शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence : आप-काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीत हिंसा भडकवली : जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 17:00 IST

हा दोन दिवसांचा हिंसाचार नसून यासाठी लोकांना दोन महिन्यांपासून भडकवले जात होते.

नवी दिल्ली : रविवारी सुरु झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत हिंसाचार आता थांबला आहे. बुधवारी दिल्लीत हिंसाचाराची कोणतीही मोठी घटना घडलेली नाही, परंतु शहरात अजूनही भीतीचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे दिल्लीतील हिंसाचारावरून राजकीय पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. "दिल्लीतील हिंसाचाराला आम आदमी पार्टी आणि काँग्रेस जवाबदार असल्याचा" आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधताना जावडेकर म्हणाले की, दंगलग्रस्त भागात जाण्याऐवजी मुख्यमंत्री केजरीवाल दिल्लीच्या विधानसभेत हिंसाचारात मृत्यू झालेल्या लोकांचा धर्म सांगत आहेत. तर बुधवारी पत्रकार परिषद घेणाऱ्या सोनिया गांधी आज राष्ट्रपतींच्या दारावर जाऊन, भाजपवर आरोप करत आहे.

तसेच हा दोन दिवसांचा हिंसाचार नसून यासाठी लोकांना दोन महिन्यांपासून भडकवले जात होते. आर-पारची लढाई असून तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल असे वक्तव्य सोनिया गांधींनी सीएए कायदा लागू झाल्यानंतर राम लीला मैदानावर झालेल्या सभेत केले होते. तिथूनच चिथावणी देण्याचे काम सुरु झाले असल्याचे आरोप जावडेकर यांनी केला आहे.

आम आदमी पार्टीचे नगरसेवक ताहिर हुसेन यांच्या घरात दंगल घडवण्याच्या तयारीसाठी दगड, पेट्रोल बॉम्ब जमा करण्यात आल्याचे समोर आले आहे. लोकांना भडकवण्यासाठी 'जिन्ना वाली आझादी', 100 करोड वर 15 करोड भारी, आसामला वेगळ करावे लागेल असे चिथावणी देणारे विधान केली जात असताना, आप आणि काँग्रेसचे नेते शांत राहिले, असल्याचे आरोपही जावडेकर यांनी केला.