शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जनता दलाचे सहा तुकडे पुन्हा एकत्र

By admin | Updated: April 16, 2015 02:31 IST

१० वर्षांहून अधिक काळ स्वतंत्रपणे आणि प्रसंगी परस्परांविरुद्ध लढलेल्या ‘जनता’ परिवाराच्या सहा तुकड्यांचे बुधवारी मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली एकत्रीकरण झाले.

नेतृत्व मुलायमसिंह यांच्याकडे : आता वेगळे होणार नसल्याची ग्वाहीनवी दिल्ली : मूळच्या जनता दलातून बाहेर पडून गेल्या १० वर्षांहून अधिक काळ स्वतंत्रपणे आणि प्रसंगी परस्परांविरुद्ध लढलेल्या ‘जनता’ परिवाराच्या सहा तुकड्यांचे बुधवारी मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली एकत्रीकरण झाले.या सहा पक्षांच्या नेत्यांच्या मुलायमसिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर शरद यादव यांनी आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत, असे जाहीर केले. यामुळे समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल, भारतीय राष्ट्रीय लोकदल, जनता दल (सेक्युलर) आणि समाजवादी जनता दल या सहा पक्षांचा मिळून एकच पक्ष स्थापन होईल.मात्र या नव्या पक्षाचे नाव, निशाणी व झेंडा काय असेल हे अद्याप ठरलेले नाही. हे ठरविण्यासाठी जनता दल (सेक्युलर)चे एच. डी. देवेगौडा, राजदचे लालूप्रसाद यादव, लोकदलाचे ओम प्रकाश चौटाला, जदयूचे शरद यादव, समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव आणि समाजवादी जनता पार्टीचे कमल मोरारका यांची एक समिती नेमण्यात आली आहे. आम्ही पुन्हा वेगळे होणार नाही व जनतेच्या आकांक्षा पूर्ण करू, अशी ग्वाही या सर्व नेत्यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)जनता परिवारातील या पक्षांकडे आता बिहार व उत्तर प्रदेश या दोनच राज्यांची सत्ता आहे. बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक लवकरच होऊ घातलेली आहे. मात्र अशी विलीनीकरणे यापूर्वीही यशस्वी झाली नव्हती व आताही त्याने आम्हाला काहीच फरक पडणार नाही, असे म्हणून भाजपाने या घोषणेची संभावना केली.