शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

जवान चंदू चव्हाणने कथन केला छळ छावणीचा अनुभव

By admin | Updated: January 31, 2017 10:33 IST

नजरचुकीने सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या जवान चंदू चव्हाणकडून माहिती काढून घेण्यासाठी पाकिस्तानने त्यांचा अनन्वित छळ केला.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३१ -  उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करत अनेक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पाकचे धाबे दणाणले. मात्र त्यानंतर अवघ्या १ दिवसानंतर भारताचा एक जवान नजरचुकीने सीमारेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याचे समोर आले. तब्बल चार महिन्यांनी पाकच्या  तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेला ३७ राष्ट्रीय रायफल्सचा जवान, चंदू चव्हाण याची सध्या कसून चौकशी सुरू असून त्या दरम्यान पाकिस्तानने त्याच्यावर केलेल्या अन्यायाची कहाणी ऐकून कोणाचाही थरकाप उडेल. 
सीमा ओलांडून हद्दीत प्रवेश का केला, हे जाणून घेण्यासाठी पाकिस्तानने चंदू यांचा अनन्वित शारिरीक छळ केला. त्याला बेदम मारहाण तर करण्यात यायचीच पण  दोन-तीन दिवस उपाशी ठेवले जायचे, वारंवार विशिष्ट स्वरूपाचे (ड्रग्ज?) इंजेक्शन देण्यात यायचे, अशी माहिती चंदू यांचा भाऊ भूषण यांनी दिली.
(भारतीय जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तानकडून सुटका)
(चंदू चव्हाण यांची वैद्यकीय तपासणी)
 
 
२१ जानेवारी रोजी पाकिस्तानने चंदूची सुटका केली. भारताच्या सततच्या पाठपुराव्यानंतर पाकिस्तानने अकेर चंदूला सोडले. मात्र त्यापूर्वी त्याच्याकडून माहिती काढून घेण्यासाठी त्याचा शारिरीक छळ करण्यात आला, त्याला झोपूही दिले जात नसे.
चंदू चव्हाणची सध्या भारतीय लष्कर व गुप्तचर यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. वरिष्ठांशी झालेल्या मतभेदांतून रागाच्या भरात चंदूने सीमा ओलांडल्याचे सांगितले जात असून त्या अनुषंगाने त्याची चौकशी करण्यात येत आहे.   त्यामध्ये दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. 
चंदू यांच्यावर झालेल्या अत्याचाराची त्यांचा भाऊ भूषण यांनी माहिती दिली.  ते म्हणाले, ‘अटक केल्यापासून चंदूला अंधाऱ्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. आपण पाकिस्तानी हद्दीत प्रवेश का केला, ही माहिती काढण्याचा बराच छळ करण्यात आला. हाताची बोटे इतक्या वेळा वाकविली की, त्याच्या जखमा आजपर्यंत भरून निघालेल्या नाहीत. बोलत करण्यासाठी त्याला दोन-तीन दिवस अन्नच दिले जायचे नाही. त्यामुळे प्रचंड थकवा यायचा. त्या स्थितीत हातावर वारंवार कसलेकरी इंजेक्शन टोचले जात होते, मात्र त्यामागचं कारण कळलं नाही. पाकिस्तानातल बहुतांश काळ अंधाऱ्या खोलीत काढावा लागला. कधी तरी कोठडीतून बाहेर काढले जात असे, पण त्याच वेळेसे चेहे-यावर कपडा बांधण्यात येत असल्याने आपण नेमके कुढे आहेत, हे समजत नसे. 21 जानेवारीला त्याने पहिल्यांदा वाघा बॉर्डरवर उजेड पाहिला' अशी माहिती भूषणनं दिली.
 
कोण आहेत चंदू चव्हाण?
चंदू चव्हाण मूळचा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचा. चंदू 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात आहे. तो जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहे. 29 सप्टेबरला चंदूने चुकून सीमा ओलांडली होती. त्यानंतर तो पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागला. या बातमीनं धक्का बसून चंदूच्या आजीचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. अखेर संरक्षण खात्यानं केलेल्या योग्य वाटाघाटी आणि शिष्टाईमुळे चंदूला परत आणण्यात यश आलं.