केला छळ छावणीचा अनुभव

By admin | Updated: January 31, 2017 10:33 IST

नजरचुकीने सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या जवान चंदू चव्हाणकडून माहिती काढून घेण्यासाठी पाकिस्तानने त्यांचा अनन्वित छळ केला.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३१ -  उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करत अनेक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पाकचे धाबे दणाणले. मात्र त्यानंतर अवघ्या १ दिवसानंतर भारताचा एक जवान नजरचुकीने सीमारेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याचे समोर आले. तब्बल चार महिन्यांनी पाकच्या  तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेला ३७ राष्ट्रीय रायफल्सचा जवान, चंदू चव्हाण याची सध्या कसून चौकशी सुरू असून त्या दरम्यान पाकिस्तानने त्याच्यावर केलेल्या अन्यायाची कहाणी ऐकून कोणाचाही थरकाप उडेल. 
सीमा ओलांडून हद्दीत प्रवेश का केला, हे जाणून घेण्यासाठी पाकिस्तानने चंदू यांचा अनन्वित शारिरीक छळ केला. त्याला बेदम मारहाण तर करण्यात यायचीच पण  दोन-तीन दिवस उपाशी ठेवले जायचे, वारंवार विशिष्ट स्वरूपाचे (ड्रग्ज?) इंजेक्शन देण्यात यायचे, अशी माहिती चंदू यांचा भाऊ भूषण यांनी दिली.
(भारतीय जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तानकडून सुटका)
(चंदू चव्हाण यांची वैद्यकीय तपासणी)
 
 
२१ जानेवारी रोजी पाकिस्तानने चंदूची सुटका केली. भारताच्या सततच्या पाठपुराव्यानंतर पाकिस्तानने अकेर चंदूला सोडले. मात्र त्यापूर्वी त्याच्याकडून माहिती काढून घेण्यासाठी त्याचा शारिरीक छळ करण्यात आला, त्याला झोपूही दिले जात नसे.
चंदू चव्हाणची सध्या भारतीय लष्कर व गुप्तचर यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. वरिष्ठांशी झालेल्या मतभेदांतून रागाच्या भरात चंदूने सीमा ओलांडल्याचे सांगितले जात असून त्या अनुषंगाने त्याची चौकशी करण्यात येत आहे.   त्यामध्ये दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. 
चंदू यांच्यावर झालेल्या अत्याचाराची त्यांचा भाऊ भूषण यांनी माहिती दिली.  ते म्हणाले, ‘अटक केल्यापासून चंदूला अंधाऱ्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. आपण पाकिस्तानी हद्दीत प्रवेश का केला, ही माहिती काढण्याचा बराच छळ करण्यात आला. हाताची बोटे इतक्या वेळा वाकविली की, त्याच्या जखमा आजपर्यंत भरून निघालेल्या नाहीत. बोलत करण्यासाठी त्याला दोन-तीन दिवस अन्नच दिले जायचे नाही. त्यामुळे प्रचंड थकवा यायचा. त्या स्थितीत हातावर वारंवार कसलेकरी इंजेक्शन टोचले जात होते, मात्र त्यामागचं कारण कळलं नाही. पाकिस्तानातल बहुतांश काळ अंधाऱ्या खोलीत काढावा लागला. कधी तरी कोठडीतून बाहेर काढले जात असे, पण त्याच वेळेसे चेहे-यावर कपडा बांधण्यात येत असल्याने आपण नेमके कुढे आहेत, हे समजत नसे. 21 जानेवारीला त्याने पहिल्यांदा वाघा बॉर्डरवर उजेड पाहिला' अशी माहिती भूषणनं दिली.
 
कोण आहेत चंदू चव्हाण?
चंदू चव्हाण मूळचा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचा. चंदू 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात आहे. तो जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहे. 29 सप्टेबरला चंदूने चुकून सीमा ओलांडली होती. त्यानंतर तो पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागला. या बातमीनं धक्का बसून चंदूच्या आजीचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. अखेर संरक्षण खात्यानं केलेल्या योग्य वाटाघाटी आणि शिष्टाईमुळे चंदूला परत आणण्यात यश आलं.