शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

Delhi Violence : आप-काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीत हिंसा भडकवली : जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 17:00 IST

हा दोन दिवसांचा हिंसाचार नसून यासाठी लोकांना दोन महिन्यांपासून भडकवले जात होते.

नवी दिल्ली : रविवारी सुरु झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत हिंसाचार आता थांबला आहे. बुधवारी दिल्लीत हिंसाचाराची कोणतीही मोठी घटना घडलेली नाही, परंतु शहरात अजूनही भीतीचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे दिल्लीतील हिंसाचारावरून राजकीय पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. "दिल्लीतील हिंसाचाराला आम आदमी पार्टी आणि काँग्रेस जवाबदार असल्याचा" आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधताना जावडेकर म्हणाले की, दंगलग्रस्त भागात जाण्याऐवजी मुख्यमंत्री केजरीवाल दिल्लीच्या विधानसभेत हिंसाचारात मृत्यू झालेल्या लोकांचा धर्म सांगत आहेत. तर बुधवारी पत्रकार परिषद घेणाऱ्या सोनिया गांधी आज राष्ट्रपतींच्या दारावर जाऊन, भाजपवर आरोप करत आहे.

तसेच हा दोन दिवसांचा हिंसाचार नसून यासाठी लोकांना दोन महिन्यांपासून भडकवले जात होते. आर-पारची लढाई असून तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल असे वक्तव्य सोनिया गांधींनी सीएए कायदा लागू झाल्यानंतर राम लीला मैदानावर झालेल्या सभेत केले होते. तिथूनच चिथावणी देण्याचे काम सुरु झाले असल्याचे आरोप जावडेकर यांनी केला आहे.

आम आदमी पार्टीचे नगरसेवक ताहिर हुसेन यांच्या घरात दंगल घडवण्याच्या तयारीसाठी दगड, पेट्रोल बॉम्ब जमा करण्यात आल्याचे समोर आले आहे. लोकांना भडकवण्यासाठी 'जिन्ना वाली आझादी', 100 करोड वर 15 करोड भारी, आसामला वेगळ करावे लागेल असे चिथावणी देणारे विधान केली जात असताना, आप आणि काँग्रेसचे नेते शांत राहिले, असल्याचे आरोपही जावडेकर यांनी केला.