शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
2
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
3
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
4
Multibagger Stock: पैसाच पैसा! ₹२८ च्या शेअरनं केलं मालामाल; ५ वर्षात दिला ५६,०००% पर्यंतचा तुफान रिटर्न
5
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
6
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
7
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
8
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
9
'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री घटस्फोटाच्या ३ महिन्यानंतर दुसऱ्यांदा बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो केले शेअर
10
Maharashtra CET: सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, कुठल्या दिवशी कोणता पेपर? वाचा
11
IND vs SA : बुमराहनं मार्करमसाठी जाळं विणलं; पण KL राहुलनं स्लिपमध्ये झोपा काढत त्यावर पाणी फेरलं!
12
श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स'
13
विनायक चतुर्थी २०२५: मार्गशीर्ष विनायक चतुर्थी ठरणार खास, गणेशकृपेने ९ राशींची पूर्ण होणार आस!
14
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
15
Tarot Card: लोभाला बळी पडू नका, मनाचा कौल घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
16
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
17
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
18
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
19
Mumbai: देवदर्शनाहून परत येताना मुलाचा ट्रेनमधून पडून मृत्यू; तब्बल १७ वर्षांनी पालकांना नुकसानभरपाई!
20
सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणातील बुद्धिबळपटू अनुराधा बेनिवालचे जाट बांधवांना शांततेचे आवाहन

By admin | Updated: February 24, 2016 15:29 IST

ओबीसी कोट्यात आरक्षण मिळावे या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनामुळे हरियाणा धुमसत असताना रोहतकच्याच एका तरूणीने व्हिडीओच्या माध्यमातून याबद्दल नाराजी दर्शवत हिंसक आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले आहे.

ऑनलाइन लोकमत

चंदीगड, दि. २४ - ओबीसी कोट्यात आरक्षण मिळावे या मागणीसाठी जाट समाजाने पुकारलेल्या आंदोलनामुळे धुमसलेले हरियाणा अद्याप पूर्णपणे शांत झालेले नसून राज्यात तणावाचे वातावरण कायम आहे. १९ जणांचा बळी घेणा-या या आंदोलनानंतर हिंसाचारग्रस्त जाटबहुल हिस्सार, हांसी, भिवानीमध्ये संचारबंदी अद्याप लावण्यात आलेली आहे. मात्र या घटनेच्या पार्श्वभूमीवर हरियाणाच्याच रोहतकमधील अनुराधा बेनिवाल या तरूणीने एका व्हिडीओच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांना शांतता राखण्याचे तसेच आपलेच राज्य न जाळण्याचे आवाहन केले आहे. २९ वर्षीय अनुराधा ही एक चेस चॅम्पियन असून तिने एक हिंदी पुस्तकाचे लेखनही केले आहे. 
सध्या लंडनमध्ये असलेल्या अनुराधाने या व्हिडीओतून आपल्याचा (जाट) बांधवांना अनेक रोखठोक प्रश्न विचारत हिसांचार न करण्याचे आवाहन केले. गेल्या आठवड्याभरापासून जाट आंदोलनामुळे हरियाणा धुमसत असून त्याचे लोण उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानमध्येही पोहोचले होते. बोलीभाषेतून रेकॉर्ड केलेल्या या व्हिडीओत अनुराधाने या सर्व गोष्टींबाबात नाराजी नोंदवली आहे. ' मी जेव्हा बुद्धिबळ (चेस) शिकायला सुरूवात केली तेव्हा मला कोणीही माझी जात विचारली नव्हती ' असे सांगतानाच अनुराधाने जाट बांधवांना एकात्मतेचा तसेच हिंसाचार त्वरित थांबवण्याचा सल्ला दिला. या हिंसाचारामुळे फक्त राज्याला आर्थिक फटका बसणार नसून त्याचा राज्याच्या प्रतिमेवरही प्रतिकूल परिणाम होणार असल्याचे तिने नमूद केले आहे. 
' जेव्हा तुम्ही राज्यातील मालमत्ता जाळता तेव्हा तुम्ही स्वत:च्याच जमिनीवर विध्वंस घडवत असता, त्यात तुमची स्वत:चीच झाडं, घरं जळत असतात, इतर कोणाचेच नुकसान होत नाही. तुम्ही केलेले नुकसान पाहिल्यानंतर कोणती कंपनी (उद्योगासाठी) या राज्यात येईल? आपल्या राज्याचा विकास कसा होईल?' असा प्रश्न विचारत या सर्व बाबींमुळे आपल्याच राज्याचे नुकसान होत असल्याचे तिने स्पष्ट केले. ' आपला विकास करण्यासाठी तुम्हाला स्वत:लाच तशी परिस्थिती निर्माण करावी लागेल' असेही तिने नमूद केले. 
अनुराधाच्या या व्हिडीओमुळे अद्याप पुरेसा प्रभाव पडला नसला तरीही अनेक लोकांनी तिच्या या प्रयत्नांचे कौतुक केले असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
  • जाट आंदोलनाचा उत्तरेकडील राज्यांमधील रेल्वे सेवेला मोठा फटका बसला आहे. सुमारे ७३६ रेल्वे रद्द केल्या असून, १०५ गाड्या अन्य मार्गाने वळत्या केल्या. रेल्वे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, वाहतूकदारांना सुमारे २०० कोटींचा फटका बसला. पंजाब, हरियाणा, चंदीगड, जम्मू-काश्मीर या राज्यांकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावरील सेवा ठप्प झाल्या आहेत.