शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

जाट समाजाला आरक्षणाचे आश्वासन

By admin | Updated: February 21, 2016 18:52 IST

जाट समाजाला ओबीसी आरक्षण देणारे विधेयक हरयाणा विधानसभेत सादर केले जाईस असे भाजप नेते अनिल जैन यांनी रविवारी सांगितले.

ऑनलाइन लोकमत 

चंदीगड, दि. २१ - जाट समाजाला ओबीसी आरक्षण देणारे विधेयक हरयाणा विधानसभेत सादर केले जाईस असे भाजप नेते अनिल जैन यांनी रविवारी सांगितले. जाट नेत्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी दुपारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर जैन यांनी ही माहिती दिली. 
जाट समाजाच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल असेही जैन यांनी सांगितले. सरकारने ही आश्वासने देऊन एकप्रकारे आरक्षणासाठी हिंसाचार करणा-या आंदोलकांपुढे नमते घेतले आहे
जाट नेता जयपालसिंह सांगवान यांनी आंदोलन संपवण्याचे आवाहन केले आहे, सरकारने मागण्या मान्य केल्याचा दावा केला आहे.
ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी जाट समाजाकडून हरयाणामध्ये सुरु असलेल्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. शनिवारप्रमाणे रविवारीही अनेक भागांमध्ये हिंसाचार, जाळपोळ करण्यात आली. लष्कर, पोलिसांच्या तुकडया तैनात करण्यात आल्यानंतरही हरियाणामधील हिंसाचार नियंत्रणात आलेला नाही. 
भिवानी आणि सोनीपतमध्ये आंदोलकांनी दोन पोलिस चौक्या, दुकाने आणि एटीएम मशीन जाळल्या. लष्कराने येथे ध्वजसंचलन केले असून, सर्वाधिक वाईट परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये हवाई टेहळणीव्दारे लक्ष ठेवण्यात येत आहे. आतापर्यंतच्या हिंसाचारात दहा जणांचा मृत्यू झाला असून, १५० जण जखमी झाले आहेत. जाट आरक्षण आंदोलनामुळे रविवारीही हरयाणात तणाव कायम असून, राज्याच्या अनेक भागात हिंसाचार सुरु आहे. बसई धानकोट रेल्वे स्थानकावरील तिकीट काऊंटरला जमावाने आग लावली. सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावे यासाठी आंदोलनकर्त्यांनी दिल्ली-चंदीगड महामार्गावरील वाहतुकीसाठी बंद केला आहे.  
जिंदमध्ये आंदोलनकर्त्यांनी पेट्रोल पंपाची नासधूस केली. १५४ एफआयआर दाखल झाले आहेत. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह अनेक मंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. 
रोहतक, जिंद, भिवानी, झांज्जर, सोनीपत, हिस्सार या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती सर्वाधिक खराब आहे. आंदोलनकर्त्यांनी शनिवारी रात्री बँकेच्या एटीएम मशीनला आग लावली. भिवानीमधील लोहारुमध्ये कोऑपरेटीव्ह बँकेची कागदपत्रे जाळली. मोठया प्रमाणावर जवानांची तैनाती झाल्यानंतरही हिंसाचार सुरु आहे.